शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
4
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
5
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
7
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
8
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
9
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
10
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
11
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
14
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
15
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

अडाण प्रकल्पातील जलसाठा भागवतोय २५ गावांची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 3:14 PM

इंझोरी (वाशिम): जिल्हाभरात पाणीटंचाईमुळे हाहाकार उडाला असला तरी, कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्प मात्र सध्याही कारंजाशहरासह २५ गावांची तहान भागवित आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क इंझोरी (वाशिम): जिल्हाभरात पाणीटंचाईमुळे हाहाकार उडाला असला तरी, कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्प मात्र सध्याही कारंजाशहरासह २५ गावांची तहान भागवित आहे. तथापि, आता या प्रकल्पातील पातळीत झपाट्याने घट होत असल्याने पुढील वर्षी अपुरा पाऊस पडल्यास या प्रकल्पावर अवलंबून गावांतही पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची भिती आहे.जिल्ह्यातून वाहणाºया आणि मोठ्या नद्यांपैकी एक असलेल्या अडाण नदीवर वाशिम जिल्ह्याच्या अगदी टोकावर कारंजा तालुक्यात मानोरा तालुक्यातील इंझोरी परिसरात जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मध्यम प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा उद्देश सिंचन व पाणीपुरवठा हा आहे. या प्रकल्पाची उंची पायथ्यापासून सुमारे ३०.१३ मी (९८.९ फूट) आणि लांबी ७५५ मी (२,४७७ फूट) इतकी आहे. या प्रकल्पाची साठवणक्षमता ५.०४़१०१३ घन फूट असून पूर्ण भरण क्षमता २.७६५८४५़१०१५ घन फूट इतकी आहे. हा प्रकल्प गोदावरीच्या खोºयात येतो. या प्रकल्पावर शेकडो हेक्टर क्षेत्रात सिंचनही केले जाते. यात वाशिम जिल्ह्यासह यवतमाळ जिल्ह्यातील शेतकºयांनाही फायदा होतो. निर्मितीपासून आजवरही या प्रकल्पाच्या भरवशावर असलेल्या शहरांत पाणीटंचाईची समस्या फारशी जाणवली नाही. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्यावतीने या प्रकल्पातून कारंजा शहराची तहान भागविली जाते, तसेच २४ गावे पाणी पुरवठा योजनेंतर्गत कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार परिसरातील ८ गावे आणि मानोरा तालुक्यातील १६ गावांची तहान भागविली जाते. रखरखत्या उन्हामुळे जिल्ह्यातील ८० प्रकल्प कोरडे पडले असताना आणि उर्वरित प्रकल्पांनी तळ गाठला असताना अडाण प्रकल्पात २० टक्क्यांपर्यंत जलसाठा आहे. त्यामुळेच या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या कारंजा शहरासह २४ गावांत मुबलक पाणी पुरवठा होत आहे. गाळ उपसा करण्याची गरजगेल्या अनेक वर्षांपासून अडाण प्रकल्पाची पातळी कधीही १५ टक्क्यांच्या खाली गेली नाही. दरवर्षीच्या पावसाळ्यात नदीत वाहून येणारा गाळ या प्रकल्पात साचल्याने प्रकल्पाची साठवण क्षमता कमी झाली आहे. काही शेतकरी स्वयंस्फूर्तीने या प्रकल्पाच्या कोरड्या भागातून गाळाचा उपसा करीत असले तरी, त्याचा म्हणावा तेवढा फायदा खोलीकरणास होत नाही. त्यामुळे शासनाने गाळयुक्त शिवार, गाळमूक्त धरण अभियानांतर्गत या प्रकल्पातील गाळाचा त्वरीत उपसा करून शेतकºयांना गाळ नेण्यास प्रोत्साहीत करण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :WaterपाणीwashimवाशिमKaranjaकारंजा