शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

धरणे कोरडीच; मत्स्यव्यवसाय सापडला संकटात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 14:43 IST

जुलै महिना अर्धा संपत आला असतानाही अद्यापपर्यंत दमदार पाऊस न झाल्याने मत्स्यउत्पादक संस्थांसह मत्स्यविक्रेतेही चिंतातूर झाले आहेत.

ठळक मुद्दे जिल्ह्यात प्रामुख्याने कतला, सायप्रनस, रोहू, मिरगल नामक माशांचे उत्पादन होते.बोटावर मोजण्याइतक्या धरणांचा अपवाद वगळता बहुतांश धरणे कोरडी असल्याने बिज सोडण्याची प्रक्रिया खोळंबली आहे. अपेक्षित जलसाठा न झाल्यास मत्स्योत्पादनावर मोठा परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मत्सव्यवसायाकरिता राखीव ठेवल्या जाणाऱ्या धरणांमध्ये साधारणत: जुलै महिन्यात मत्स्यबिज टाकले जाते. यंदा मात्र हा महिना अर्धाअर्धा संपत आला असतानाही अद्यापपर्यंत जोरदार पाऊस झाला नसल्याने धरणे कोरडीच आहेत. यामुळे जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय संकटात सापडला असून त्यावर विसंबून असणारी हजारो कुटूंब चिंताग्रस्त झाली आहेत.जिल्ह्यात लघू आणि मध्यम अशी एकंदरित १३४ धरणे आहेत. त्यापैकी सुमारे १०० धरणांमध्ये दरवर्षी मत्स्यपालन केले जाते. ज्या अधिकृत संस्थांना मत्स्यपालनाकरिता ही धरणे दिली जातात, त्यांच्याकडून साधारणत: जुलै महिन्यात धरणांमध्ये मत्स्यबिज सोडले जाते. यावर्षी मात्र जिल्ह्यात पावसाने दडी मारली असून जुलै महिना अर्धा संपत आला असतानाही अद्यापपर्यंत दमदार पाऊस न झाल्याने मत्स्यउत्पादक संस्थांसह मत्स्यविक्रेतेही चिंतातूर झाले आहेत.मत्स्योत्पादनासंबंधी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात प्रामुख्याने कतला, सायप्रनस, रोहू, मिरगल नामक माशांचे उत्पादन होते. त्याचे बिज साधारणत: जुलै महिन्याच्या सुरूवातीपासून आॅगस्ट महिन्याच्या १५ तारखेपर्यंत धरणांमध्ये सोडल्यास माशांची नैसर्गिकरित्या चांगली वाढ होणे शक्य आहे; मात्र यंदा बोटावर मोजण्याइतक्या धरणांचा अपवाद वगळता बहुतांश धरणे कोरडी असल्याने बिज सोडण्याची प्रक्रिया खोळंबली आहे. दरम्यान, आगामी काही दिवसांत संततधार पाऊस होऊन धरणांमध्ये अपेक्षित जलसाठा न झाल्यास मत्स्योत्पादनावर मोठा परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शासकीय मत्स्यबिज केंद्राचा जिल्ह्यात अभाव!वाशिमला जिल्ह्याचा दर्जा मिळून २१ वर्षे होत असतानाही जिल्ह्यात अद्यापपर्यंत शासकीय मत्स्यबिज केंद्र सुरू झालेले नाही. अकोला आणि वाशिम असे दोन जिल्हे मिळून महानच्या धरणाजवळ असलेल्या शासकीय मत्स्यबिज केंद्रावरून काही संस्था मत्स्यबिज खरेदी करतात; परंतु पुरेशा प्रमाणात बिज मिळत नसल्याने अनेकांना नाईलाजास्तव छत्तीसगड, आंध्रप्रदेश आणि हावडा येथील खासगी कंपन्यांकडून मत्स्यबिज खरेदी करावे लागते. यात पैसा आणि वेळ दोन्हींचा अपव्यय होत असून वाशिममध्ये शासकीय मत्स्यबिज केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे.

 

माशांच्या दर्जेदार उत्पादनासाठी साधारणत: जुलै महिन्यात धरणांमध्ये बिज टाकले जाणे आवश्यक असते. यंदा मात्र सर्वच धरणे कोरडी असल्याने ते अशक्य झाले. गतवर्षी देखील धरणांमध्ये उशिराने जलसाठा झाल्याने मत्स्योत्पादनात ३० टक्के घट झाली होती.- सुरेश भारतीसहायक आयुक्तमत्स्यव्यवसाय विभाग, वाशिम

टॅग्स :washimवाशिमDamधरणfishermanमच्छीमार