शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

ढगाळ वातावरणाचा फटका, रब्बीही संकटात, शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 23:39 IST

जिल्ह्यात रिमझिम : रब्बीही संकटात, शेतकरी चिंताग्रस्त, सुक्या मच्छीचे उत्पादन घटणार

डहाणू/बोर्डी : दिवाळीपर्यंत कोसळलेल्या अवकाळी पावसाच्या धक्क्यातून सावरून उमेदीने रब्बी हंगामात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उमेदीवर पुन्हा एकदा ढगाळ वातावरण आणि पावसाने पाणी फेरले आहे. बुधवार, २५ डिसेंबरच्या पहाटे साडेचार ते पाच दरम्यान डहाणू तालुक्यात सुमारे वीस मिनिटे रिमझिम पाऊस झाला तर दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे रब्बी हंगामातील मिरची आणि भाजीपाला पीक तसेच सुकी मच्छीच्या व्यवसायावरही परिमाण होणार आहे.

जमिनीत ओलावा असल्याने यंदा तशीही रब्बी हंगामाला उशीरा सुरुवात झाली. तालुक्यात मिरची हे प्रमुख नगदी पीक असून त्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे या पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने लागवडीच्या पहिल्या टप्प्यात शेतकºयांना कीटकनाशक फवारणीवर खर्च करावा लागत आहे. वांगी, भाजीपाला आणि वेलवर्गीय पिकावरही याचा परिणाम होईल. जिल्ह्याच्या काही भागात आंबा मोहरण्यास प्रारंभ झाला आहे. काही ठिकाणी वाटाण्याच्या आकारातील फळे धरली आहेत. याचबरोबर सफेद जांबूला फळगळतीचा धोका संभवू शकतो. तर लिची फळाच्या मोहराची प्रक्रिया याच कालावधीत होत असल्याने भुरी आणि डावणी आदींचा प्रादुर्भाव वाढू शकतो. याकरिता प्रती लिटर १ ग्रॅम याप्रमाणे कार्बनडेझिम हे बुरशीनाशक फवारावे, अशी माहिती कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. उत्तम सहाणे यांनी दिली. हा तालुका सुकी मच्छीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. विशेषत: धाकटी डहाणू येथे बोंबील, जवळा आदी मच्छी सुकविण्याचे काम केले जाते. आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने वाळत टाकलेल्या माशांचे नुकसान झाले होते. हे वातावरण आणखी काही दिवस कायम राहिले आणि अवकळी पाऊस झाल्यास मोठे नुकसान होऊन व्यावसायिकांवर मोठा परिमाण होऊ शकतो. तर पावळी आणि गवत व्यापारावरही पुन्हा एकदा संकट ओढवून दुग्ध व्यवसायावर टांगती तलवार आहे. पहाटे झालेल्या पावसानंतर दिवसभर ढगाळ वातावरण आणि गारठा असल्याने हुडहुडी भरणारी थंडी जाणवली. घशाचे विकार, दमा, सर्दी आणि खोकला हा त्रास मुले, ज्येष्ठांना सहन करावा लागला. वर्ष सरेपर्यंत टप्प्या-टप्प्याने पाऊस पडतोच आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात झालेला पाऊस आता जि.प. आणि पं.स. निवडणुकीच्या दरम्यानही सोबत असल्याचा प्रत्यय येतो आहे.दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणविक्रमगड : दोन ते तीन दिवसापासून वातावरणात बदल झाला असून हवामान ढगाळ आहे. यामुळे भाजीपाला, आंबा या पिकावर परिणाम होऊ शकतो असे शेतकºयांचे मत आहे. या वातावरणामुळे काही भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडल्याने गवत व विटभट्टी व्यापाºयांची भाती वाढली आहे. अवकाळी पावसामुळे खरीप हंगाम वाया गेल्यानंतर रब्बीतून तरी काही हाती लागेल अशी त्यांची अपेक्षा आहे.कुंद वातावरणामुळे रोगाचे सावट, भाजीपाला, कडधान्य व फळपिकांचे नुकसानच्वाडा : गेला आठवडाभर तालुक्यात ढगाळ वातावरण असल्याने भाजीपाला, कडधान्य तसेच फळ पिकांवर रोगाचे सावट असून शेतकरी चिंताग्रस्त आहेत.च्तालुक्यातील शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. सिंचनाच्या सुविधा नसल्याने शेतात विहीर किंवा कूपनलिका मारून शेतकरी भाजीपाला, कडधान्याचे तसेच फळ पिकांचे उत्पादन घेत असतात. मात्र, गेला आठवडाभर ढगाळ वातावरण असल्याने शेतीचे नुकसान होत आहे. भाजीपाला, कडधान्य यांवर रोग पडला असून औषध फवारणी करूनही रोगांचे उच्चाटन होत नसल्याची माहिती शेतकºयांनी दिली.च्आंबा व काजू या फळांचा मोरही ढगाळ वातावरणामुळे हातातून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. वाडा तालुक्यातील भाजीपाला कडधान्य व फळ पिकांचे झाले असून त्यांचे पंचनामे करून त्याना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेश पाटील यांनी तहसीलदारांकडे केली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार