शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

अपघातात ठार झालेल्या पाच जणांवर शोकाकूल वातावरणात अंतिम संस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 15:18 IST

शोकाकूल वातावरणात पाचही जणांवर रविवारी सायंकाळी शिरपूर, भर जहॉगीर येथे अंतिम संस्कार करण्यात आले.

ठळक मुद्देअपघाती निधनाची वार्ता भर जहागीर व शिरपूर येथे धडकताच गावावर शोककळा पसरली.२३ सप्टेंबर रोजी सर्वांवर शोकाकूल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवरांसह शेकडोच्या संख्येने परिसरातील ग्रामस्थांची उपस्थिती होती.

लोकमत न्यूज नेटवर्कभर जहागीर/शिरपूर (वाशिम) : लोणार जि. बुलडाणा येथील रविवार, २३ सप्टेंबरच्या पहाटे दरम्यान झालेल्या अपघातात भर जहागीर येथील तीन तर शिरपूर येथील दोन जण ठार झाले. या दुदैर्वी घटनेने १९ ते  २८ वयोगटातील चार महिलांचे कुंकू पुसले गेले तर सात चिमुकल्यांचे पितृछत्र हरविले. शोकाकूल वातावरणात पाचही जणांवर रविवारी सायंकाळी शिरपूर, भर जहॉगीर येथे अंतिम संस्कार करण्यात आले.सिंदखेडराजा जि. बुलडाणा येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत वाद्य वाजविण्यासाठी जात असलेल्या  बँड पार्टीच्या वाहनाला ब्राम्हण चिकना (ता. लोणार) गावाजवळ लक्झरी वाहनाची धडक बसल्याने भीषण अपघात झाला. बँड पार्टीच्या पीकअप वाहनात भर जहागीर व शिरपूर येथील एकूण १९ जण होते.  यापैकी ज्ञानेश्वर वामन डोंगरे (१९), अरूण संजय कांबळे (२२),  राजू भगवान कांबळे (२३) सर्व रा. भरजहागीर तसेच प्रवीण दशरथ कांबळे (२५) व गणेश सदाशीव बांगरे (३२) सर्व रा. शिरपूर असे पाच जण ठार झाले.मृतक ज्ञानेश्वर डोंगरे याच्या कुटुंबात केवळ आई असून, ज्ञानेश्वर हाच आईचा आधारवड होता. ज्ञानेश्वरच्या अपघाती निधनाने आई पोरकी झाली असून वृध्दापकाळातील आधारवड गेल्याने आईने एकच आक्रोश केला. मृतक अरूण कांबळे याचे गेल्यावर्षी लग्न झाले असून त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ, बहिण आहे. कुंकवाचा धनी गेल्याने पत्नीच्या आक्रोशाने उपस्थितांची मने हेलावली. कांबळे कुटुंबावर जणू आभाळच कोसळले. मृतक राजू भगवान कांबळे याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई, भाऊ व विवाहित बहिण आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबियांनी टाहो फोडला. मृतक प्रवीण कांबळे याच्या पश्चात पत्नी, तीन वर्षाचा मुलगा, आई, भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे. वाजंत्रीचे काम करून प्रवीण हा कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत होता. पत्नी व ३ वर्षीय चिमुकल्याचे छत्र हरविल्याने कुटुंब पोरके झाले. मृतक गणेश बांगरे याच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई , वडील, दोन भाऊ आहेत. मृतक गणेशची लहान मुलगी ६ महिने वयाची असून, घरातील कर्ता पुरुष गेल्याने उदरनिवार्हाचा गहण प्रश्न निर्माण झाला. अपघाती निधनाची वार्ता भर जहागीर व शिरपूर येथे धडकताच गावावर शोककळा पसरली. पाच कुटुंबियांच्या आक्रोशाने आसमंत भेदून गेला. २३ सप्टेंबर रोजी सर्वांवर शोकाकूल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांसह शेकडोच्या संख्येने परिसरातील ग्रामस्थांची उपस्थिती होती.दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्या राजू आश्रू कांबळे (२४), संजय भगवान कांबळे (१७), आकाश आत्माराम कांबळे (१८), ज्ञानेश्वर प्रल्हाद उबाळे (१८) रा. सर्व भर जहॉगीर, किशोर शेषराव जोगदंड (३०) रा. कापडसिंगी या चार जणांवर औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर प्रभू शंकर कांबळे (२२), प्रवीण गंगाराम कांबळे (१७), नितीन रमेश आठवले (१८), मंगेश शिवाजी पारवे (१८), दुर्गादास शिवाजी पारवे (२१) या पाच जणांवर जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच सज्जन आश्रू आढाव (१९), विशाल आश्रू आढाव (१६) या दोघांवर मेहकर येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. यासाठी गावातील सद्गृहस्थ, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी आर्थिक मदत केली आहे.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात