शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

परतीच्या पावसाचा भात-फुलशेतीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2020 12:15 AM

वसई-विरारमध्ये सखल भागांत पाणी; भातपिकाला झोडपले, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

पारोळ : वसई-विरारमध्ये काही दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने दाणादाण उडवल्यानंतर रविवारीही झालेल्या पावसाने एकच हाहाकार उडवला. शनिवारी संध्याकाळी विजेच्या कडकडाटांसह रिपरिप पाऊस सुरू होता. रविवारी सकाळीही मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने सखल भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले होते. तर ग्रामीण भागातील भात व फुलशेतीला अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.वसईत काही दिवसांपासून भातकापणीला सुरुवात झाली आहे. लॉकडाऊन असल्याने खाजगी वाहनाने तयार फुलमाल मुंबईत विकण्यासाठी जाणाºया शेतकºयांसमोर आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. त्यात परतीच्या पावसाने वसई पूर्वेतील तयार भातपिकाला झोडपून काढल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लहरी पर्जन्यामुळे दरवर्षी शेतकºयांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. तयार भातपीक डोळ्यांदेखत उद्ध्वस्त होत असल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काही ठिकाणी शेतकºयांनी कापून ठेवलेले भातपीक भिजले आहे. भातपीक ओले झाले की ते सुकल्याशिवाय त्याचे भारे बांधता येत नाहीत. यात खूप वेळ जात असल्याने शेतकºयांसमोरील चिंता वाढली आहे.दुसरीकडे नवरात्रौत्सव, दसरा, दीपावली सणानिमित्त फुलांना मोठी मागणी असल्यामुळे वसई पूर्व-पश्चिम ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात फुलांची शेती करण्यात आली आहे. झेंडूची फुले, मोगरा, चाफा यासारख्या फुलांना अवकाळी पावसाचा फटका बसलाआहे. तसेच वसई पूर्व व पश्चिमला असलेल्या मिठागरांचेही पावसाने नुकसान झाले आहे.आधीच लॉकडाऊन काळात मोठा आर्थिक फटका बसलेल्या मिठागर व्यावसायिक, शेतकरी यांना अवकाळी पावसाने फटका दिल्याने त्यांच्यासमोरील आर्थिक अडचणींत वाढ झाली आहे. शनिवारी संध्याकाळी व रविवारी सकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे वसई, विरार आणि नालासोपारा शहरातील सखल भागात पाणी साचून काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते.