शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

प्रकल्प ३६, कारवाई १६ वरच; पर्यावरण संवर्धन समितीचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 23:58 IST

वसई किनारपट्टीवरील कोळंबी प्रकल्पांचे अतिक्रमण

वसई : वसई तालुक्यातील पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या सरकारी आणि पाणथळ जमिनीवर अतिक्र मण करून उभारण्यात आलेल्या रानगाव आणि भुईगाव येथील बेकायदा कोळंबी प्रकल्पांवर मंगळवारी कारवाई करण्यात आली होती. मात्र या ठिकाणी असलेल्या ३६ पैकी केवळ १६ प्रकल्पांवरच वसई महसूल विभागाने तोडू कारवाई केल्याचा आरोप पर्यावरण संवर्धन समितीने केला आहे.

वसईच्या पश्चिमेकडील रानगाव-भुईगाव येथे समुद्रालगत शासनाच्या मालकीच्या पाणथळ जमिनीवर मोठ्या प्रमाणात भराव करून अतिक्रमणे करण्यात आली आहेत. या ठिकाणी अनेक बेकायदा कोळंबी प्रकल्पही उभारण्यात आले आहेत. हे कोळंबी प्रकल्प समुद्राच्या पाण्यावर चालतात, तर यासाठी समुद्राचे पाणी प्रकल्पाच्या ठिकाणी आणावे लागते. मात्र खाऱ्या पाण्यामुळे आजूबाजूची शेतीयोग्य जमीन बाधित होऊन भूगर्भातील जलस्रोतही प्रदूषित झाल्याचा स्थानिकांचा आक्षेप आहे. त्यामुळे सरकारी पाणथळ जागेवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पूर्वीच दिले होते.

अखेर महसूल व महापालिका प्रशासन याबाबत गंभीर नाही हे पाहिल्यावर शेवटी वसईच्या पर्यावरण संवर्धन समितीने अनेक संघटना, संस्था व शेकडोंच्या उपस्थितीत २ डिसेंबरपासून वसई तहसीलदार कचेरीबाहेर चार दिवस प्राणांतिक उपोषण केले. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांना १० डिसेंबरपासून ही कारवाई सुरू करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर मंगळवारी येथील १९ कोळंबी प्रकल्पांपैकी १६ कोळंबी प्रकल्पांवर कारवाई करण्यात आली.

वसईचे महसूल प्रशासन, महापालिका आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे कारवाईस मंगळवारी सकाळी ६ वाजल्यासून सुरुवात केली. यापैकी तीन प्रकल्पांवर मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून त्याची सुनावणी येत्या १६ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे त्या कारवाईतून ३ कोळंबी प्रकल्प वगळून बाकी प्रकल्प १२ जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. मात्र समितीच्या म्हणण्यानुसार त्यातील उर्वरित १७ प्रकल्प हे कारवाईमधून वगळले असल्याचे स्पष्टपणे सांगताना या ३६ प्रकल्पांबाबत मंडळ अधिकाºयांच्या अहवालात देखील समावेश असल्याचे समीर वर्तक त्यांनी म्हटले आहे.

पर्यावरण समितीचे म्हणणे...

१९ कोळंबी प्रकल्पांपैकी १६ कोळंबी प्रकल्पांवर कारवाई करण्यात आल्याचे वसई तहसीलदार किरण सुरवसे यांनी सांगितले. मात्र या ठिकाणी १९ नव्हे तर ३६ कोळंबी प्रकल्प असून प्रशासनाने केवळ १९ प्रकल्प दाखविल्याचा आरोप पर्यावरण संवर्धन समितीच्या समीर वर्तक यांनी केला आहे.

खरं तर या समुद्र किनारपट्टी भागात ३६ कोळंबी प्रकल्प आहेत व त्यातील १७ प्रकल्प हे अधिकृत असून शासनाच्या भाडेपट्ट्यावर चालत आहेत तर आपण जे बेकायदेशीर होते, अशांना नोटिसा दिल्या आणि तोडू कारवाई केली. त्यामुळे सद्यस्थितीत १९ पैकी त्यातील १६ प्रकल्पांवर कारवाई झाली असून तीन प्रकल्पांवर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसेच या ठिकाणी काहींचे अधिकृत कोळंबी प्रकल्पदेखील असून त्यांना या कारवाईतून वगळण्यात आले आहे. तर मंडळ अधिकारी हे अहवाल सादर करताना ते येथील सर्वच प्रकल्पाचे अहवाल व पंचनामा करून प्रशासनाला माहिती देत असतात. त्यामुळे समीर वर्तक यांना कदाचित हे उर्वरित प्रकल्प अधिकृत आहेत, याची कल्पना नसावी म्हणून ते महसूल विभागावर आरोप करीत आहेत. - किरण सुरवसे, तहसीलदार, वसई

टॅग्स :Vasai Virarवसई विरारPoliceपोलिसenvironmentपर्यावरण