शहरं
Join us  
Trending Stories
1
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
2
“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका
3
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
4
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळं मिटेल"; 'बाळा'च्या आजोबांसोबत आलेल्या व्यक्तीची पोलीस आयुक्तालयातच मुजोरी
5
“अन्याय करु नका, तुम्हाला विधानसभा निवडणुकीत पाडल्याशिवाय राहणार नाही”; मनोज जरांगेंचा इशारा
6
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
7
Tarot Card: येत्या आठवड्यात आव्हानं अनेक आहेत, पण चिंतन करा, चिंता नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
Stock Market Opening Bell: २३००० पर्यंत जाऊन घसरला Nifty, 'या' शेअर्समध्ये नफावसूली; ३९.७ हजार कोटी बुडाले
9
Success Story: ६ वर्ष पत्नीच्या पगारातून चालवलं घर, छोट्या खोलीतून सुरू केला बिझनेस; आज २.९ अब्ज डॉलर्सची आहे नेटवर्थ
10
तिसरी ते बारावीची सर्व पाठ्यपुस्तके बदलणार; आराखडा तयार, नागरिकांकडून 3 जूनपर्यंत मागविल्या सूचना
11
पोर्शे कार अपघात : पोलिसांनी बाळाच्या बापाला सोबत घेऊन घेतली घराची झडती; सुरेंद्रकुमारला दिवसभर ठेवले बसवून
12
Anil Ambani News : दिवाळखोर अनिल अंबानी १५ दिवसांत कुठून देणार ₹२५९९ कोटी, कोणती नोटीस देतेय टेन्शन?
13
आजचे राशीभविष्य: कामे निर्विघ्नपणे होतील, अचानक धनलाभ योग; अलौकिक अनुभूती लाभेल
14
रोहितच्या MI ने जे दोनदा करून दाखविले ते SRH ला जमेल का? आज क्वालिफायर २ सामना, फायनल जिंकेल का...
15
धनदेवता कुबेराचे ‘हे’ एक स्तोत्र म्हणा, शुभ-लाभ मिळवा; अपार धनलाभ, लक्ष्मीची विशेष कृपा!
16
१ वर्षांनी अद्भूत राजयोग: ६ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, पद-पैसा वाढेल; संपत्तीत शुभ-लाभ!
17
आंध्रातून ‘गुड न्यूज’; आता लक्ष यूपी, महाराष्ट्रासह काही राज्यांत जागा घटण्याच्या अहवालांमुळे भाजपने बदलली रणनीती
18
"आमचे कोणाशीही वैर नाही, मी आईसाठी मते मागण्याकरिता आलो आहे"; आई मनेकांच्या विजयासाठी वरुण मैदानात
19
खासदार फुटण्याचा आपसमोर मोठा धोका; चौकशीचा ससेमिरा, पक्ष आतापर्यंतच्या सर्वांत वाईट काळातून जातोय
20
अग्निवीरवर बोलू नका म्हणणे अतिशय चुकीचे; पी. चिदंबरम यांची निवडणूक आयोगावर टीका

तक्रारीअभावी ५ हजार शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 12:29 PM

Washim Agriculture News ५ हजार शेतकऱ्यांनी १५ दिवसही तक्रार न केल्याने त्यांना आता पीकविम्यापासून वंचित राहावे लागणार आहे. 

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाच्या खरीप हंगामात परतीच्या पावसाने सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. नुकसान भरपाईसाठी ७२ तासां  कृषी विभाग किंवा पीकविमा कंपनीच्या ऑनलाईन पोर्टलवर तक्रार करणे आवश्यक असताना जवळपास ५ हजार शेतकऱ्यांनी १५ दिवसही तक्रार न केल्याने त्यांना आता पीकविम्यापासून वंचित राहावे लागणार आहे. खरीप हंगामातील पिकांना यावर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने मोठा फटका बसला. त्यात काढणी पश्चात सोयाबीनचे नुकसान खूप झाले. या पिकासाठी जिल्ह्यातील १४६६३९ शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता.  परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची पीकविम्यातून भरपाई करण्यासाठी कृषी विभाग आणि पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांना ७२ तासांत ऑनलाईन पोर्टलवर किंवा ऑफलाईन पद्धतीने कृषी विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन केले. त्यानंतर पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांपैकी ११५९४ शेतकऱ्यांनी सोयाबीनचे नुकसान झाल्याबाबत कृषी विभाग किंवा पीकविमा कंपनीकडे तक्रारी केल्या आहेत. 

नुकसानाचे ९३ टक्के पंचनामे  जिल्ह्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानापोटी पीकविमा मिळण्यासाठी ११५०४ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर पीकविमा कंपनीकडून नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी जिल्हाभरात १०३ प्रतिनिधींची नियुक्ती केली. या प्रतिनिधींनी गावागावात पोहोचत पंचनाम्यांना वेग दिला. तथापि, तांत्रिक अडचणींमुळे आजवर ९३ टक्केच पंचनामे होऊ शकले. 

पीकविमा भरणाऱ्या ज्या शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने नुकसान झाले. त्यांना पीकविम्याचा लाभ देण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले. या संदर्भात १४६५३९ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. निकषानुसार त्यांनाच पीकविम्याचा लाभ मिळेल.  -शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती