शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

चवथ्या दिवशी आढळले ‘त्या’ दोघांचे मृतदेह

By admin | Updated: February 18, 2015 01:58 IST

काटेपूर्णा नदीत ट्रक पडून झाला होता अपघात.

मालेगाव (जि. वाशिम) : मुंबई-नागपूर हायवेवर जऊळका जवळील काटेपूर्णा नदीवरील पुलावर खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात ट्रक नदीत पडून दोन जण बेपत्ता झाल्याची घटना १४ फेब्रुवारी रोजी घडली होती. त्यावेळी ट्रकमधील दोघे जण वाचले होते. त्यापैकी बेपत्ता झालेले दोघा जणांचे मृतदेह १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान सापडले. १४ फेब्रुवारीच्या रात्री ८.३0 वाजताच्या दरम्यान अकोला जिल्हय़ातील मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथील मुकुंद नामदेव भोंबरे, भावना नामदेव भोंबरे, ङ्म्रेयस मुकुल भोंबरे व ट्रक चालक सचिन इंगळे हे मूर्ती बनविण्यासाठी येत असलेली पावडर व मोटारसायकलसह इतर साहित्य घेऊन पुणे येथे जात होते. काटेपूर्णा नदीनजीक खड्डा चुकविण्याच्या नादात ट्रक नदीत पुलावरून खाली कोसळला. त्यामध्ये मुकुंद नामदेव भोंबरे व भावना नामदेव भोंबरे हे वाचले मात्र त्यांचा मुलगा ङ्म्रेयस व वाहनचालक इंगळे मात्र आढळले नाही. त्यानंतर महान-पिंजर, वाशिम येथील आपत्कालीन बचावपथकाने शोधकार्य केले. दरम्यान, ट्रक बाहेर काढला. त्यावेळी दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प झाली होती. त्यामध्ये यश येत नव्हते म्हणून १६ फेब्रुवारीला दुपारी रास्ता रोको करण्यात आला होता. त्यावेळी मूर्तीजापूरचे आ. हरिष पिंपळे, जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी, तहसीलदार जे.आर. बियाते यांच्यासह अनेक अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी भेटी दिल्या; मात्र अपयश येत होते. सतत तीन दिवसांपासून क्रेनद्वारे, बचाव पथकाद्वारे बेपत्ता दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रशासनाच्यावतीने करण्यात आला; मात्र अपयश आल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केल्या जात होता. आज अखेर १७ फेब्रुवारी रोजी त्यांचे मृतदेह होडीने पाणी हलवले त्यावेळी सापडले, अशी माहिती पोलीस प्रशासनातर्फे पो.कॉ. प्रेमदास आडे यांनी सांगितले. त्या पुलावरून वारंवार अपघात होतात, त्यामुळे आता तरी त्या पुलाची उंची वाढविण्याची मागणी येथील उपस्थित नागरिकांकडून करण्यात येत आहे.