शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

व्यापाऱ्यांच्या मालाने भरले ओटे; शेतकऱ्यांचे सोयाबिन रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 2:17 PM

व्यापाºयांचा शेतमाल ओट्यावर आणि शेतकºयांचा माल जमिनीवर पडून राहत असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यानंतरही काही प्रमाणात शेतकºयांच्या हाती सोयाबिनचे उत्पादन आले. रब्बी हंगामातील खर्चाची जुळवाजुळव करण्यासाठी हा माल शेतकºयांनी विक्रीला आणणे सुरू केल्याने बाजार समितीत सर्वत्र सोयाबिनच दिसून येत आहे. असे असताना व्यापाºयांचा शेतमाल ओट्यावर आणि शेतकºयांचा माल जमिनीवर पडून राहत असल्याचे दिसून येत आहे.रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत केवळ हा तालुकाच नव्हे; तर वाशिम, मालेगाव तालुक्यातील काही गावांसह हिंगोली आणि बुलडाणा जिल्ह्यातूनही शेतमाल विकायला येतो. यामुळे दरवर्षी खरीप हंगाम संपल्यानंतर आणि रब्बी हंगाम सुरू होण्यापूर्वी प्रामुख्याने सोयाबिन विक्रेत्या शेतकºयांची बाजार समितीत तोबा गर्दी होते. यामाध्यमातून होणाºया खरेदी-विक्रीच्या उलाढालीतून बाजार समितीला लाखो रुपयांचा शेष प्राप्त होतो. असे असताना बाजार समिती प्रशासनाकडून शेतकºयांना अपेक्षित सोयी-सुविधा अद्यापपर्यंत पुरविण्यात आलेल्या नाहीत. बाजार समितीच्या आवारात असलेल्या ओट्यांवर सदोदित व्यापाºयांचाच माल पडून असतो. परिणामी, ऐन हंगामात शेतमाल विक्रीसाठी येणाºया शेतकºयांना नाईलाजास्तव त्यांचा माल रस्त्यावरच टाकावा लागतो. तशीच परिस्थिती सद्याही उद्भवली असून बाजार समितीने याकडे लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे.रिसोडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सद्य:स्थितीत सोयाबीन या मालाची आवक अचानकपणे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. ओट्यांवर जागा नसल्यानेच सदर माल रस्त्यावर ठेवला जात आहे. शेतकºयांची गैरसोय होणार नाही, याकडे विशेष लक्ष पुरविण्यात येईल.- सुमनताई माधव भुतेकरसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती

सत्ताधारी व व्यापारी यांचे संगणमत असल्यानेच व्यापाºयांचा माल ओट्यांवर; तर शेतकºयांचा माल रस्त्यावर ठेवला जात आहे. ओटे हे शेतकºयांसाठी असताना त्यांचीच गैरसोय होत असून त्यास सर्वस्वी बाजार समिती प्रशासनच जबाबदार आहे. हा प्रकार तत्काळ बंद व्हायला हवा.- डॉ. चंद्रशेखर देशमुखसंचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिम