शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

आचारसंहितेच्या अंमलासाठी आयोगाचे अ‍ॅप वापरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 04:17 IST

जिल्हाधिकारी नारनवरे यांचे जनतेला आवाहन :लोकसभा निवडणुकीची प्रक्रि या सुरू

पाालघर : पालघर (अज) लोकसभा मतदारसंघाकरीता चौथ्या टप्प्यामध्ये २९ एप्रिल रोजी मतदान पार पडणार असून या कालावधीत आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनी देखील आयोगाच्या विविध अ‍ॅपचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.

पालघर मतदारसंघासाठी आज अधिसूचना जारी झाली असून प्रक्रि ये ेबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. नारनवरे बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.नवनाथ जरे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, या निवडणुकीत निवडणूक आयोगामार्फत सीव्हिजिल, समाधान, १९५० हा टोल फ्री क्रमांक अशा विविध अ‍ॅप आणि सुविधांचा वापर करण्यात येत आहे. याद्वारे पालघर मतदारसंघात आतापर्यंत २५४ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. स्वीप अंतर्गत मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी विविध उपक्र म राबविण्यात येत आहेत. मतदानासाठी २९ एप्रिल रोजी सर्वांना सुटी जाहीर करण्यात आली असून जेथे अत्यावश्यक सेवा आहे तेथे दोन तासांची भरपगारी सुटी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शस्त्रास्त्रे जमा करण्याबाबत संबंधितांची बैठक घेण्यात आली त्यानंतर आतापर्यंत १ हजार १२५ शस्त्रे जमा करून घेण्यात आली आहेत. तर आवश्यक तेथे प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. मतदार संघात सार्वजनिक ठिकाणी असलेली ३ हजार ६८२ तर खाजगी ठिकाणी असलेली ७८६ पोस्टर्स आणि बॅनर्स हटविण्यात आली आहेत. व्हीडिओ पथक, भरारी पथक आदींच्या माध्यमातून आदर्श आचारसंहिता भंग होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत आहे. आचारसंहितेचे पालन करणे हे सर्वांसाठी बंधनकारक असून त्याचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. पालघर लोकसभा मतदारसंघाकरीता आवश्यक सर्व कर्मचारी वर्गाच्या नेमणुका करण्यात आल्या असून सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, मतदान अधिकारी,कर्मचारी यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे.

पालघर जिल्ह्यामध्ये यापूर्वी 2120 मतदान केंद्रे समाविष्ट होती. निरंतर प्रक्रि येमध्ये प्राप्त झालेल्या अर्जांनुसार मतदार संख्येमध्ये वाढ झाली असल्याने ज्या मतदान केंद्रांवरील मतदारांची संख्या 1400 पेक्षा अधिक होत आहे अशा मतदान केंद्रांचे सहाय्यकारी मतदान केंद्र तयार करण्याच्या आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यामध्ये 57 मतदान केंद्रे वाढली असून, एकूण 2177 मतदान केंद्रे झाली आहेत. पालघर जिल्ह्याकरीता भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बंगळूरू या कंपनीकडून प्राप्त झालेल्या ट3 एश्ट२ व श्श्ढअळ२ चा वापर करण्यात येणार आहे. तसेच एश्ट व श्श्ढअळ आज सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये रवाना करण्यात आल्या आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये एकूण 3 हजार 682 इतक्या दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांकरीता पीडब्ल्यूडी सुरु केले आहे.उमेदवारांना अर्ज भरतांना घ्यावी लागेल ही काळजीउमेदवाराने आपले अर्ज बिनचूक भरावेत. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रशासनामार्फत सहकार्य केले जाईल, असे डॉ.नारनवरे यांनी सांगितले. ९ एप्रिल, 2019 पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 या दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. उमेदवाराने स्वत:हून त्याच्या गुन्हेगारी पाशर््वभूमीबाबत वर्तमानपत्रामध्ये 3 वेळा माहिती प्रसिद्ध करावयाची आहे. अर्ज भरताना उमेदवाराने शपथपत्रामध्ये गुन्ह्यांबाबत, मालमत्ता देणी, शैक्षणिक अर्हता, सोशल मिडीयावरील माहिती, सोशल मिडीयावरील अकाऊंट्स याची माहिती भरणे आवश्यक आहे. नामनिर्देशन पत्र सादर करताना उमेदवाराने बँक खात्याचा तपशिल सादर करु न त्या बँक खात्यातूनच निवडणूक विषयक खर्च करावा.

टॅग्स :VotingमतदानVasai Virarवसई विरारpalghar-pcपालघर