शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

जव्हारचे जय सागर धरण कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 11:02 PM

आठवड्यात पाऊस पडला नाही तर शहर सोडून जाण्याची वेळ

जव्हार : या शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जय सागर धरणात अतीअल्प म्हणजेच चार ते पाच दिवस पाणी पुरेल ऐवढाच पाणी साठा शिल्लक आहे. यामुळे जव्हारकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. या आठवड्यात पाऊस पडला नाही तर जव्हार शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण होवून शहरातील नागरिकांना जव्हार शहर सोडून जावे लागेल, अशी स्थिती निर्माण होणार आहे.पाणी साठा चार ते पाच दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. म्हणून २१, २५, ३० जूनलाच फक्त अर्धा तास पाणी सोडण्यात येईल, असे नगरपरिषदेने शहरात दवंडी देवून जाहीर केले आहे. तसेच नगरपरिषदेने नोटिस काढली आहे. जव्हार शहराला पाणी पुरवठा करणारे जय सागर धरण हे ६० वर्षांपूर्वी संस्थानिक राजे यशवंतराव मुकणे यांनी त्यावेळच्या दोन ते चार हजार लोकांसाठी बांधले होते. मात्र दिवसेंदिवस जव्हार शहराची लोकसंख्या १८ ते २० हजाराच्या आसपास वाढली आहे. त्यातच शहराला लागून रायतळे व कासटवाडी या दोन ग्रामपंचयात क्षेत्रातील अनेक कुटुंबांना याच धरणातील पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे वर्षानुवर्ष लोकसंख्या वाढल्याने धरणातील पाणी अपुरे पडू लागले आहे. धरणाचे बांधकाम केल्यापासून त्यात साचलेला गाळ काढलेला नाही. म्हणून पाणी साठा कमी होतो, याचा परिणाम आज पाऊस नसल्यामुळे जव्हारकराना भोगावा लागणार आहे. तसेच डॅममधील साचलेला गाळ काढण्यासाठी व डॅमची उंची वाढविण्यासाठी वर्षभरापूर्वी टेंडर काढूनही गाळ काढण्यात आला नाही की, उंचीही वाढविली नाही म्हणून ही वेळ आज जनतेवर ओढावली आहे. त्यामुळे आतातरी तातडीने धरणाची उंची वाढविणे व त्यातील गाळ काढणे ही कामे तातडीने होतील अशी अपेक्षा आहे.नगरपरिषदेने या जय सागर धरणाकडे वेळीच लक्ष दिले असते, तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. गाळ काढण्याचे टेंडर काढूनही ते व खोलीकरण केले नाही.- असरफ घाची (चॉईस मास्टर), तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी

टॅग्स :Damधरणwater scarcityपाणी टंचाई