शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

प्रकल्प ३६, कारवाई १६ वरच; पर्यावरण संवर्धन समितीचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 23:58 IST

वसई किनारपट्टीवरील कोळंबी प्रकल्पांचे अतिक्रमण

वसई : वसई तालुक्यातील पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या सरकारी आणि पाणथळ जमिनीवर अतिक्र मण करून उभारण्यात आलेल्या रानगाव आणि भुईगाव येथील बेकायदा कोळंबी प्रकल्पांवर मंगळवारी कारवाई करण्यात आली होती. मात्र या ठिकाणी असलेल्या ३६ पैकी केवळ १६ प्रकल्पांवरच वसई महसूल विभागाने तोडू कारवाई केल्याचा आरोप पर्यावरण संवर्धन समितीने केला आहे.

वसईच्या पश्चिमेकडील रानगाव-भुईगाव येथे समुद्रालगत शासनाच्या मालकीच्या पाणथळ जमिनीवर मोठ्या प्रमाणात भराव करून अतिक्रमणे करण्यात आली आहेत. या ठिकाणी अनेक बेकायदा कोळंबी प्रकल्पही उभारण्यात आले आहेत. हे कोळंबी प्रकल्प समुद्राच्या पाण्यावर चालतात, तर यासाठी समुद्राचे पाणी प्रकल्पाच्या ठिकाणी आणावे लागते. मात्र खाऱ्या पाण्यामुळे आजूबाजूची शेतीयोग्य जमीन बाधित होऊन भूगर्भातील जलस्रोतही प्रदूषित झाल्याचा स्थानिकांचा आक्षेप आहे. त्यामुळे सरकारी पाणथळ जागेवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पूर्वीच दिले होते.

अखेर महसूल व महापालिका प्रशासन याबाबत गंभीर नाही हे पाहिल्यावर शेवटी वसईच्या पर्यावरण संवर्धन समितीने अनेक संघटना, संस्था व शेकडोंच्या उपस्थितीत २ डिसेंबरपासून वसई तहसीलदार कचेरीबाहेर चार दिवस प्राणांतिक उपोषण केले. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांना १० डिसेंबरपासून ही कारवाई सुरू करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर मंगळवारी येथील १९ कोळंबी प्रकल्पांपैकी १६ कोळंबी प्रकल्पांवर कारवाई करण्यात आली.

वसईचे महसूल प्रशासन, महापालिका आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे कारवाईस मंगळवारी सकाळी ६ वाजल्यासून सुरुवात केली. यापैकी तीन प्रकल्पांवर मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून त्याची सुनावणी येत्या १६ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे त्या कारवाईतून ३ कोळंबी प्रकल्प वगळून बाकी प्रकल्प १२ जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. मात्र समितीच्या म्हणण्यानुसार त्यातील उर्वरित १७ प्रकल्प हे कारवाईमधून वगळले असल्याचे स्पष्टपणे सांगताना या ३६ प्रकल्पांबाबत मंडळ अधिकाºयांच्या अहवालात देखील समावेश असल्याचे समीर वर्तक त्यांनी म्हटले आहे.

पर्यावरण समितीचे म्हणणे...

१९ कोळंबी प्रकल्पांपैकी १६ कोळंबी प्रकल्पांवर कारवाई करण्यात आल्याचे वसई तहसीलदार किरण सुरवसे यांनी सांगितले. मात्र या ठिकाणी १९ नव्हे तर ३६ कोळंबी प्रकल्प असून प्रशासनाने केवळ १९ प्रकल्प दाखविल्याचा आरोप पर्यावरण संवर्धन समितीच्या समीर वर्तक यांनी केला आहे.

खरं तर या समुद्र किनारपट्टी भागात ३६ कोळंबी प्रकल्प आहेत व त्यातील १७ प्रकल्प हे अधिकृत असून शासनाच्या भाडेपट्ट्यावर चालत आहेत तर आपण जे बेकायदेशीर होते, अशांना नोटिसा दिल्या आणि तोडू कारवाई केली. त्यामुळे सद्यस्थितीत १९ पैकी त्यातील १६ प्रकल्पांवर कारवाई झाली असून तीन प्रकल्पांवर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसेच या ठिकाणी काहींचे अधिकृत कोळंबी प्रकल्पदेखील असून त्यांना या कारवाईतून वगळण्यात आले आहे. तर मंडळ अधिकारी हे अहवाल सादर करताना ते येथील सर्वच प्रकल्पाचे अहवाल व पंचनामा करून प्रशासनाला माहिती देत असतात. त्यामुळे समीर वर्तक यांना कदाचित हे उर्वरित प्रकल्प अधिकृत आहेत, याची कल्पना नसावी म्हणून ते महसूल विभागावर आरोप करीत आहेत. - किरण सुरवसे, तहसीलदार, वसई

टॅग्स :Vasai Virarवसई विरारPoliceपोलिसenvironmentपर्यावरण