शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे विक्रमगडकरांच्या मोगऱ्याचा सुगंध हिरमुसला; गिऱ्हाईक नसल्याने शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 02:52 IST

अनेक गावांत होते लागवड, मात्र मजुरीपेक्षा दर कमी असल्याने फुले फेकून देण्याची वेळ

राहुल वाडेकरविक्रमगड : विक्रमगड तालुका हा मोगरा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. रोज अंदाजे १२-१३ टन मोगºयाच्या कळ्या दादर, कल्याण, सुरत, नाशिक, पालघर मार्केटमध्ये निर्यात होत असतात. मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने संचारबंदी लागू झाल्याने मोगºयाला गिºहाईक नाही आणि निर्यातही होत नाही. ऐन लग्नसराईचा सिझन निघून गेल्याने मोगरा उत्पादक शेतकºयाचे प्रचंड नुकसान झाले आहे. आणि आता मोगºयाला भाव मिळत नसल्याने असलेला मोगरा फेकून देण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.

तालुक्यातील खांड, वाकडूपाडा, ओंदे, साखरा, सुकसाले, कुरंझे, उघाणी, उपराले, देहर्जा अशा अनेक गावात शेतकºयांनी मोगरा लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. मोगºयाचे दररोज साधारण ५ ते १५ किलो उत्पन्नातून प्रति किलो ३०० ते ५०० रुपये इतका दर मिळतो. मात्र कोरोना संसर्गामुळे गिºहाईकच नसल्याने मोगºयाचे भाव २० रुपये किलो झाले आहेत, तर मजुरांना कळ्या खुडण्यासाठी किलो मागे ४० रुपये द्यावे लागत असल्याने मजुरीपेक्षा मालाचा भाव कमी येत आहे. तर विकण्यासाठी पाठवलेल्या कळ्यांना गिºहाईक नसल्याने व्यापारी परत त्या कळ्या पुन्हा शेतकºयांकडे पाठवातात. त्यामुळे या कळ्या फेकून देण्याची वेळ शेतकºयावर आली आहे.कोरोनामुळे तर ऐन लग्नसराईच्या मोसमातही मोगºयाला मागणी नव्हती आणि पावसाळा सुरु झाल्यानंतर तर गिºहाईकच नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. मोगºयाच्या शेतीमुळे वर्षाकाठी लाखो रुपयाची उलाढाल येथील शेतकरी करत असतात, परंतु यंदा संपूर्ण हंगाम वाया गेल्याने आदिवासी शेतकºयांचे पार कंबरडे मोडले आहे.श्रावण महिन्यात भाव वाढण्याची आशा, पण...सध्या पावसाच्या संततधारेमुळे फुलांचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे उत्पादक, विक्रेते, व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. परंतु, श्रावण महिन्यात मोगºयाच्या फुलांना चांगली मागणी असते. त्यामुळे फुलांचे भाव पुढील काही काळात वाढतील, अशी अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे. परंतु, तोपर्यंत कोरोनाचे संकट संपावे, अशीही प्रार्थना शेतकरी करीत आहेत.कोरोनाचा संसर्ग व पाऊस यामुळे मोगरा निर्यातीसाठी अडचणी येत आहेत. फुलांचे उत्पादन वाढले आहे, त्यामुळे माल जास्त परंतु मागणी कमी त्यामुळे भाव पडले आहेत. फुलांच्या विक्रीतून उत्पादकांचा भांडवली खर्च निघत नाही. - निलेश चौधरी, मोगरा उत्पादक शेतकरी

या वर्षी कोरोनामुळे मंदिरे, बाजारपेठा, लग्नसराईचा ऐन सिझन निघून गेल्याने मोगरा विकता आला नाही. आता पाऊस सुरू झाल्याने गिºहाईक मिळत नसल्याने केवळ २० रुपये किलोने मोगºयाला भाव देत आहेत. तर, कळ्या काढण्यासाठी मजुरांना ४० रुपये द्यावे लागत आहेत. त्यामुळे मोगरा फेकूनसुद्धा द्यावा लागत आहे. -हरी तारवी, मोगरा उत्पादक शेतकरी, विक्रमगड

मोगºयाला बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चही निघेनासा झाला आहे. आगामी श्रावण महिन्यात व गणेशोत्सवात तरी बाजारभावात वाढ होईल, या आशेवर मोगºयाची जोपासना करीत आहोत. - प्रवीण कनोजा, मोगरा उत्पादक शेतकरी, विक्रमगड

टॅग्स :Farmerशेतकरी