शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
2
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
3
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
4
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
5
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
6
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
7
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
8
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
9
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
10
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
11
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
12
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
13
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
14
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
15
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
16
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
17
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
18
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
19
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
20
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 

जव्हार-नाशिक गोंदा घाट बनला मृत्यूचा सापळा; रस्त्याची मलमपट्टी नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:34 IST

जव्हार-नाशिक या रस्त्यातील मोखाडा व नाशिक परिसरातील तोंरांगण ग्रामपंचायत हद्दीच्या सिमेवर असलेला मोठा वळण व उतारामुळे नेहमीच अवजड वाहनांचे अपघात होत आहेत.

- हुसेन मेमनजव्हार : जव्हार-नाशिक या रस्त्यातील मोखाडा व नाशिक परिसरातील तोंरांगण ग्रामपंचायत हद्दीच्या सिमेवर असलेला मोठा वळण व उतारामुळे नेहमीच अवजड वाहनांचे अपघात होत आहेत. यामध्ये कित्येक नागरीकांचे प्राण गेले आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्यांकडे दुर्लक्ष करीत आहे.शिर्डी हे देवास्थान जगभरात प्रसिध्द असुन पालघर, सेलवासा व गुजरात येथून मोठ्या संख्येने साईभक्त यामार्गावरून ये-जा करतात. तसेच नाशिक हुन मोठ्याप्रमाणात भाजीपाला पालघर जिल्ह्यात दररोज येत असतो. अर्थात या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. तसेच वापी, सेलावासा व पालघर जिल्ह्यातील एम.आय.डी.सी. असल्यामुळे या मार्गावरून मोठ्या प्रमाणात मालाची ये-जा सुरू असते. अवजड वाहनांचा नाशिक-त्र्यंबक-मोखाडा-जव्हार-मनोर-चारोटी-पालघर असा मार्गक्रमण असुन या रस्त्यावर नेहमीच वाहनांच्या येरझाऱ्या असतात.या अतिरिक्त ताणामुळे या रस्त्याचा दर्जा अधिकच खालावला असुन राष्टÑीय महामार्ग विभागा या कडे दुर्लक्ष करीत आहे. याचा फटका येथील प्रवाशांंना, वहातूकदारांना होत आहे. २४ मार्च रोजी गुजरात प्रदेशातून देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची एक खाजगी बस भांगेबाबा मंदीरच्या उतारावर १०० फूट खोल दरीत जाऊन भयानक अपघात झाला.या अपघातात तिन भाविकांना आपले जिव गमवावे लागले आहे. २५ मार्च रोजी पुन्हा एका रासायनीक पदार्थ घेऊन जाणारा ट्रक त्याच ठिकाणी एखा झाडाला आदळून उलटला होता. दर आठवड्याला तीन ते चार अपघात याच अपघात प्रवण क्षेत्रात होत असातात.मोखाड्याहुन नाशिककडे जाणारा हा गोंदा घाट खूपच मोठा व वळणदार असुन पुर्णपणे उतारावर आहे. त्यामुळे र्हसुल फाटा सोडला की घाट लागतो. त्यामुळे अवजड वाहनाला वारंवार ब्रेकचा वापर करावा लागतो. आणि भांगेबाबा मंदीर पासुन जवळजवळ ८० मीटर पर्यत मोठा उतार लागतो. हा उतार संपला की, लगेचच मोठा वळण असल्यामुळे वाहन चालकाला अंदाज येत नाही, आणि वाहन सरळ त्या खोल दरीत जाऊन मोठे अपघात घडत असतात.मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने तेथे कुठलीच सुरक्षा भिंत तथा अपघाती वळण तथा इतर धोकादयक वळण असा कुठलाच फलक लावण्यात आलेला नसलयामुळे मोठे अपघात होऊन शेकडो जिव गेल्याच्या घटना घडल्या आहेत.हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग नेहमीच कोट्यवधी रूपये दुरूस्तीच्या नावावर खर्च केले जाताता मात्र दुरूस्ती ही कागदोपत्रीच असते. महिन्याभरापुर्वीच या रस्त्याचे खड्डे भरण्याचे काम करण्यात आले. मात्र ते खड्डे अगदी थातूर मातूर पध्दतीने भरले असुन आजही या रस्त्यावर खड्डेच खड्डे बघावयास मिळत आहे.ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमताने मोठ्याप्रमाणात या मार्गावर भ्रष्टाचार केला जात असुन हा रस्ता दुर्लक्षीत भागातला रास्ता म्हणून ओळखला जात आहे. तसेच याच मार्गावरील नाशिक हद्दीतले रस्ते मात्र चकाचक असुन रस्त्यांचा दर्जाही खूपच चांगला आहे.राज्य महामार्गाची राष्टÑीय महामार्गामध्ये जेव्हा बदल होतो, तेव्हा त्याला दजोन्नत वर्गामध्ये मोडले जाते. कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, जव्हार यांच्या कार्यक्षेत्रातील दुरूस्ती व देखभालीसाठी असलेला रामा.क्र. ३० एकूण लांबी ४४.४० कि.मी., रामा क्र. ७६ एकूण २०.६० कि.मी. व रामा क्र. ७३ एकुण लांबी २१.२० कि.मी. अशी एकूण ८६.२० कि.मी. लांबी अतंर्भूत रस्ता दि. ०१/०३/२०१८ पासुन राष्टÑीय महामार्ग विभागाकडे सूर्पूद करण्यात आला आहे.भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (रस्ते परिवहन आणि मंत्रालय) कडून निर्माण होत असलेल्या सिन्नर-पालघर, त्र्यंबक-बोर्डी महामागार्चे शिर्डी ते वापी दरम्यानच्या शिर्डी ते घोटी व्हाया सिन्नर राज्यमार्ग क्रमांक १२ वरील ११४ किलोमीटर , घोटी ते आंबोली व्हाया त्रंबकेश्वर राज्यमार्ग क्रमांक २३ वरील ५७ किलोमीटर, आंबोली ते जव्हार राज्यमार्ग क्रमांक ४२ वरील ४२ किलोमीटर तर जव्हार ते वापी व्हाया दाभोसा ,सिल्वासा, या राज्यमार्गावरील ८५ किलोमीटर अशा एकूण २९८ किलोमीटर लांबीच्या या राज्यमार्गांचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्यात आले आहे. यासाठी १५० ते २०० कोटी पर्यंत तरतूद करून या रस्त्याचे वाजत गाजत भूमिपूजन दि. ५ नोव्हेंबर २०१६ रोजी तत्कालीन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नाशिक येथे झालेले आहे. मात्र, ३ वर्षे उलटूनही रस्ता जैसे थे परीस्थितीत आहे.

टॅग्स :Accidentअपघात