शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

निम्म्या ग्रामीण बसगाड्यांसह मुक्कामी जाणाऱ्या बसही बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:29 IST

००००००००००००००००००० या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत : १) शहरी भागात जाणाऱ्या गाड्या फुल्ल मंगरूळपीर आगारांतर्गत ग्रामीण भागांतील दिवसा ...

०००००००००००००००००००

या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत :

१) शहरी भागात जाणाऱ्या गाड्या फुल्ल

मंगरूळपीर आगारांतर्गत ग्रामीण भागांतील दिवसा धावणाऱ्या बस बंद असताना शहरी भागांत जाणाऱ्या बसगाड्या मात्र जाेरात सुरू आहेत. या बसगाड्यांत अनेकदा क्षमतेपेक्षा ५ ते ६ प्रवासी अधिकच असतात. प्रवाशांना बसायला जागाही मिळत नाही. कारंजा, वाशिम, अकोला, मानोरा या चारही प्रमुख मार्गांवर शहरी भागात जाणाऱ्या बसगाड्या हाऊसफुल्ल असतात.

००००००००००००००००

२) ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्यांतही जागा मिळेना

शहरी भागांत जाणाऱ्या बसगाड्या फुल्ल असताना ग्रामीण भागांतील तीन बसगाड्या मात्र बंदच असून, रामगाव, वटफळ, अनसिंग या मार्गांवरील तीन बसफेऱ्याच सुरू आहेत. ग्रामीण बसफेऱ्यांची संख्या कमी असल्याने या बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी चढतात. त्यामुळे अनेकांना बसायला जागाही मिळत आहे. शहरी भागांत जाणाऱ्या बसगाड्यातही ग्रामीण प्रवासी असतात.

०००००००००००००००

३) मुक्कामी जाणाऱ्या तीन गाड्यांचे काय?

जिल्ह्यातील चारीही आगारांत मुक्कामी जाणाऱ्या बसगाड्यांचे प्रमाण कमी झाले आहे. मंगरूळपीर आगारात ग्रामीण भागांत मुक्कामी जाणाऱ्या बस बंद असल्या तरी या गावांत सकाळी, सायंकाळी नियमित फेरी सोडली जात आहे; परंतु काही गावांत मात्र ही सुविधाही नसल्याने संबंधित गावांतील अनेक प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.

००००००००००००००००

४) मुक्कामी गाडी येत नसल्याने त्रास (दोन प्रवाशांच्या प्रतिक्रिया)

कोट

पूर्वी मंगरूळपीर आगाराची बोरव्हा ही मुक्कामी बस रात्री आठ वाजता गावात पोहोचायची. त्यामुळे शहरात काम आटोपून याच बसने गावी यायला, तर सकाळी शहरात जायला आधार होता. आता ही बस बंद असल्याने खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो.

- नारायण ठाकरे,

व्यावसायिक, बोरव्हा

००००००००००००००००००००००००

कोट

मंगरूळपीर आगाराची बोरव्हा येथे मुक्कामी जाणारी बस आम्हाला सकाळच्या प्रवासासाठी सोयीची होती. सकाळी शहरात कामावर वेळेत पोहोचणे या बसमुळे शक्य होत असे. आता ती बंद असल्याने ऑटोरिक्षाची प्रतीक्षा करावी लागते.

- मारुती देवरे,

प्रवासी, कोठारी

आगारप्रमुखांचा कोट

कोट

मंगरूळपीर आगारात उपलब्ध बसगाड्यांतून फेऱ्यांचे नियोजन केले जात आहे. गाड्यांची संख्या कमी असतानाच ग्रामीण भागात अपेक्षित प्रमाणात प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने काही फेऱ्या सोडणे शक्य नाही. तथापि, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी काही गावांत पर्याय म्हणून बसफेऱ्या सोडल्या जात आहेत.

-ए. के. मिर्झा,

आगार व्यवस्थापक, मंगरूळपीर