शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात २५० रुपयांनी वाढला सिलिंडर; सबसिडी मात्र कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:28 IST

कोरोनाच्या काळात घरगुती इंधनाचे दर सातत्याने वाढत चालले आहेत. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात इंधनाचा दर साडेपाचशे रुपयांच्या आसपास होता. ...

कोरोनाच्या काळात घरगुती इंधनाचे दर सातत्याने वाढत चालले आहेत. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात इंधनाचा दर साडेपाचशे रुपयांच्या आसपास होता. त्यानंतर गेल्या नोव्हेंबरपासून आतापर्यंत दरात सातत्याने वाढ होत आहे. सर्वांत जास्त वाढ ही मार्च महिन्यात करण्यात आली होती. त्यात फेब्रुवारी महिन्यात ७२४.५० रुपये दराने गॅस मिळत होता. तर मार्च महिन्यात हाच दर ८२४.५० रुपये झाला. एकाच महिन्यात सरकारने या दरात १०० रुपयांची वाढ केली आहे, तर वर्षभरात सिलिंडर ३०० रुपयांनी महागला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने गॅससोबतच इतर इंधनांच्या दरातदेखील सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशावर त्याचा ताण पडत आहे. गॅससोबतच पेट्रोल आणि डिझेलचे दरदेखील वाढतच आहेत.

------------------

आता पुन्हा चूल पेटवायची का?

सरकारने उज्ज्वला योजनेत सामान्यांसाठी गॅस कनेक्शन मोफत दिले. त्यानंतर गॅसचे दर वाढायला सुरुवात झाली. आधी गॅस सिलिंडरवर सबसिडी मिळत होती. नंतरच्या काळात ही सबसिडीदेखील बंद करण्यात आली. त्यामुळे ज्यांनी उज्ज्वला योजनेत गॅस कनेक्शन घेतले, त्यांच्या घरात आता पुन्हा चूल पेटवायची वेळ आली आहे. कारण गरीब घरांमध्ये ८५५ रुपये दराने गॅस परवडेल कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे,

----------------

असे वाढले दर

महिना सिलिंडरचे दर सबसिडी

जुलै २०२० - ५९९.५० --

ऑगस्ट - ५९९.५० --

सप्टेंबर - ५९९.५० --

ऑक्टोबर - ५९९.५० --

नोव्हेंबर - ५९९.५० ०४

डिसेंबर -६४९.०० ०४

जानेवारी २०२१ -६९९.५० ०४

फेब्रुवारी -७२४.५० ०३

मार्च -८२४.५० ०३

एप्रिल -८१४.५० ०३

मे -८१४.५० ०३

जून -८१४.५० ०४

जुलै -८५५.०० --

-----------------------------

प्रतिक्रिया

शहरात चूलही पेटविता येत नाही.

१) कोट: सिलिंडर आणि जीवनाश्यक वस्तूंची होणारी दरवाढ गृहिणींसाठी चिंतेचा विषय झाला आहे. भाजीपाला, पेट्रोलच्या भाववाढीने त्यात भर टाकली आहे. कुटुंबाचे उत्पन्न कमी झाले. त्यात शहरात चूलही पेटविता येत नसून, सरकार भाववाढ करून समस्या अधिकच वाढवत आहे.

- संगीता मोरे, गृहिणी

-----------------------

२) कोट: सिलिंडरच्या किमती कमी करण्याऐवजी वाढवून सरकार सर्वसामान्यांवर दडपण आणत आहे. सर्व वस्तूंच्या दरवाढीने गृहिणी त्रस्त आहेत. प्रत्येक महिन्याला गॅस खरेदी करताना वस्तूंचे दर वाढलेले असतात. सामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे आता चूल पेटवावी कोठे, असा प्रश्न आहे.

- शबनम परसूवाले, गृहिणी