शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कापूस खरेदी केंद्राच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 17:17 IST

Manora News ३ जानेवारी रोजी मानोरा येथील दिग्रस चौकात परिवर्तन शेतकरी संघटनेच्या मार्गदर्शनात शेतकºयांनी रास्तारोको आंदोलन केले. 

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा: जिल्ह्यात कापसाचे सर्वाधिक उत्पादन मानोरा तालुक्यात असतानाही या ठिकाणी सीसीआयने यंदा कापूस खरेदी केंद्र सुरू केले नाही. त्यामुळे तालुक्यातील कापूस उत्पादकांना नोंदणी करून शिलकीचा वाहनखर्च करीत कापूस  कारंजा किंवा मंगरुळपीर येथे न्यावा लागतो किंवा व्यापाºयांकडे कवडीमोल दरात विकावा लागतो. या पार्श्वभूमीवर वारंवार मागणी करूनही खरेदी केंद्र सुरू न केल्याने अखेर ३ जानेवारी रोजी मानोरा येथील दिग्रस चौकात परिवर्तन शेतकरी संघटनेच्या मार्गदर्शनात शेतकºयांनी रास्तारोको आंदोलन केले. वाशिम जिल्ह्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत मानोरा तालुक्यात कपाशीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. यंदाही मानोरा तालुक्यातील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कपाशीची पेरणी केली होती.  जिल्ह्यात गत खरीप हंगामात २८ हजार ४६ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली होती. जिल्ह्यातील एकूण कपाशी क्षेत्रापैकी ५० टक्के क्षेत्र मानोरा तालुक्यातच होते. या पिकावर विविध नैसर्गिक आपत्तीचा फटका बसल्याने उत्पादनात घट आली असताना बाजारात व्यापाºयांकडून कवडीमोल दराने कपाशीची खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकºयांकडून वारंवार मानोरा येथे शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. तथापि, सीसीआयने मंगरुळपीर आणि अनसिंग येथे कापूस खरेदी सुरू केली, तर कारंजा येथे सीसीआयचे उपअभिकर्ता म्हणून फेडरेशनने कापूस खरेदी सुरू केली. शिवाय कामरगावातही फेडरेशनचे अतिरिक्त खरेदी केंद्र सुरू करण्यात आले; परंतु मानोरा येथे शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचा विचारही करण्यात आला नाही. त्यामुळेच शेतकरी संघटनेचे वाशिम जिल्हाध्यक्ष मनोहर राठोड यांच्या नेतृत्वात शेतकºयांनी दिग्रस चौकात रास्तारोको आंदोलन केले. यात महंत संजय महाराज,नामा बंजारा, महंत रमेश महाराज, शिवसंग्राम चे किशोर राठोड,प्रा.जय चव्हाण, गजानन पवार, धर्मा आडे आदि सहभागी झाले होते. तालुक्यातील १०१७ शेतकºयांची नोंदणी मानोरा तालुक्यात कपाशीची पेरणी सर्वाधिक असून, या तालुक्यात खरेदी केंद्र नाही. त्यातही तालुक्यातील १०१७ शेतकºयांनी मानोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शासकीय खरेदी प्रक्रियेंतर्गत नोंदणी केली आहे. या शेतकºयांना मात्र कापूस विकण्यासाठी कारंजा किंवा मंगरुळपीर येथील केंद्रावर जावे लागत आहे. त्यामुळे त्यांना वाहन खर्चाचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागत आहे.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराagitationआंदोलनFarmerशेतकरी