शहरं
Join us  
Trending Stories
1
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; केंद्राच्या हवाल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
2
आजचे राशीभविष्य - 1 जून 2024 : भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल, मान-सन्मान मिळेल
3
‘मेगा’ हालसाठी तयार राहा! ‘मरे’वर आज ५३४ लोकल फेऱ्या रद्द! दोन परीक्षाही पुढे ढकलल्या
4
खूशखबर! जीडीपी वाढला ८.२ टक्क्यांनी; भारताचा दर हा जगात सर्वाधिक वाढीचा!
5
बँकांतील सायबर गुन्ह्यांमध्ये ३०० टक्के वाढ; ३६ हजार ग्राहकांना ३०,००० कोटींचा आर्थिक फटका
6
विठ्ठल मंदिरी सापडले तळघर अन् ६ मूर्ती; साेळाव्या शतकातील मूर्ती असल्याचा अंदाज
7
सर्वसामान्यांची लाल परी झाली ७६ वर्षांची! वर्धापन दिनानिमित्त एसटी स्थानके रांगोळीने सजणार
8
२० मेडिकल कॉलेजांना आयोगाने ठोठावला दंड; त्रुटी दूर करण्यासाठी दिला २ महिन्यांचा अवधी
9
प्रसारमाध्यमांकडे तक्रार केल्याने विद्यार्थ्यांवर कारवाई; विद्यापीठाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका
10
मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र सहाचा निकाल ४९ टक्के; यंदा ४८०६ विद्यार्थी झाले अनुत्तीर्ण
11
कर्जबुडवे विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीवरून विशेष न्यायालयाची ईडीवर टीका
12
मोठी बातमी: मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक
13
इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, ChatGPT बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा...
14
मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक....
16
हजारो वारकऱ्यांना CM एकनाथ शिंदेंचा एक कॉल; "पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार"
17
नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?
18
पुढचे ४ आठवडे पाकिस्तानी खेळाडूंवर टीका नको; PCB अध्यक्षांची कळकळीची विनंती
19
Paris Olympics 2024 : निशांतची ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री! असं करणारा ठरला पहिला भारतीय पुरूष बॉक्सर
20
एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही; पक्ष हायकमांडचा निर्णय

आदिवासींचे रोजगारासाठी स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 12:54 AM

गाव आणि परिसरातील भात शेतीची कामे आता संपली असल्याने गावात रोजगार मिळणे कठीण झाले आहे.

वाडा : जव्हार, मोखाडा, खोडाळा, डहाणू, तलासरी, विक्रमगड, वाडा तालुक्यातील काही दुर्गम भागातील आदिवासी मजुरांसाठी गावपातळीवर रोजगाराची संधी उपलब्ध नसल्याने त्यांना रोजगारासाठी शहराकडे स्थलांतरित व्हावे लागते आहे.

गाव आणि परिसरातील भात शेतीची कामे आता संपली असल्याने गावात रोजगार मिळणे कठीण झाले आहे. पण मुळाबाळांचे संगोपन करण्यासाठी मजूरी हा एकमेव पर्याय आदिवासींसमोर असल्याने कामाच्या शोधात मजुरांनी स्थलांतर सुरू केले आहे. दिवाळीच्या आधी आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर मजुरांना गावात काम मिळत असते. पावसाळ्याच्या पाण्यातील मासे, जंगलातील रानभाज्या विकून आदिवासी मजूर काही दिवस स्वतंत्र व्यवसाय करतात. चिंबोरी, खेकडे विकणे ही आदिवासीची रोजीरोटी आहे.

भात लागवड, भात कापणीवेळी सुद्धा शेतीमध्ये घाम गाळून आदिवासी मजूर रोजीरोटी कमावतात. मात्र, या मोसमात या मजुरांना काम शोधण्यासाठी भटकंती करावी लागते. हाताला जे काम मिळेल ते करण्यापलीकडे या मजुरांनकडे पर्याय नसतो. कुटुंबाचे आणि मुलाबाळांचे संगोपन करण्यासाठी तसेच पैसा कमावण्यासाठी मजुरांचे तांडे कुडूस नाका आणि आसपासच्या गावात स्थलांतरित झालेले दिसत आहेत. तर मजूर कामाच्या शोधात अन्य ठिकाणी स्थलांतरित झाल्याने आदिवासी पाडे ओस पडले आहेत.

मुलाबाळांचे संगोपन, शिक्षण व्हावे, दोन पैसे मिळावेत म्हणून रोजगाराच्या शोधात स्थलांतरित व्हावे लागते.- संतोष दळवी, न्याहाळा (जव्हार)

टॅग्स :FarmerशेतकरीVasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र