शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

वसई-विरार महापलिकेचा ग्रामस्थांना करवाढ झटका, ४० टक्के घरपट्टी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 05:41 IST

ग्रामपंचायतीतून महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमध्ये वसई विरार महापालिकेने ४० टक्के करवाढ केली आहे. टप्याटप्याने हीच करवाढ शहरी भागाप्रमाणेच केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : ग्रामपंचायतीतून महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमध्ये वसई विरार महापालिकेने ४० टक्के करवाढ केली आहे. टप्याटप्याने हीच करवाढ शहरी भागाप्रमाणेच केली जाणार आहे. दुसरीकडे, शिक्षण कर, विश्ोष स्वच्छता कर आणि इतर मालमत्ता करा इतक्याच रक्कमेची बिले इतर कराची म्हणून पाठवून गोंधळ उडवून दिला आहे.५३ गावांचा महापालिकेत समावेश करण्यात आल्यानंतर वसईत मोेठे आंदोलन उभे राहिले होते. महापालिका विरोधात त्यावेळी घरपट्टीत मोठी वाढ होईल, असाही महत्वाचा मुद्दा होता. तेव्हा गावातील घरपट्टी वाढणार नाही, अशी ग्वाही सत्ताधाºयांकडून देण्यात आली होती. तर २९ गावे वगळण्याचे सध्या न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणात ही गावे सामावून घेतल्यानंतर कुठल्याही प्रकारची करवाढ केली जाणार नाही असेही आश्वासन सत्ताधाºयांकडून देण्यात आले होते. मात्र, सत्ताधाºयांचा हा दावा आता फोल ठरला आहे.महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांसाठी केलेली करवाढ शासनाच्या धोरणानुसारच करण्यात आल्याचे आता महापालिकेकडून सांगितले जात आहे. यंदा ४० टक्के करवाढ करण्यात आलेली आहे. यापुढे टप्याटप्याने करवाढ केली जाणार आहे. पुढील वर्षी ६० टक्के, त्यानंतर ८० टक्के आणि शेवटी १०० टक्के वाढीव कर आकारण्यात येणार आहे. शहरातील इतर नागरीकांकडून जसा कर आकारला जातो, त्याच पद्धतीने गावांमध्ये कर आकारण्यात येणार आहे. यावर्षीपासून गावकºयांना सध्यापेक्षा दुप्पट कराची बिले पाठवण्यात आल्याने गावकरी अस्वस्थ झाले आहेत.या वाढीव घरपट्टीला गावातून आता विरोधाचा सूर निघू लागला आहे. माजी नगरसेविका फ्लेविना पेगाडो, भाजपा जिल्हा सरचिटणीस रिक्सन तुस्कानो, भाजपा अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष विजय तुस्कानो, डेरीक डाबरे, एवरेस्ट डाबरे यांनी घरपट्टी भरू नये, असे आवाहन गावकºयांना केले आहे.दुसरीकडे, मालमत्ता कराच्या बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ घालण्यात आल्याने लोकांमध्येही नाराजी उमटू लागली आहे. करदात्यांना पाठवलेल्या बिलामध्ये घरपट्टी रकमेच्या ५० टक्के इतका शिक्षण कर, विशेष स्वच्छता कर व इतर कर मिळून मालमत्ता करा इतकीच रक्कम इतर कर म्हणून आकारण्यात आली आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांना दुप्पटीहून अधिक रकमेची बिले पाठवून घरपट्टी विभागाने गोंधळ घातल्याची तक्रार भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी केली आहे.महापालिकेने करदात्यांना दिलेली चुकीची बिले तातडीने परत घ्यावीत. ज्यांनी जास्त रक्कम भरली आहे, त्यांना पुढील बिलामध्ये वाढीव रकमेचा परतावा द्यावा. या गोंधळास जबाबदार असणाºयांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार