शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

धरणे कोरडीच; मत्स्यव्यवसाय सापडला संकटात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 14:43 IST

जुलै महिना अर्धा संपत आला असतानाही अद्यापपर्यंत दमदार पाऊस न झाल्याने मत्स्यउत्पादक संस्थांसह मत्स्यविक्रेतेही चिंतातूर झाले आहेत.

ठळक मुद्दे जिल्ह्यात प्रामुख्याने कतला, सायप्रनस, रोहू, मिरगल नामक माशांचे उत्पादन होते.बोटावर मोजण्याइतक्या धरणांचा अपवाद वगळता बहुतांश धरणे कोरडी असल्याने बिज सोडण्याची प्रक्रिया खोळंबली आहे. अपेक्षित जलसाठा न झाल्यास मत्स्योत्पादनावर मोठा परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मत्सव्यवसायाकरिता राखीव ठेवल्या जाणाऱ्या धरणांमध्ये साधारणत: जुलै महिन्यात मत्स्यबिज टाकले जाते. यंदा मात्र हा महिना अर्धाअर्धा संपत आला असतानाही अद्यापपर्यंत जोरदार पाऊस झाला नसल्याने धरणे कोरडीच आहेत. यामुळे जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय संकटात सापडला असून त्यावर विसंबून असणारी हजारो कुटूंब चिंताग्रस्त झाली आहेत.जिल्ह्यात लघू आणि मध्यम अशी एकंदरित १३४ धरणे आहेत. त्यापैकी सुमारे १०० धरणांमध्ये दरवर्षी मत्स्यपालन केले जाते. ज्या अधिकृत संस्थांना मत्स्यपालनाकरिता ही धरणे दिली जातात, त्यांच्याकडून साधारणत: जुलै महिन्यात धरणांमध्ये मत्स्यबिज सोडले जाते. यावर्षी मात्र जिल्ह्यात पावसाने दडी मारली असून जुलै महिना अर्धा संपत आला असतानाही अद्यापपर्यंत दमदार पाऊस न झाल्याने मत्स्यउत्पादक संस्थांसह मत्स्यविक्रेतेही चिंतातूर झाले आहेत.मत्स्योत्पादनासंबंधी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात प्रामुख्याने कतला, सायप्रनस, रोहू, मिरगल नामक माशांचे उत्पादन होते. त्याचे बिज साधारणत: जुलै महिन्याच्या सुरूवातीपासून आॅगस्ट महिन्याच्या १५ तारखेपर्यंत धरणांमध्ये सोडल्यास माशांची नैसर्गिकरित्या चांगली वाढ होणे शक्य आहे; मात्र यंदा बोटावर मोजण्याइतक्या धरणांचा अपवाद वगळता बहुतांश धरणे कोरडी असल्याने बिज सोडण्याची प्रक्रिया खोळंबली आहे. दरम्यान, आगामी काही दिवसांत संततधार पाऊस होऊन धरणांमध्ये अपेक्षित जलसाठा न झाल्यास मत्स्योत्पादनावर मोठा परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शासकीय मत्स्यबिज केंद्राचा जिल्ह्यात अभाव!वाशिमला जिल्ह्याचा दर्जा मिळून २१ वर्षे होत असतानाही जिल्ह्यात अद्यापपर्यंत शासकीय मत्स्यबिज केंद्र सुरू झालेले नाही. अकोला आणि वाशिम असे दोन जिल्हे मिळून महानच्या धरणाजवळ असलेल्या शासकीय मत्स्यबिज केंद्रावरून काही संस्था मत्स्यबिज खरेदी करतात; परंतु पुरेशा प्रमाणात बिज मिळत नसल्याने अनेकांना नाईलाजास्तव छत्तीसगड, आंध्रप्रदेश आणि हावडा येथील खासगी कंपन्यांकडून मत्स्यबिज खरेदी करावे लागते. यात पैसा आणि वेळ दोन्हींचा अपव्यय होत असून वाशिममध्ये शासकीय मत्स्यबिज केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे.

 

माशांच्या दर्जेदार उत्पादनासाठी साधारणत: जुलै महिन्यात धरणांमध्ये बिज टाकले जाणे आवश्यक असते. यंदा मात्र सर्वच धरणे कोरडी असल्याने ते अशक्य झाले. गतवर्षी देखील धरणांमध्ये उशिराने जलसाठा झाल्याने मत्स्योत्पादनात ३० टक्के घट झाली होती.- सुरेश भारतीसहायक आयुक्तमत्स्यव्यवसाय विभाग, वाशिम

टॅग्स :washimवाशिमDamधरणfishermanमच्छीमार