शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

सिंचन अनुशेष कायम; शेतक-यांची दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 10:41 PM

वाशिम : जिल्ह्याचा सिंचन अनुशेष कमी होण्याऐवजी वर्षागणिक वाढत चालला आहे. सिंचनाचा अनुशेष भरून काढावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप यांनी जलसंपदा विभागाकडे शुक्रवारी केली.

ठळक मुद्देकृषी सभापतीचे जलसंपदा विभागाला निवेदन निधी उपलब्ध करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्याचा सिंचन अनुशेष कमी होण्याऐवजी वर्षागणिक वाढत चालला आहे. सिंचनाचा अनुशेष भरून काढावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप यांनी जलसंपदा विभागाकडे शुक्रवारी केली.शेतीला सिंचनाची जोड मिळावी, यासाठी शासनातर्फे प्रयत्न केले जातात. वाशिम जिल्ह्यात काही प्रकल्प निर्माण करण्यात आले. तथापि, रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीवरील बॅरेजेसचा प्रश्न अद्याप शासनाने हाती घेतला नाही. रिसोड व मालेगाव तालुक्यात सिंचनाचा सर्वाधिक अनुशेष असल्याने शेतकºयांच्या पदरी निराशा पडत आहे. शेतीला सिंचनाची जोड नसल्याने अपेक्षीत उत्पादन घेण्यात अडथळे निर्माण होत आहे. वाशिम जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष कमी करण्याच्या दृष्टिने जलसंपदा विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. वाशिम जिल्ह्यात गरजेच्या तुलनेत केवळ २५ टक्के क्षेत्रावरच सिंचनाची सोय उपलब्ध असून अधिकांश शेतजमिन यामुळे सिंचनापासून वंचित राहत आहे. जिल्ह्यात एकबुर्जी, सोनल आणि अडाण, हे तीन मध्यम आणि इतर १२२ सिंचन प्रकल्पांव्दारे शेतकºयांना रबी हंगामात सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिले जाते. ३ लाख ९२ हजार हेक्टर निव्वळ पेरणी क्षेत्रावर सिंचनाची प्रभावी सोय होणे क्रमप्राप्त आहे. पूर्ण झालेले आणि बांधकामाधिन, अशा १६१ प्रकल्पांपासून ८४ हजार २४२ हेक्टरवर सिंचन क्षमता प्रस्तावित होती. प्रत्यक्षात १३६ प्रकल्पांपासून केवळ ६० हजार ६३३ हेक्टरवरच सिंचन क्षमता निर्माण झाली. आजमितीस सिंचन अनुशेष तब्बल ५०२ कोटी रुपयांवर पोहचला आहे. जलसंपदा विभागाने सिंचन अनुशेष कमी करण्यासाठी प्रलंबित प्रकल्पांना मान्यता द्यावी, पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध करावा आणि रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीवरील बॅरेजेसचा मुद्दा हाती घ्यावा, अशी मागणी सभापती विश्वनाथ सानप यांनी केली. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी