शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
4
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
5
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
6
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
8
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
9
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
10
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
11
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
12
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
13
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
14
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
15
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

तुरीचे दर साडेसहा हजारांच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 4:34 AM

वाशिम : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा फटका सहन करावा लागल्याने ते हताश असताना बाजार व्यवस्थेत मात्र ...

वाशिम : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा फटका सहन करावा लागल्याने ते हताश असताना बाजार व्यवस्थेत मात्र त्यांना दिलासा मिळत आहे. जवळपास सर्वच शेतमालाच्या दरात तेजी असून, तुरीचे दर आता सहा हजारांहून पुढे सरकत साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.

वाशिम जिल्ह्यात गत खरीप हंगामापासून नैसर्गिक संकटांनी शेतकऱ्यांचा पिच्छा पुरविला. त्यात अतिवृष्टी, सततचा पाऊस, परतीच्या पावसासह बोंडअळी आणि विविध किडीनंतर ढगाळ वातावरणामुळे खरीप पिकांवर परिणाम होऊन सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली. त्यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण होते. त्यात सुरुवातीला बाजारातही शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याने ते मोठ्याच संकटात सापडले. त्यानंतर मात्र शेतमालांच्या दरात सतत तेजी पाहायला मिळाली. उडीद, मूग, सोयाबीनसह तुरीला शासनाच्या हमीदरापेक्षा अधिक दर मिळत आहेत. उडिद, मुग वगळता सोयाबीन आणि तुरीच्या दरात कमालीची तेजी असून, शासनाच्या हमीदरापेक्षा या दोन्ही शेतमालास ५०० रुपयांपर्यंत अधिक दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकºयांना मोठा दिलासा मिळू लागला आहे. जिल्ह्यात गत आठवड्यापर्यंत तुरीच्या दराने ६ हजार रुपये प्रति क्विंटलचा टप्पा ओलांडला होता तर या आठवड्यात तुरीचे दर ६४०० रुपयांच्या वर पोहोचले आहेत. त्यात मंगरुळपीर येथील बाजार समितीत गुरुवारी प्रतिक्विंटल ६४५० रुपयांचे दर तुरीला मिळाले. मानोरा येथील बाजार समितीत ६३०० रुपये प्रतिक्विंटल, तर वाशिम येथील बाजार समितीतही असेच दर मिळाले. कारंजा येथील बाजार समितीत मात्र तुरीला ६१०० रुपये प्रती क्विंटलचे दर मिळाले.

--------------

दरात आणखी वाढ होणार !

राष्ट्रीय स्तरावरील बाजारात तुरीला वाढती मागणी असल्याने व्यापारी तुरीच्या खरेदीवर अधिक जोर देत आहेत. त्यामुळे तुरीच्या दरात सतत तेजी येत असून, पुढेही हंगामभर असेच चित्र राहून तुरीचे दर अधिक वाढण्याची शक्यता व्यापारीवर्गाकडून व्यक्त केली जात आहे. अर्थातच या स्थितीतचा जिल्ह्यातील शेतकºयांना मोठा फायदा होणार आहे.