शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

तलावाचे काम युद्धपातळीवर सुरू; डिसेंबरपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 11:36 PM

महापौरांच्या आदेशानंतर जलतरण तलाव लवकरच सुरू होणार

- आशिष राणे वसई : वसई-विरार शहर महापलिकेचा नवघर माणिकपूर येथील ओमनगर भागातील आॅलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव लवकरच सुरू होणार आहे. ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत महापौरांनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.डिसेंबर २०१९ पासून दुरुस्तीच्या कामासाठी हा तलाव बंद ठेवण्यात आला होता. आता या आठवड्यात पाणी फिल्टरेशनचे काम पूर्ण होताच हा तलाव नागरिकांसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती ‘एच’ प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त गिलसन घोन्सालवीस यांनी ‘लोकमत’ला दिली.या संदर्भात नागरिकांची तक्र ार आल्यावर २० डिसेंबर रोजी त्याची पाहणी केली असता, या तलावाला गळती लागल्याचे लक्षात आले होते. याकडे कोणी लक्ष देत नाही, असे दिसल्यावर ‘लोकमत’ने २० डिसेंबरच्या अंकात ‘दररोज शेकडो लिटर पाणी वाया’ असे वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर महापौर प्रवीण शेट्टी यांनी लागलीच युद्ध पातळीवर या जलतरण तलावाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले.ज्यांनी वर्षभराचे पास काढले आहेत, त्यांना याचा आर्थिक फटका बसू नये, त्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी बंद असलेल्या काळातील दिवस भरून मिळतील, असे आश्वासनही महापौर शेट्टी यांनी दिले आहे.दरम्यान, डिसेंबरमध्ये या तरणतलावाच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने गळती लागून यातून मोठ्या प्रमाणात हजारो लिटर पाणी वाहून जात असल्याचे समोर आले होते. ही गळती होत असलेल्या भागाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी पालिका तसेच स्विमिंग पुलाच्या व्यवस्थापनाकडे केली होती.त्यानुसार, या तरणतलावाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र दुरुस्तीचे काम हाती घेऊन नेमकी गळती कुठून होत आहे याचा बोध होत नव्हता. आणि बांधकाम तसेच पाणी खाते यांच्यात या दुरुस्तीवरून तू - तू - मैं - मैं होत होती.‘लोकमत’ने वृत्त छापल्यानंतर महापौरांनी तत्काळ कार्यवाही करत या दोन्ही विभागाला धारेवर धरत काम सुरू केले.महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या महासभेमध्ये हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात, पोहण्यास येणाऱ्या नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले. यात ज्यांनी सहा महिने आणि वर्षभराचा पास काढला, त्यांचे दोन महिन्यांचे पैसे वाया गेले.वसई पश्चिमेतील नवघर माणिकपूर परिसरात महापालिकेतर्फे २५ बाय १५ मीटर सें.मी. लांबीचा आॅलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव तयार करण्यात आला आहे. येथे सकाळ व संध्याकाळी नागरिक येतात.एप्रिल २०१९ मध्ये याच तलावात बुडून एका आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून हा तलाव पोहण्यासाठी बंद करण्यात आला.त्यानंतर पोलीस आणि महापालिका आयुक्तांच्या चौकशीनंतर आॅक्टोबर २०१९ मध्ये हा तरणतलाव महापालिकेने पुन्हा सुरू केला होता.