शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
3
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
4
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
5
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
6
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
7
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
8
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
9
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
10
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
11
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
12
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
13
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
14
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
15
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
16
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
17
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
18
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
19
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
20
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता

दोन मंत्र्यांची भेट घेऊनही टळली नाही शेतकर्‍याची आत्महत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 2:49 AM

मानोरा (वाशिम): कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि समाजकल्याण मंत्री राजकुमार  बडोले यांची २७ नोव्हेंबर रोजी भेट घेऊन आत्महत्येचा इशारा दिल्यानंतरही,  कोणत्याही उपाययोजना न करण्यात आल्याने मानोरा तालुक्यातील सोयजना येथील  शेतकरी ज्ञानेश्‍वर नारायण मिसाळ यांनी अखेर ६ डिसेंबर रोजी यवतमाळ येथे आ त्महत्या केली. मंत्र्यांच्या भेटीसाठी ज्ञानेश्‍वर मिसाळ यांच्यासोबत गेलेले सोयजना  येथील शेतकरी आत्माराम चव्हाण यांनी हा खळबळजनक खुलासा केला आहे. 

ठळक मुद्देसोयजना येथील शेतकरी ज्ञानेश्‍वर नारायण मिसाळ यांनी ६ डिसेंबर रोजी यवतमाळ  येथे केली आत्महत्याआत्महत्येचा इशारा दिल्यानंतरही, कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीतमंत्र्यांच्या भेटीसाठी मिसाळ यांच्यासोबत गेलेले शेतकरी आत्माराम चव्हाण यांनी  केला खळबळजनक खुलासा 

बबन देशमुख । लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम): कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांची २७ नोव्हेंबर रोजी भेट घेऊन आत्महत्येचा इशारा दिल्यानंतरही,  कोणत्याही उपाययोजना न करण्यात आल्याने मानोरा तालुक्यातील सोयजना येथील  शेतकरी ज्ञानेश्‍वर नारायण मिसाळ यांनी अखेर ६ डिसेंबर रोजी यवतमाळ येथे आत्महत्या केली. मंत्र्यांच्या भेटीसाठी ज्ञानेश्‍वर मिसाळ यांच्यासोबत गेलेले सोयजना  येथील शेतकरी आत्माराम चव्हाण यांनी हा खळबळजनक खुलासा केला आहे. प्रगतशील शेतकरी म्हणून मानोरा तालुक्यात ओळख असलेले सोयजना येथील शे तकरी ज्ञानेश्‍वर नारायण मिसाळ यांनी आत्महत्येपूर्वी वेगवेगळी चार पत्रे लिहून  ठेवली आहेत. दोन्ही मुलांसाठी लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे, की ते  जगाला ओळखू शकले नाहीत, ‘‘तुम्ही लोकांना ओळखा आणि आईचा सांभाळ  करा. आई नारळासारखी आहे. वरून कठोर असली, तरी आतून गोड आहे,’’  असेही त्यांनी सांगितले. ज्ञानेश्‍वर मिसाळ यांच्यावर कर्जाचा डोंगर होता. त्यामध्ये  आयसीआयसीआय बँकेचे तीन लाख, महिंद्रा फायनान्सचे अडीच लाख आणि  जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दीड लाख रूपयांच्या कर्जाचा समावेश आहे. त्याशिवाय  त्यांनी खासगी कर्जही घेतले होते. त्यांनी २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी मंत्रालयात  जाऊन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि समाज कल्याण मंत्री राजकुमार  बडोले यांची भेट घेतली आणि त्यांना आपबिती कथन केली. खुर्चीत बसून शे तकर्‍यांच्या व्यथा कळणार नाहीत आणि समस्याही सुटणार नाहीत, असे परखड  बोल मंत्र्यांना सुनावत त्यांनी आत्महत्या करणार असल्याचा इशाराही दिला, मात्र  मंत्र्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यामुळे निराश होऊन मिसाळ  यांनी आत्महत्या केली. तीन ते चार वर्षांपासून निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे सतत ना िपकी होत असल्याने कर्ज फेडण्याची चिंता त्यांना सतावत होती. त्यांचा मोठा मुलगा  शेती सांभाळतो. तर लहान मुलगा सागर याने बीएससीची पदवी घेतल्यावर त्याचे  प्रमाणपत्र आणण्यासाठीसुद्धा ज्ञानेश्‍वर मिसाळ यांच्याकडे पैसे नव्हते. ज्ञानेश्‍वर  मिसाळ यांच्याकडे असलेल्या आठ एकर शेतीमधील संत्रा बाग पावसाअभावी  सुकली आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन व्यवसायासाठी पैसे गुंतविले.  त्यासाठी आणखी पैसे हवे असल्याने त्यांनी कोकण ग्रामीण बँकेकडे अर्जही केला;  परंतु कर्ज मिळू शकले नाही, त्यामुळे ते चिंताग्रस्त होते. त्यांनी अखेर आत्महत्येचा  मार्ग अवलंबला. 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या