शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
2
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
3
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
4
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
5
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
6
राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 
7
नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
8
मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ 
9
महामुंबईतील १९ आरएमसी प्लांट बंद, तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाखांची बँकहमी जप्त
10
महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल
11
इंडिगोची दोन्ही विमाने रद्द; १२ तास ताटकळले संभाजीनगरकर
12
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
13
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
14
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
15
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
16
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
17
IND vs SA : पंचांनी चेंडू बदलून दिला, पण... KL राहुलनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?   
18
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
19
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
20
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
Daily Top 2Weekly Top 5

जव्हार-नाशिक गोंदा घाट बनला मृत्यूचा सापळा; रस्त्याची मलमपट्टी नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:34 IST

जव्हार-नाशिक या रस्त्यातील मोखाडा व नाशिक परिसरातील तोंरांगण ग्रामपंचायत हद्दीच्या सिमेवर असलेला मोठा वळण व उतारामुळे नेहमीच अवजड वाहनांचे अपघात होत आहेत.

- हुसेन मेमनजव्हार : जव्हार-नाशिक या रस्त्यातील मोखाडा व नाशिक परिसरातील तोंरांगण ग्रामपंचायत हद्दीच्या सिमेवर असलेला मोठा वळण व उतारामुळे नेहमीच अवजड वाहनांचे अपघात होत आहेत. यामध्ये कित्येक नागरीकांचे प्राण गेले आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्यांकडे दुर्लक्ष करीत आहे.शिर्डी हे देवास्थान जगभरात प्रसिध्द असुन पालघर, सेलवासा व गुजरात येथून मोठ्या संख्येने साईभक्त यामार्गावरून ये-जा करतात. तसेच नाशिक हुन मोठ्याप्रमाणात भाजीपाला पालघर जिल्ह्यात दररोज येत असतो. अर्थात या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. तसेच वापी, सेलावासा व पालघर जिल्ह्यातील एम.आय.डी.सी. असल्यामुळे या मार्गावरून मोठ्या प्रमाणात मालाची ये-जा सुरू असते. अवजड वाहनांचा नाशिक-त्र्यंबक-मोखाडा-जव्हार-मनोर-चारोटी-पालघर असा मार्गक्रमण असुन या रस्त्यावर नेहमीच वाहनांच्या येरझाऱ्या असतात.या अतिरिक्त ताणामुळे या रस्त्याचा दर्जा अधिकच खालावला असुन राष्टÑीय महामार्ग विभागा या कडे दुर्लक्ष करीत आहे. याचा फटका येथील प्रवाशांंना, वहातूकदारांना होत आहे. २४ मार्च रोजी गुजरात प्रदेशातून देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची एक खाजगी बस भांगेबाबा मंदीरच्या उतारावर १०० फूट खोल दरीत जाऊन भयानक अपघात झाला.या अपघातात तिन भाविकांना आपले जिव गमवावे लागले आहे. २५ मार्च रोजी पुन्हा एका रासायनीक पदार्थ घेऊन जाणारा ट्रक त्याच ठिकाणी एखा झाडाला आदळून उलटला होता. दर आठवड्याला तीन ते चार अपघात याच अपघात प्रवण क्षेत्रात होत असातात.मोखाड्याहुन नाशिककडे जाणारा हा गोंदा घाट खूपच मोठा व वळणदार असुन पुर्णपणे उतारावर आहे. त्यामुळे र्हसुल फाटा सोडला की घाट लागतो. त्यामुळे अवजड वाहनाला वारंवार ब्रेकचा वापर करावा लागतो. आणि भांगेबाबा मंदीर पासुन जवळजवळ ८० मीटर पर्यत मोठा उतार लागतो. हा उतार संपला की, लगेचच मोठा वळण असल्यामुळे वाहन चालकाला अंदाज येत नाही, आणि वाहन सरळ त्या खोल दरीत जाऊन मोठे अपघात घडत असतात.मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने तेथे कुठलीच सुरक्षा भिंत तथा अपघाती वळण तथा इतर धोकादयक वळण असा कुठलाच फलक लावण्यात आलेला नसलयामुळे मोठे अपघात होऊन शेकडो जिव गेल्याच्या घटना घडल्या आहेत.हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग नेहमीच कोट्यवधी रूपये दुरूस्तीच्या नावावर खर्च केले जाताता मात्र दुरूस्ती ही कागदोपत्रीच असते. महिन्याभरापुर्वीच या रस्त्याचे खड्डे भरण्याचे काम करण्यात आले. मात्र ते खड्डे अगदी थातूर मातूर पध्दतीने भरले असुन आजही या रस्त्यावर खड्डेच खड्डे बघावयास मिळत आहे.ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमताने मोठ्याप्रमाणात या मार्गावर भ्रष्टाचार केला जात असुन हा रस्ता दुर्लक्षीत भागातला रास्ता म्हणून ओळखला जात आहे. तसेच याच मार्गावरील नाशिक हद्दीतले रस्ते मात्र चकाचक असुन रस्त्यांचा दर्जाही खूपच चांगला आहे.राज्य महामार्गाची राष्टÑीय महामार्गामध्ये जेव्हा बदल होतो, तेव्हा त्याला दजोन्नत वर्गामध्ये मोडले जाते. कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, जव्हार यांच्या कार्यक्षेत्रातील दुरूस्ती व देखभालीसाठी असलेला रामा.क्र. ३० एकूण लांबी ४४.४० कि.मी., रामा क्र. ७६ एकूण २०.६० कि.मी. व रामा क्र. ७३ एकुण लांबी २१.२० कि.मी. अशी एकूण ८६.२० कि.मी. लांबी अतंर्भूत रस्ता दि. ०१/०३/२०१८ पासुन राष्टÑीय महामार्ग विभागाकडे सूर्पूद करण्यात आला आहे.भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (रस्ते परिवहन आणि मंत्रालय) कडून निर्माण होत असलेल्या सिन्नर-पालघर, त्र्यंबक-बोर्डी महामागार्चे शिर्डी ते वापी दरम्यानच्या शिर्डी ते घोटी व्हाया सिन्नर राज्यमार्ग क्रमांक १२ वरील ११४ किलोमीटर , घोटी ते आंबोली व्हाया त्रंबकेश्वर राज्यमार्ग क्रमांक २३ वरील ५७ किलोमीटर, आंबोली ते जव्हार राज्यमार्ग क्रमांक ४२ वरील ४२ किलोमीटर तर जव्हार ते वापी व्हाया दाभोसा ,सिल्वासा, या राज्यमार्गावरील ८५ किलोमीटर अशा एकूण २९८ किलोमीटर लांबीच्या या राज्यमार्गांचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्यात आले आहे. यासाठी १५० ते २०० कोटी पर्यंत तरतूद करून या रस्त्याचे वाजत गाजत भूमिपूजन दि. ५ नोव्हेंबर २०१६ रोजी तत्कालीन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नाशिक येथे झालेले आहे. मात्र, ३ वर्षे उलटूनही रस्ता जैसे थे परीस्थितीत आहे.

टॅग्स :Accidentअपघात