शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

नवजीवन येथील खदाणीत दोन मुलांचा बुडून मृत्यू; महसूल विभागाचा नाकर्तेपणा पुन्हा उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 16:14 IST

नवजीवन येथील खदाणीमध्ये आतापर्यंत जवळपास ५५ जणांचा बुडून मृत्यू

मंगेश कराळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा: पावसाच्या पाण्याने भरलेल्या खदाणीत आणखी दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. वसईच्या नवजीवन येथील खदाणीमध्ये आतापर्यंत जवळपास ५५ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. असे असतानाही वसईतील महसूल विभाग चीरनिद्रेत आहे. तहसीलदारांसह कार्यालयातील संबंधित अधिकारी,  प्रांत अधिकारी यांच्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताबाबत भावना बोथट, निपरवड झाल्याचे सिद्ध होत आहे.

गुरुवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास नवजीवन येथील उघड्या स्वरूपाच्या असलेल्या खदाणीमध्ये धानिवबागच्या प्रल्हाद चाळीत राहणारे नसीम चौधरी (१३) व सोपान चव्हाण (१४) दोघे आंघोळीसाठी उतरले होते. यावेळी दोघांना पोहोता न आल्याने ते बुड़ु लागले. याची माहिती मुलांच्या घरी समजल्यावर त्यांचे पालक व इतर नागरिक खदाणीमध्ये पोहोचले. त्यांनी मुलांना वाचवण्याचे प्रयत्न केले. त्यानंतर त्यांना बेशुद्ध अवस्थेतच रेंज ऑफिस जवळील प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये नेल्यावर तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. वालीव पोलीस ठाण्यामध्ये मृत्यूची नोंद झाली आहे. 

अशा स्वरूपाच्या खदाणीना भक्कम कुंपण असणे आवश्यक आहे मात्र खदान मालकाने याचे उल्लंघन केले असताना केवळ आर्थिक लाभापोटी इतक्या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. याबाबत सामाजिक संघटना, राजकीय पक्ष त्यांचे प्रतिनिधी यांनी उपविभागीय अधिकारी वसई,व तहसीलदार यांना वारंवार तक्रारी निवेदने देऊन यावर कारवाईच्या मागण्या केल्या होत्या. 

परंतु, निबर झालेले अधिकारी त्यांच्या वागणुकीमुळे कनिष्ठ कर्मचारी अशा स्वरूपाच्या घटनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आले आहेत. परिणामी वसईतील सर्वसामान्य नागरिक व लहान बालक यांना अशा स्वरूपाच्या दुर्दैवी मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. खदाण मालक व वरिष्ठ अधिकारी यांचे आर्थिक हितसंबंध सर्वश्रुत आहेत. आतापर्यंत कोटी रुपयांची थकबाकी वसुली बाकी आहे. २०१५ च्या अहवालानुसार ही वसुली २७८ कोटी होती. नऊ वर्षात त्यात आणखी काही कोटींची भर पडलेली आहे. तरीही ती वसूली आजतायगत न करता महसूललाचे पद्धतशीर नुकसान करून खदाण मालकांना पाठीशी घातले जात आहे. 

वास्तविक पाहता ज्या खदाण मालकाचा ठेका आहे त्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल होणे अपेक्षित आहे. परंतु, वसईतील महसूल विभाग अशा खदाण मालकांना, ठेकेदारांना पाठीशी घालून त्यांचे लाड करत आहे. या घटनेबाबत जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांना विचारणा केली असता, २४ तास उलटल्यानंतरही त्यांना या घटनेची माहिती देण्यात आलेली नव्हती. वसईतल्या बेजबाबदार महसूल यंत्रणेबाबत त्यांना सांगितले असता, अधिकाऱ्यांना याबाबत तात्काळ सूचना देण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :nalasopara-acनालासोपाराDeathमृत्यू