शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

पावसाळा अर्ध्यावर; प्रकल्प तहानेलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 10:58 AM

Washim News : जिल्ह्यातील प्रकल्प तहानलेलेच असून, ८४ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे.

- दादाराव गायकवाडलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यंदाचा पावसाळा अर्ध्यावर आला असून, प्रशासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यात सरासरीच्या अधिक पाऊसही पडला आहे. तथापि, अद्याप जिल्ह्यातील प्रकल्प तहानलेलेच असून, ८४ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे. मध्यम प्रकल्पांची स्थिती समाधानकारक असून, त्या ३ प्रकल्पांत ४८.४६ टक्के जलसाठा झाला आहे.जिल्ह्यात पाटबंधारे विभागांतर्गत तीन मध्यम आणि १३४ लघु प्रकल्प मिळून एकूण १३७ प्रकल्प आहेत. गतवर्षीच्या दमदार पावसामुळे यातील ९५ टक्के प्रकल्प काठोकाठ भरले होते. यंदाही जून महिन्याच्या उत्तरार्धासह जुलैच्या सुरुवातीला पावसाने दिलेला खंड वगळता दमदार पाऊस पडला आहे. विशेष म्हणजे आजवरचे पावसाचे प्रमाणही जून, जुलैमधील सरासरीपेक्षा खूप अधिक असून, १ जून ते १५ जुलैदरम्यान पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत यंदा ३० टक्के अधिक पाऊस पडला आहे. त्यामुळे प्रकल्पांच्या पातळीत मोठी वाढ अपेक्षित होती. परंतु अद्याप जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांत मिळून सरासरी केवळ ३०.४८ टक्के साठा झाला आहे. आता पावसाळ्याच्या उर्वरित कालावधीत जोरदार पाऊस न पडल्यास यंदा जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पांची पातळी निम्म्यापर्यंतही पोहोचण्याची शक्यता कमीच राहणार आहे.  

दोन लघु प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील अडोळ प्रकल्पाच्या आणि कारंजा तालुक्यातील वडगांव प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडला आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील केवळ हे दोनच प्रकल्प अर्ध्या पावसाळ्यापूर्वीच शंभर टक्के भरले असून, या दोन्ही प्रकल्पांच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्गही होत असल्याचे चित्र पाहायला मिळते. विशेष म्हणजे यंदा कारंजा तालुक्यात सर्वात कमी पाऊस पडत आहे. 

टॅग्स :washimवाशिमIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पRainपाऊस