शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अवकाळी पावसाचा पिकांना जबर फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 09:13 IST

शेकडो हेक्टरवरील गहू, हरभरा यासह फळपिकांना फटका बसल्याने शेतकरी अधिकच संकटात अडकला आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम : जिल्हाभरात २९ ते ३१ मार्च या दरम्यान वादळवाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेकडो हेक्टरवरील गहू, हरभरा यासह फळपिकांना फटका बसल्याने शेतकरी अधिकच संकटात अडकला आहे.गत सहा दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून, २३ मार्च रोजी जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्याने पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानाचा सर्वे होत नाही, तोच पुन्हा २९ मार्च रोजी वाशिम शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पाऊस झाला. यामुळे काढणीवर आलेला गहू आणि हरभºयाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर ३० मार्च आणि ३१ मार्च रोजीदेखील वादळवाºयासह जिल्हयात सर्वदूर अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रातील रब्बी ज्वारी, गहू, हरभरा यासह फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीमुळे नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे केले जात नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.कार्ली परिसरात गारपिटकार्ली : ३१ मार्च रोजी सायंकाळी ४ ते ५ वाजतादरम्यान कार्ली परिसरात वादळी वाºयासह गारपीट झाल्याने हाताशी आलेल्या रब्बीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.च्गत काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याचा फटका शेतकºयांना बसत आहे. सध्या शेतात गहू, हरबरा काढणी सुरू आहे. परंतू, अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. ३१ मार्च रोजी गारपिट झाल्याने ४०० ते ५०० एकरातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. गहू, हरभरा यासह कांदा व फळबागांचे नुकसान झाल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. वाशिम तालुक्यातील कार्ली परिसर, अडोळी, नागठाणा, तोंडगाव परिसरासह मालेगाव तालुक्यातील राजूरा, जऊळका रेल्वे, मुंगळा यासह २० ते २५ गावांत ३१ मार्चला सायंकाळी वादळवाºयासह अवकाळी पाउस झाल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले.२३ मार्चपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात वादळवाºयासह अवकाळी पाऊस पडत आहे. ३१ मार्चलादेखील अवकाळी पाऊस झाला. परंतू, या पावसामुळे पिकांचे फारसे नुकसान नाही. पीक नुकसानाची माहिती संकलित केली जात आहे. तथापि, प्राथमिक अंदाजानुसार पिकांचे नुकसान झाल्याचे आढळले नाही.-एस. एम. तोटावार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी