शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

भाई ठाकूरच्या साम्राज्याला सुरुंग लावणारा दुबे खून खटला, नेमके काय घडलेले, ज्याने देश हादरलेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 05:17 IST

१९९०च्या दशकामध्ये वसई-विरार परिसरात भाई ठाकूर टोळीचा दबदबा होता. कोणाच्याही जागेवर अतिक्रमण करून जागा ताब्यात घेतल्या जात होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्क नालासोपारा : ३४ वर्षांपूर्वी ९ ऑक्टोबर १९८९ रोजी नालासोपारा रेल्वेस्थानकावर पेपर वाचत बसलेल्या बिल्डर सुरेश दुबेवर सहा ते सात आरोपींनी गोळ्या झाडून हत्या केली होती. ज्या नागरिकांनी रेल्वे प्लॅटफाॅर्मवरचा हा थरार पाहिला होता, ते आजही त्याविषयी दबक्या आवाजात बोलतात. या हत्याकांडामुळे भाई ठाकूर टोळीची दहशत समोर आली आणि देशभरात खळबळ उडाली. भाई ठाकूरच्या साम्राज्याला सुरूंग लावणारा म्हणून सुरेश दुबे खून खटला ओळखला जातो.

१९९०च्या दशकामध्ये वसई-विरार परिसरात भाई ठाकूर टोळीचा दबदबा होता. कोणाच्याही जागेवर अतिक्रमण करून जागा ताब्यात घेतल्या जात होत्या. याच काळात नालासोपारामध्ये दुबे कुटुंबीय स्थिरावले होते. दुबे कुटुंबातील मालकीची एक जागा ठाकूर टोळीने मागितली होती. त्याला सुरेश दुबे याने नकार दिला होता. खरे तर प्रकरण येथेच थांबले होते; परंतु एका बिल्डरने नकार दिला तर आपली नाचक्की होईल व दबदबा कमी होईल, अशी भीती भाई ठाकूर यांना वाटली होती.  त्यामुळे भाई ठाकूर यांनी सुरेश दुबेला एकदा आपल्या कार्यालयात बोलावून दमदाटी केली व जागा सोडली नाही तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती, अशी माहिती मिळत आहे.

या धमकीमुळे दुबे कुटुंबीय घाबरले. त्यांनी सुरेश दुबेला गावी जाण्यासाठी सांगितले. त्यामुळे सुरेश दुबे ९ ऑक्टोबरला गावी जाण्यासाठी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास नालासोपारा रेल्वेस्थानकावर आला. गाडी येण्यास उशीर असल्यामुळे दुबे एक इंग्रजी पेपर वाचत बसला होते. दुसरीकडे आपली दहशत कायम ठेवण्यासाठी सुरेश दुबेला जाहीररीत्या मारण्याचा प्लॅन आखण्यात आला होता. त्यामुळे फलाट क्रमांक दोनवर सुरेश दुबेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी १९९२ साली यातील आरोपींना टाडा लावण्यात आला होता. त्यानंतर १७ आरोपींना अटक करण्यात आली होती.

राज्यभरात उडाली खळबळ  दुबे आणि त्याच्या कुटुंबीयांची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती.   १९८९ मध्ये याप्रकरणी पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नव्हती.   मात्र, १९९२ मध्ये याप्रकरणी  गुन्हा दाखल करून घेतला गेला.   वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचे नाव या खून प्रकरणी घेण्यात आल्याने, संपूर्ण राज्यात खळबळ माजली.   आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यावरील कथित आरोपांमुळे हा खटला हाय प्रोफाइल म्हणून देशभरात गाजला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी