शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

नवजीवन येथील खदाणीत दोन मुलांचा बुडून मृत्यू; महसूल विभागाचा नाकर्तेपणा पुन्हा उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 16:14 IST

नवजीवन येथील खदाणीमध्ये आतापर्यंत जवळपास ५५ जणांचा बुडून मृत्यू

मंगेश कराळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा: पावसाच्या पाण्याने भरलेल्या खदाणीत आणखी दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. वसईच्या नवजीवन येथील खदाणीमध्ये आतापर्यंत जवळपास ५५ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. असे असतानाही वसईतील महसूल विभाग चीरनिद्रेत आहे. तहसीलदारांसह कार्यालयातील संबंधित अधिकारी,  प्रांत अधिकारी यांच्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताबाबत भावना बोथट, निपरवड झाल्याचे सिद्ध होत आहे.

गुरुवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास नवजीवन येथील उघड्या स्वरूपाच्या असलेल्या खदाणीमध्ये धानिवबागच्या प्रल्हाद चाळीत राहणारे नसीम चौधरी (१३) व सोपान चव्हाण (१४) दोघे आंघोळीसाठी उतरले होते. यावेळी दोघांना पोहोता न आल्याने ते बुड़ु लागले. याची माहिती मुलांच्या घरी समजल्यावर त्यांचे पालक व इतर नागरिक खदाणीमध्ये पोहोचले. त्यांनी मुलांना वाचवण्याचे प्रयत्न केले. त्यानंतर त्यांना बेशुद्ध अवस्थेतच रेंज ऑफिस जवळील प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये नेल्यावर तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. वालीव पोलीस ठाण्यामध्ये मृत्यूची नोंद झाली आहे. 

अशा स्वरूपाच्या खदाणीना भक्कम कुंपण असणे आवश्यक आहे मात्र खदान मालकाने याचे उल्लंघन केले असताना केवळ आर्थिक लाभापोटी इतक्या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. याबाबत सामाजिक संघटना, राजकीय पक्ष त्यांचे प्रतिनिधी यांनी उपविभागीय अधिकारी वसई,व तहसीलदार यांना वारंवार तक्रारी निवेदने देऊन यावर कारवाईच्या मागण्या केल्या होत्या. 

परंतु, निबर झालेले अधिकारी त्यांच्या वागणुकीमुळे कनिष्ठ कर्मचारी अशा स्वरूपाच्या घटनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आले आहेत. परिणामी वसईतील सर्वसामान्य नागरिक व लहान बालक यांना अशा स्वरूपाच्या दुर्दैवी मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. खदाण मालक व वरिष्ठ अधिकारी यांचे आर्थिक हितसंबंध सर्वश्रुत आहेत. आतापर्यंत कोटी रुपयांची थकबाकी वसुली बाकी आहे. २०१५ च्या अहवालानुसार ही वसुली २७८ कोटी होती. नऊ वर्षात त्यात आणखी काही कोटींची भर पडलेली आहे. तरीही ती वसूली आजतायगत न करता महसूललाचे पद्धतशीर नुकसान करून खदाण मालकांना पाठीशी घातले जात आहे. 

वास्तविक पाहता ज्या खदाण मालकाचा ठेका आहे त्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल होणे अपेक्षित आहे. परंतु, वसईतील महसूल विभाग अशा खदाण मालकांना, ठेकेदारांना पाठीशी घालून त्यांचे लाड करत आहे. या घटनेबाबत जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांना विचारणा केली असता, २४ तास उलटल्यानंतरही त्यांना या घटनेची माहिती देण्यात आलेली नव्हती. वसईतल्या बेजबाबदार महसूल यंत्रणेबाबत त्यांना सांगितले असता, अधिकाऱ्यांना याबाबत तात्काळ सूचना देण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :nalasopara-acनालासोपाराDeathमृत्यू