शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

‘लाल्या’मुळे कपाशी उत्पादनात घट होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 1:20 PM

वाशिम : बोंडअळीमुळे कपाशीचे आधिच नुकसान झाले असताना आता या पिकावर लाल्या रोगाचा प्रादूर्भाव होत आहे , यामुळे उत्पादनात आणखी घट होणार असल्याची शक्यता असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. 

वाशिम : बोंडअळीमुळे कपाशीचे आधिच नुकसान झाले असताना आता या पिकावर लाल्या रोगाचा प्रादूर्भाव होत आहे , यामुळे उत्पादनात आणखी घट होणार असल्याची शक्यता असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. कृषी विभागाकडून पिकांची पाहणी सुरु झाली आहे. कृषी विभागाने शेतकºयांना नुकसानापासून वाचविण्यासाठी योग्य  मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून होत आहे. जिल्हयात गतवर्षी कपाशीवर बोंडअळींचा मोठया प्रमाणात प्रादूर्भाव झाल्याने शेतकºयांनी यंदा या पिकाकडे पाठ फिरविल्याचे यावर्षी झालेल्या पेºयावरुन दिसून येते. गतवर्षी ३१ हजार हेक्टरवर असलेले कपाशीचे क्षेत्र यंदा १८ हजार ६०० हेक्टरपर्यंत मर्यादित झाले आहे. कृषी विभागाने यंदा कपाशीला बोंडअळीपासून वाचविण्यासाठी पेरणी काळापासूनच शेतकºयांना मार्गदर्शन केले.  तरी कपाशीवर बोंडअळीचा प्रादूर्भव झाला आणि कपाशीचे पीक यंदाही हातचे जाण्याची भिती वाढली होती. दरम्यान आॅगस्टमध्ये जोरदार पाऊस आल्याने या किडीला अटकाव झाला. परंतु परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने कपाशी पिक संकटात सापडले. कोरडवाहू शेतजमिनीला तडा पडू लागल्या दिवसाच्या आणि रात्रीच्या वातावरणात विषमता निर्माण झाली. आणि मुळाव्दारे घटकद्रव्ये शोषण्याची कपाशीची क्षमता कमी होत गेल्याने  या पिकावर आता लाल्याचा प्रकोप होत असल्याचे चित्र आहे. कपाशीच्या पेरणीला दीड महिना झाला असून आता पुढे पुन्हा एवढाच कालावधी या पिकाला लाल्या रोगाचा धोका कायम राहणार आहे.  त्यातच हलक्याप्रतिच्या शेतजमिनीवरील कपाशीत या रोगाचे प्रमाण अधिक असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या रोगाचा उत्पादनावर मोठा परिणाम होणार असल्याचे दिसून येत आहे.

वातावरणातील बदलामुळे कपाशीवर लाल्याचा प्रादूर्भाव होत आहे. या पृष्ठभूमिवर कृषी विभागाने कपाशीची पाहणी सुरु केली असून या रोगावर नियंत्रणासाठी शेतकºयांनी दोन ओळींच्या अंतराने पाणी द्यावे, तसेच नत्राचे प्रमाण कमी झाल्याचे वाटत असल्यास ते वाढविण्याचा प्रयतन करावा आणि एक टक्का मॅग्नेशिअम सल्फेट व दोन टक्के डिएपीची पिकावर फवारणी करावी असे आवाहन कृषी विभागाचेवतिने करण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमcottonकापूसagricultureशेती