शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येकाने वनसाक्षर होणे गरजेचे - मृण्मयी हातोलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 13:48 IST

पर्यावरण मित्र परिवाराच्या अध्यक्ष व युवा पर्यावरण अभ्यासक मृण्मयी सुभाष हातोलकर यांच्याशी साधलेला हा संवाद...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : समाजात वावरणाºया प्रत्येक नागरिकाने वनसाक्षरण होणे गरजेचे आहे. घराघरातून, शाळा-महाविद्यालयांमधून पर्यावरणाप्रती कर्तव्याचा संस्कार तळागाळात पोहचणे काळाची गरज आहे, याबद्दल आग्रही भुमिका ठेऊन कार्य करित असलेल्या मंगरूळपीर येथील पर्यावरण मित्र परिवाराच्या अध्यक्ष व युवा पर्यावरण अभ्यासक मृण्मयी सुभाष हातोलकर यांच्याशी साधलेला हा संवाद...

वृक्षलागवड वाढण्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे ?ज्याठिकाणी वृक्षलागवड करायची, तिथे पाण्याची मुबलक सोय असणे गरजेचे आहे. मातीचा थर वाहून गेलेल्या डोंगरावर तसेच खडकाळ जमिनीवर झाडे लावण्यासाठी व ती जगविण्यासाठी मृदा संवर्धन देखील तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे माती अडवा, पाणी मुरवा, झाडे जगवा ही त्रिसूत्री असलेला मृदा जल व वन संवर्धन कार्यक्रम लोकसहभागातून राबविला तरच वृक्षलागवड यशस्वी होऊ शकते.

वनक्षेत्र घटल्याने कोणते दुष्परिणाम होतात ?शेती, शहरीकरण आणि रस्त्यांमुळे वनक्षेत्रात घट झाली आहे. निसर्गाची कार्बन पचविण्याची क्षमता देखील यामुळे घटली. कार्बन उत्सर्ग घटविण्याच्या आणि कार्बन क्षमता वाढविण्याच्या कार्यात वनस्पतीची भूमिका खात्रीशील व अल्पखर्चीक मानली जाते. त्यामुळे जंगले वाचविण्याचा जगभर प्रयत्न होत आहे. असे असले तरी जंगलाचे मुख्य मात्र कुणीही समजून घेत नाही. ते समजून घेतले तर जंगल संवर्धनाकडे पाहण्याचा दृष्टीकोण अधिक सकारात्मक होईल.

जंगलाचे मुल्य म्हणजे काय ?लाकूड आणि लाकूडेत्तर वस्तूंचा पुरवठा, कार्बन शोषण आणि वन्यजिवांचा अधिवास याव्यतिरिक्त निसर्गाला जंगल परिसंस्थामधून अनेक जीवनावश्यक सेवा मिळतात. ज्या सेवामुळे पृथ्वीला सजीव सृष्टी पोसण्याची क्षमता प्राप्त होते. या सेवा जीवनावश्यक असून त्याचे मुल्यांकन झाले तरच लोकांना जंगलाचे महत्व कळणार आहे.

तुम्ही पर्यावरणविषयक करित असलेली कार्य कोणती ?पर्यावरणास पुरक व अनूकुल गावे, शहरे विकसीत होण्यासाठी तसा संकल्प करून घराघरात व शाळा-महाविद्यालयात, ग्रामपंचायत, महिला व युवा मंडळांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणासाठी जनजागृतीचे काम केले जात आहे. त्यात पर्यावरण विषयक कार्यशाळा, निसर्ग सहली, निसर्ग शिबिरे, पर्यावरणाचे पुनरूज्जीवन, जैवविविधता संवर्धन, महिला सक्षमीकरण, स्वच्छता व आरोग्यविषयक उपक्रमांचा समावेश आहे.

समाजाकडून काय अपेक्षा आहेत ?प्रत्येक माणूस हा वनसाक्षर झाला पाहिजे, त्यासाठी नव्या व जुन्या पिढीत पर्यावरणाप्रती संस्कार रुजणे आवश्यक आहे. धर्म, राजकारण, अर्थकारणापेक्षाही अधिक महत्व पर्यावरणाला देणे गरजेचे आहे. समाजातील प्रत्येकाने याबाबत सजग असायला हवे, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :washimवाशिमforestजंगलenvironmentपर्यावरण