शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

५०० एकरहून अधिक क्षेत्राला अतिवृष्टीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 11:26 AM

कारंजा, रिसोड, मालेगाव, वाशिम तालुक्यातील मिळू ५०० एकरापेक्षा अधिक क्षेत्रातील शेतजमिनींचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यंदाच्या खरीप हंगामात निसर्गाचे दृष्टचक्र शेतकऱ्यांचा पिच्छा पुरवित आहे. पावसाचा खंड, निकृ ष्ट बियाण्यांचा फटका हजारो शेतकऱ्यांना बसला असतानाच जिल्ह्यात २२ जुलैपासून हजेरी लावलेल्या पावसाने अनेक भागांत तांडव करून पिकांसह शेतजमिनीचे नुकसान केले आहे. कारंजा, रिसोड, मालेगाव, वाशिम तालुक्यातील मिळू ५०० एकरापेक्षा अधिक क्षेत्रातील शेतजमिनींचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. या नुकसानाच्या पंचनाम्यास मात्र विलंब होत असल्याने शेतकरी व्यथीत आहेत.जिल्ह्यात यंदाच्या हंगामात निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका शेतकºयांना बसत आहे. त्यात पाच जूनपासून पावसाने दडी मारली, तर १० जूनला काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली, तर बहुतांश भागांत १४ जूनपर्यंत पाऊस पडला नाही. शिवाय २२ जूननंतर पावसाने अनेक भागांत ठाणच मांडले. याच कालावधित कारंजा तालुक्यातील धनज बु., रिसोड तालुक्यातील मोप, भर जहॉगिर परिसरात अतिवृष्टीमुळे शेतजमिनी पाण्याने खरडल्या. वाशिम तालुक्यात दगड उमरा शिवारात अतिवृष्टीमुळे तलाव ओव्हर फ्लो झाल्याने शेतांत पाणी घुसले, तर मालेगाव तालुक्यातील मेडशी परिसरात २८ जून रोजी पावसाने थैमान घालून शेतजमिनीचे नुकसान केले. त्यानंतर २ जुलै रोजी रात्री दोन तास पाऊस मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे अनेक शेतकºयांच्या शेतात पाणी घुसून पिकांसह शतजमिनी खरडून गेल्या. त्यात २८ जून रोजी आलेल्या मुसळधार पावसानंतर संबंधित तलाठ्यांनी मेडशी भाग १ आणि मेडशी भाग २ या शिवारात या नुकसानाची पाहणी केली. त्यात जवळपास २० हेक्टर क्षेत्रातील जमिनी बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल त्यांनी तयार केला आहे. रिसोड तालुक्यातील मोप मंडळातही गत आठवड्यात जोरदार पाऊस पडला. त्यात नदी, नाल्या काठी असलेल्या बोरखेडी, पिंपरखेड, कन्हेरी, मोप, आसोला या पाच गावांत पावसाचे पाणी घुसल्याने शेकडो एकर शेतजमीनबाधित झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीचे पंचनामेच अद्याप पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे उपरोक्त पाच गावांत नेमके किती क्षेत्र बाधित झाले हे कळणे अशक्य आहे. आता तलाठ्यांकडून प्राप्त पंचनाम्याची पडताळणी करून शासनाकडे अहवाल सादर होण्यास विलंब लागणार आहे. त्यामुळे शेतकºयांना या नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई कधी मिळणार, असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकºयांकडून उपस्थित करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमRainपाऊसagricultureशेती