शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

वर्षभरात २५० रुपयांनी वाढला सिलिंडर; सबसिडी मात्र कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:28 IST

कोरोनाच्या काळात घरगुती इंधनाचे दर सातत्याने वाढत चालले आहेत. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात इंधनाचा दर साडेपाचशे रुपयांच्या आसपास होता. ...

कोरोनाच्या काळात घरगुती इंधनाचे दर सातत्याने वाढत चालले आहेत. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात इंधनाचा दर साडेपाचशे रुपयांच्या आसपास होता. त्यानंतर गेल्या नोव्हेंबरपासून आतापर्यंत दरात सातत्याने वाढ होत आहे. सर्वांत जास्त वाढ ही मार्च महिन्यात करण्यात आली होती. त्यात फेब्रुवारी महिन्यात ७२४.५० रुपये दराने गॅस मिळत होता. तर मार्च महिन्यात हाच दर ८२४.५० रुपये झाला. एकाच महिन्यात सरकारने या दरात १०० रुपयांची वाढ केली आहे, तर वर्षभरात सिलिंडर ३०० रुपयांनी महागला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने गॅससोबतच इतर इंधनांच्या दरातदेखील सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशावर त्याचा ताण पडत आहे. गॅससोबतच पेट्रोल आणि डिझेलचे दरदेखील वाढतच आहेत.

------------------

आता पुन्हा चूल पेटवायची का?

सरकारने उज्ज्वला योजनेत सामान्यांसाठी गॅस कनेक्शन मोफत दिले. त्यानंतर गॅसचे दर वाढायला सुरुवात झाली. आधी गॅस सिलिंडरवर सबसिडी मिळत होती. नंतरच्या काळात ही सबसिडीदेखील बंद करण्यात आली. त्यामुळे ज्यांनी उज्ज्वला योजनेत गॅस कनेक्शन घेतले, त्यांच्या घरात आता पुन्हा चूल पेटवायची वेळ आली आहे. कारण गरीब घरांमध्ये ८५५ रुपये दराने गॅस परवडेल कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे,

----------------

असे वाढले दर

महिना सिलिंडरचे दर सबसिडी

जुलै २०२० - ५९९.५० --

ऑगस्ट - ५९९.५० --

सप्टेंबर - ५९९.५० --

ऑक्टोबर - ५९९.५० --

नोव्हेंबर - ५९९.५० ०४

डिसेंबर -६४९.०० ०४

जानेवारी २०२१ -६९९.५० ०४

फेब्रुवारी -७२४.५० ०३

मार्च -८२४.५० ०३

एप्रिल -८१४.५० ०३

मे -८१४.५० ०३

जून -८१४.५० ०४

जुलै -८५५.०० --

-----------------------------

प्रतिक्रिया

शहरात चूलही पेटविता येत नाही.

१) कोट: सिलिंडर आणि जीवनाश्यक वस्तूंची होणारी दरवाढ गृहिणींसाठी चिंतेचा विषय झाला आहे. भाजीपाला, पेट्रोलच्या भाववाढीने त्यात भर टाकली आहे. कुटुंबाचे उत्पन्न कमी झाले. त्यात शहरात चूलही पेटविता येत नसून, सरकार भाववाढ करून समस्या अधिकच वाढवत आहे.

- संगीता मोरे, गृहिणी

-----------------------

२) कोट: सिलिंडरच्या किमती कमी करण्याऐवजी वाढवून सरकार सर्वसामान्यांवर दडपण आणत आहे. सर्व वस्तूंच्या दरवाढीने गृहिणी त्रस्त आहेत. प्रत्येक महिन्याला गॅस खरेदी करताना वस्तूंचे दर वाढलेले असतात. सामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे आता चूल पेटवावी कोठे, असा प्रश्न आहे.

- शबनम परसूवाले, गृहिणी