शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
5
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
6
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
7
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
8
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
9
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
10
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
11
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
12
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
13
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
14
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
15
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
16
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
17
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

पर्यटन कंपन्या दिवाळखोरीच्या वाटेवर, व्यावसायिक हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2020 1:27 AM

व्यावसायिक हवालदिल । कुटुंबासह रस्त्यावर येण्याची वेळ

नालासोपारा : कोरोनाच्या विळख्यात वसईतील पर्यटन कंपन्याही अडकल्या आहेत. सर्वच सहली रद्द झाल्यामुळे या कंपन्या दिवाळखोरीच्या वाटेला लागल्या आहेत. शालान्त परीक्षा संपून सुट्यांचा हंगाम सुरू होईल तसा मुंबई, वसई आणि जवळपासच्या परिसरातील लोकांचा पर्यटनाला उत्तम प्रतिसाद मिळेल. या आशेने सहल कंपन्यांनी डिसेंबर-जानेवारीपासून नियोजनास सुरुवात करून तयारी केली. या सर्वांवर कोरोनाच्या जागतिक संकटाने पाणी फिरले आहे.

देश-विदेशांतील सहली, तीर्थयात्रा, सिनीयर सिटीझन्स टूर्स, पॅकेज टूर्स, समूह सहलीसाठी मार्गदर्शन करून सेवा-सुविधा या कंपन्या देतात. पर्यटन क्षेत्रात आधीच तीव्र स्पर्धा आहे. मात्र, पारंपरिक ग्राहक याच पर्यटन कंपन्यांकडे येतात. जीवघेणी स्पर्धा, आर्थिक ओढाताण, नैसर्गिक आपत्ती, राजकीय व प्रादेशिक आंदोलने अशा प्रत्येक अडचणीला सामोरे जाण्यासाठी सज्ज असलेल्या पर्यटक कंपन्या कोरोनामुळे पार उद्ध्वस्त झाल्या आहेत. सगळीकडे बुकिंगच्या रकमा भरल्या होत्या. विमान, बस, रेल्वे व इतर सोयीसाठी आगाऊ रक्कम भरल्यामुळे मोठ्या प्रमाणात पैसा अडकून पडला आहे. त्यामुळे या कंपन्यांचे संचालक हवालदिल झाले आहेत.महामारीच्या भीतीने लोक घराबाहेर पडत नाहीत आणि टाळेबंदीच्या कालावधीत सतत वाढच होत आहे. यामुळे या व्यवसायाचे कंबरडेच मोडले आहे. मदत मागायची तरी कुणाकडे? केंद्र आणि राज्य सरकारने याकडे लक्ष देऊन लवकर हालचाल केली नाही, तर हा उद्योग मरणावस्थेत पोहोचेल आणि आत्मनिर्भरता या घोषणेचा उद्देश असफल होईल.- रिक्सन तुस्कानो, पर्यटन कंपनीचे संचालक

टॅग्स :MumbaiमुंबईVasai Virarवसई विरार