शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा विभागात अव्वल, राज्यात पाचवा

By admin | Updated: March 28, 2015 01:56 IST

स्वच्छ भारत मिशन; एका वर्षात १५ हजाराच्यावर शौचालयांचे बांधकाम.

वाशिम : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत चालु आर्थिक वर्षाचे १५३७६ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट जिल्हा व तालुक्याच्या चमूने पूर्ण केले असून, या वर्षात १५५६२ हजार शौचालयांचे बांधकाम केले आहे. मु ख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी मागील चार महिन्यांपासून याबाबत सतत पाठपुरावा केला होता. त्यामुळे चालु आर्थिक वर्ष संपण्याआधीच शौचालय बांधकामाचे वार्षिक उद्दिष्ट जिल्ह्याने प्रथमच पूर्ण केले आहे. यामुळे वार्षिक उद्दिष्ट पूर्ण करण्यात जिल्हा विभागात अव्वल आणि राज्यात पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. जिल्हय़ातील तालुकानिहाय उद्दिष्ट व साध्य किती झाले तर यामध्ये वाशिम तालुक्यामध्ये २७४३ शौचालयाचे उद्दिष्ट होते, त्यापैकी २३0६ साध्य झाले. मालेगाव तालुक्यात २६८३ उद्दिष्टांपैकी २५२0, रिसोड तालुक्यात २0५५ उद्दिष्टांपैकी २७९0 , मंगरूळपीर तालुक्यात २३८0 उद्दिष्टांपैकी २५२२, मानोरा तालुक्यात ३0१२ उद्दिष्टांपैकी २८७१ तर कारंजा तालुक्यात २५0३ उद्दिष्ट होते, २५५३ साध्य झाले. जिल्हय़ातील १५३७६ उद्दिष्टांपैकी १५५६२ म्हणजे उद्दिष्टांपैकी जास्त झाले. याकरिता १0 कोटी ५0 लाख रूपये वाटप करण्यात आलेत. त्यामध्ये वाशिम तालुक्याला १ कोटी ५0 लाख, मालेगाव तालु क्याला ९0 लाख, रिसोड तालुक्याला २ कोटी, मंगरूळपीर तालुक्याला २ कोटी ५0 लाख, मानोरा तालुक्याला २ कोटी, कारंजा तालुक्याला २ कोटी १0 लाख रूपयांचा समावेश आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्हा परिषदेची सूत्ने हाती घेतल्यापासूनच शौचालय बांधकाम आणि अनुदान वाटपावर भर दिला होता. वारंवार तालुकानिहाय बैठका घेऊन या कामात आघाडी घेणार्‍यांना प्रोत्साहन आणि कामात कुचराई करणार्‍यांवर त्यांनी कठोर कारवाई केली होती. उ पमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे, गट विकास अधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील सरपंच, ग्राम विकास अधिकारी व ग्रामसेवकांनी युद्धपातळीवर यासाठी प्रयत्न केले होते. यामुळे उद्दिष्टांपेक्षाही जास्त काम या विभागाने केले आहे. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक राजू सरतापे, क्षमता बांधणी तज्ज्ञ प्रफुल्ल काळे, मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर आंबेकर जनसंपर्क अधिकारी राम श्रुंगारे, वित्त व संपादणूक सल्लागार सुमेर चाणेकर, माहिती, शिक्षण व संवाद सल्लागार पुष्पलता अफुणे, रवि पडघान, पाणी गुणवत्ता निरीक्षक विवेक राजुरकर यांच्यासह अनेकांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.