शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

जोर'धार' पाऊस !भाईंदरच्या उत्तन समुद्रात ब्लेसिंग बुडाली, नाखवा व खलाशी बचावले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 9:15 AM

वादळीवारा व मुसळधार पावसामुळे खवळलेल्या समुद्रात भाईंदरच्या उत्तन नवीखाडी येथील ब्लेसिंग ही मच्छीमार बोट बुडाली. बोटीवरील नाखवा व खलाशी, अशी एकूण 10 जणं पोहून नजीकच्या बोटींवर पोहोचल्याने बचावले.   

धीरज परब / मीरारोड, दि. 20 - वादळीवारा व मुसळधार पावसामुळे खवळलेल्या समुद्रात भाईंदरच्या उत्तन नवीखाडी येथील ब्लेसिंग ही मच्छीमार बोट बुडाली. बोटीवरील नाखवा व खलाशी, अशी एकूण 10 जणं पोहून नजीकच्या बोटींवर पोहोचल्याने बचावले. उत्तनच्या नवीखाडी येथील डिक्सन डिमेकर यांची ब्लेसिंग ही मच्छिमार बोट सोमवारी (18 सप्टेंबर) मासेमारीसाठी समुद्रात गेली होती. डिक्सनसह भाऊ निलेश आणि 8 खलाशी बोटीवर होते. परंतु मंगळवारी ( 19 सप्टेंबर ) हवामान खात्या पाठोपाठ मत्स्य व्यवसाय विभागाने समुद्रात ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देत मच्छिमारांना पुढील 24 तास समुद्रात जाऊ नये, असा इशारा दिला.  त्यामुळे समुद्रात मासेमारी साठी गेलेल्या बोटी माघारी परतू लागल्या. 

मंगळवारी डिमेकर यांची ब्लेसिंग बोटदेखील परतीच्या वाटेला लागली.  रात्री चौक धक्क्याला येत असताना किनाऱ्यापासून अर्धा किमी अंतरावर खवळलेल्या समुद्रात वाळूच्या बेटाला लागून उलटली. बोट बुडताच बोटीवरील नाखवा व खलाशांनी खवळलेल्या समुद्रात उड्या घेतल्या. नजिकच्या बॅबिलोन व मुक्तीदाता या वसईच्या मच्छिमार बोटींना गाठत स्वतःचा जीव वाचवला. बुधवारी (20 सप्टेंबर) सकाळी उत्तन, चौक, पाली भागातील मच्छिमारांनी चौक धक्क्याकडे धाव घेतली. बोटीवरील नाखवा व खलाशी सुखरूप असल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.  बुडालेल्या बोटीचा शोध मच्छिमारांनी लावला असून ती समुद्रात वाळूत उपडी होऊन  रुतून बसली आहे. सध्या मुसळधार पाऊस, वादळ आणि खवळलेल्या समुद्रा मुळे बोट काढण्याच्या मच्छिमारांच्या प्रयत्नांना यश आलेले नाही. 

हवामान खात्यासह मत्स्य व्यवसाय विभागाने मंगळवारीच वादळीवारा व मुसळधार पावसाची माहिती देत मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा दिला. पण जे आधीच समुद्रात गेले होते त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची ? असा सवाल मच्छीमार नेते बर्नड डिमेलो यांनी केलाय. आधीच कल्पना असती तर मच्छिमार मासेमारीसाठी समुद्रात गेले नसते. डिमेकर यांच्या बोटीला अपघात होऊन असा जीवघेणा प्रसंग टळला असता. डिमेकरसह अन्य मासेमारी बोटींना परत फिरावे लागले. त्यामळे डिमेकर सह अन्य मच्छीमार यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी डिमेलो यांनी केली आहे.