शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

पैनगंगा नदीवरील बॅरेजेसमधून उपसा पद्धतीने सिंचन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 3:06 PM

वाशिम : जिल्ह्यातून वाहणाºया पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी उभारण्यात आलेल्या बॅरेजेसमुळे मोठ्या प्रमाणात पाणी अडविणे शक्य झाले असून हे पाणी यंदा उपसा पद्धतीने रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी पुरविले जात आहे

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातून वाहणाºया पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी उभारण्यात आलेल्या बॅरेजेसमुळे मोठ्या प्रमाणात पाणी अडविणे शक्य झाले असून हे पाणी यंदा उपसा पद्धतीने रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी पुरविले जात आहे. यामुळे पैनगंगा नदीकाठी वसलेल्या शेतकºयांच्या एकरी उत्पन्नात भरघोस वाढ होईल, असे संकेत जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांनी दिले.पैनगंगा नदीवरील बॅरेजेसमुळे आडगाव, कोकलगाव, गणेशपूर, सोनगव्हाण, टणका, ढिल्ली, राजगाव, वरूड, जुमडा, जयपूर आणि उकळी या ११ गाव परिसरांसह जिल्ह्यातील ५ हजार ५५४ हेक्टर व नजिकच्या हिंगोली जिल्ह्यातील २ हजार १३६ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे.  मात्र, बॅरेजेस परिसरात विजेची प्रभावी सुविधा अद्याप उपलब्ध झाली नसल्याने शेवटच्या शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. असे असले तरी चालूवर्षीच्या पावसाळ्यात बॅरेजेस तुडूंब भरल्याने नदीकाठच्या सर्वच शेतकºयांना रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनाकरिता उपसा पद्धतीने पाणी घेण्यास जलसंपदा विभागाने परवानगी दर्शविली. त्यामुळे शेतकºयांची सोय झाली असून एकरी उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विजेच्या पायाभूत सुविधांचा प्रश्न प्रलंबित!बॅरेजेस परिसरात विजेच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ९२ कोटी रुपयांच्या प्रस्तावास शासनाने मंजूरी दिली. तसेच २५ कोटी रुपयांचा निधीही प्राप्त झाला. मात्र, पायाभूत सुविधांचा प्रश्न अद्यापही प्रलंबितच आहे.

टॅग्स :washimवाशिमIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पriverनदी