शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

नवजीवन येथील खदाणीत दोन मुलांचा बुडून मृत्यू; महसूल विभागाचा नाकर्तेपणा पुन्हा उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 16:14 IST

नवजीवन येथील खदाणीमध्ये आतापर्यंत जवळपास ५५ जणांचा बुडून मृत्यू

मंगेश कराळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा: पावसाच्या पाण्याने भरलेल्या खदाणीत आणखी दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. वसईच्या नवजीवन येथील खदाणीमध्ये आतापर्यंत जवळपास ५५ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. असे असतानाही वसईतील महसूल विभाग चीरनिद्रेत आहे. तहसीलदारांसह कार्यालयातील संबंधित अधिकारी,  प्रांत अधिकारी यांच्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताबाबत भावना बोथट, निपरवड झाल्याचे सिद्ध होत आहे.

गुरुवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास नवजीवन येथील उघड्या स्वरूपाच्या असलेल्या खदाणीमध्ये धानिवबागच्या प्रल्हाद चाळीत राहणारे नसीम चौधरी (१३) व सोपान चव्हाण (१४) दोघे आंघोळीसाठी उतरले होते. यावेळी दोघांना पोहोता न आल्याने ते बुड़ु लागले. याची माहिती मुलांच्या घरी समजल्यावर त्यांचे पालक व इतर नागरिक खदाणीमध्ये पोहोचले. त्यांनी मुलांना वाचवण्याचे प्रयत्न केले. त्यानंतर त्यांना बेशुद्ध अवस्थेतच रेंज ऑफिस जवळील प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये नेल्यावर तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. वालीव पोलीस ठाण्यामध्ये मृत्यूची नोंद झाली आहे. 

अशा स्वरूपाच्या खदाणीना भक्कम कुंपण असणे आवश्यक आहे मात्र खदान मालकाने याचे उल्लंघन केले असताना केवळ आर्थिक लाभापोटी इतक्या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. याबाबत सामाजिक संघटना, राजकीय पक्ष त्यांचे प्रतिनिधी यांनी उपविभागीय अधिकारी वसई,व तहसीलदार यांना वारंवार तक्रारी निवेदने देऊन यावर कारवाईच्या मागण्या केल्या होत्या. 

परंतु, निबर झालेले अधिकारी त्यांच्या वागणुकीमुळे कनिष्ठ कर्मचारी अशा स्वरूपाच्या घटनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आले आहेत. परिणामी वसईतील सर्वसामान्य नागरिक व लहान बालक यांना अशा स्वरूपाच्या दुर्दैवी मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. खदाण मालक व वरिष्ठ अधिकारी यांचे आर्थिक हितसंबंध सर्वश्रुत आहेत. आतापर्यंत कोटी रुपयांची थकबाकी वसुली बाकी आहे. २०१५ च्या अहवालानुसार ही वसुली २७८ कोटी होती. नऊ वर्षात त्यात आणखी काही कोटींची भर पडलेली आहे. तरीही ती वसूली आजतायगत न करता महसूललाचे पद्धतशीर नुकसान करून खदाण मालकांना पाठीशी घातले जात आहे. 

वास्तविक पाहता ज्या खदाण मालकाचा ठेका आहे त्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल होणे अपेक्षित आहे. परंतु, वसईतील महसूल विभाग अशा खदाण मालकांना, ठेकेदारांना पाठीशी घालून त्यांचे लाड करत आहे. या घटनेबाबत जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांना विचारणा केली असता, २४ तास उलटल्यानंतरही त्यांना या घटनेची माहिती देण्यात आलेली नव्हती. वसईतल्या बेजबाबदार महसूल यंत्रणेबाबत त्यांना सांगितले असता, अधिकाऱ्यांना याबाबत तात्काळ सूचना देण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :nalasopara-acनालासोपाराDeathमृत्यू