शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
4
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
5
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
6
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
7
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
8
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
9
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
10
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
11
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
12
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
13
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
14
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
15
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
16
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
17
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
18
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
19
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
20
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात सर्पदंशाचा आलेख चढताच!

By admin | Updated: July 24, 2014 02:08 IST

तीन वर्षात घडल्या १३५५ घटना : ३0 जण मृत्यूमुखी

संतोष मुंढे / वाशिम
गत तीन वर्षात जिल्ह्यात सर्पदंशाच्या घटनांचा आलेख चढताच आहे. तीन वर्षात जिल्ह्यातील तब्बल १३५५ व्यक्तिंना सापाने दंश केला असून, यामध्ये ३0 जणांची प्राणज्योत मालविली आहे. जिल्हा रूग्णालयाच्या आकडेवारीने यावर शिक्कामोर्तब केले असून, सर्पदंशाच्या १३२५ रुग्णांना जीवनदान देण्यात या रूग्णालयातील वैद्यकीय यंत्रणेला यश आले आहे.
पावसाळ्याला प्रारंभ होताच सर्पदंशाच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याचा आजवरचा इतिहास आहे. साधारणपणे शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात सर्पदंशाचे प्रमाण अधिक असते. उन्हाळ्यात जमिनीला पडलेल्या भेगांमध्ये दडून बसलेले साप पाऊस पडताच जमिनीबाहेर निघतात. त्यामुळेच शेतात मशागत करताना सर्पदशांचा धोका अधिक असतो. जिल्ह्यात नाग (किंग कोब्रा), नाग्यावरवळ (घोणस) , फोशी, कवळय़ानाग, मण्यार, पदमिनी, धुलनागिन या प्रजातीचे विषारी साप आढळतात. तर धामण, पाणजिवड आदी प्रमुख जातीसह जवळपास ३0 ते ३५ जातीचे बिनविषारी साप आढळतात. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार २0११ व २0१२ मध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एक हजार ७८ व्यक्तिंना सर्पदंश झाला होता; परंतु यापैकी बहुतांश रुग्णांनी उपचारासाठी जिल्हास्तरावर धाव घेतल्यामुळे आरोग्य केंद्रात एकाही सर्पबळीची नोंद नाही. जिल्हा रूग्णालयाची सर्पदंशाच्या रूग्णांवर उपचारांमध्ये जिल्हा रुग्णालयांची कामगिरी उजवी ठरली आहे. सन २0११ पासून तर २0१४ पर्यंत तब्बल १३५५ सर्पदंश झालेले रुग्ण येथे दाखल झाले होते. यामध्ये २0११ -१२ मधील ३८८ तसेच २0१२-१३ मधील ४६४ व २0१३-१४ मधील ५0३ सर्पदंश झालेल्या रुग्णांचा समावेश आहे. यापैकी केवळ ३0 रूग्णांचीच प्राणज्योत मालविली उर्वरित १३२५ रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कावरखे यांनी तीन वर्षांपूर्वी डब्ल्यू. एच. ओ. मार्फत आस्ट्रेलिया येथे सर्पदंशावर उपचाराचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या या प्रशिक्षणाचा जिल्ह्यातील सर्पदंश झालेल्या रुग्णांना चांगलाच फायदा मिळत आहे. सर्पदंश झालेल्या रुग्णांना एस.व्ही नावाचे इंजेक्शन दिल्या जाते. जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयातही ही औषध उपलब्ध आहे. साप चावल्याचे न समजणे, रुग्णालयात हलविण्यासाठी विलंब होणे, खासगीत उपचारासाठी वेळ लावणे आदी कारणांमुळेही सर्पदंशाने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या अधिक आहे.