शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

अपघातात ठार झालेल्या पाच जणांवर शोकाकूल वातावरणात अंतिम संस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 15:18 IST

शोकाकूल वातावरणात पाचही जणांवर रविवारी सायंकाळी शिरपूर, भर जहॉगीर येथे अंतिम संस्कार करण्यात आले.

ठळक मुद्देअपघाती निधनाची वार्ता भर जहागीर व शिरपूर येथे धडकताच गावावर शोककळा पसरली.२३ सप्टेंबर रोजी सर्वांवर शोकाकूल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवरांसह शेकडोच्या संख्येने परिसरातील ग्रामस्थांची उपस्थिती होती.

लोकमत न्यूज नेटवर्कभर जहागीर/शिरपूर (वाशिम) : लोणार जि. बुलडाणा येथील रविवार, २३ सप्टेंबरच्या पहाटे दरम्यान झालेल्या अपघातात भर जहागीर येथील तीन तर शिरपूर येथील दोन जण ठार झाले. या दुदैर्वी घटनेने १९ ते  २८ वयोगटातील चार महिलांचे कुंकू पुसले गेले तर सात चिमुकल्यांचे पितृछत्र हरविले. शोकाकूल वातावरणात पाचही जणांवर रविवारी सायंकाळी शिरपूर, भर जहॉगीर येथे अंतिम संस्कार करण्यात आले.सिंदखेडराजा जि. बुलडाणा येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत वाद्य वाजविण्यासाठी जात असलेल्या  बँड पार्टीच्या वाहनाला ब्राम्हण चिकना (ता. लोणार) गावाजवळ लक्झरी वाहनाची धडक बसल्याने भीषण अपघात झाला. बँड पार्टीच्या पीकअप वाहनात भर जहागीर व शिरपूर येथील एकूण १९ जण होते.  यापैकी ज्ञानेश्वर वामन डोंगरे (१९), अरूण संजय कांबळे (२२),  राजू भगवान कांबळे (२३) सर्व रा. भरजहागीर तसेच प्रवीण दशरथ कांबळे (२५) व गणेश सदाशीव बांगरे (३२) सर्व रा. शिरपूर असे पाच जण ठार झाले.मृतक ज्ञानेश्वर डोंगरे याच्या कुटुंबात केवळ आई असून, ज्ञानेश्वर हाच आईचा आधारवड होता. ज्ञानेश्वरच्या अपघाती निधनाने आई पोरकी झाली असून वृध्दापकाळातील आधारवड गेल्याने आईने एकच आक्रोश केला. मृतक अरूण कांबळे याचे गेल्यावर्षी लग्न झाले असून त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ, बहिण आहे. कुंकवाचा धनी गेल्याने पत्नीच्या आक्रोशाने उपस्थितांची मने हेलावली. कांबळे कुटुंबावर जणू आभाळच कोसळले. मृतक राजू भगवान कांबळे याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई, भाऊ व विवाहित बहिण आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबियांनी टाहो फोडला. मृतक प्रवीण कांबळे याच्या पश्चात पत्नी, तीन वर्षाचा मुलगा, आई, भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे. वाजंत्रीचे काम करून प्रवीण हा कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत होता. पत्नी व ३ वर्षीय चिमुकल्याचे छत्र हरविल्याने कुटुंब पोरके झाले. मृतक गणेश बांगरे याच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई , वडील, दोन भाऊ आहेत. मृतक गणेशची लहान मुलगी ६ महिने वयाची असून, घरातील कर्ता पुरुष गेल्याने उदरनिवार्हाचा गहण प्रश्न निर्माण झाला. अपघाती निधनाची वार्ता भर जहागीर व शिरपूर येथे धडकताच गावावर शोककळा पसरली. पाच कुटुंबियांच्या आक्रोशाने आसमंत भेदून गेला. २३ सप्टेंबर रोजी सर्वांवर शोकाकूल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांसह शेकडोच्या संख्येने परिसरातील ग्रामस्थांची उपस्थिती होती.दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्या राजू आश्रू कांबळे (२४), संजय भगवान कांबळे (१७), आकाश आत्माराम कांबळे (१८), ज्ञानेश्वर प्रल्हाद उबाळे (१८) रा. सर्व भर जहॉगीर, किशोर शेषराव जोगदंड (३०) रा. कापडसिंगी या चार जणांवर औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर प्रभू शंकर कांबळे (२२), प्रवीण गंगाराम कांबळे (१७), नितीन रमेश आठवले (१८), मंगेश शिवाजी पारवे (१८), दुर्गादास शिवाजी पारवे (२१) या पाच जणांवर जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच सज्जन आश्रू आढाव (१९), विशाल आश्रू आढाव (१६) या दोघांवर मेहकर येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. यासाठी गावातील सद्गृहस्थ, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी आर्थिक मदत केली आहे.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात