शहरं
Join us  
Trending Stories
1
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
2
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
आदित्यना पाडण्यात, ठाकरेंना CM पदावरुन हटवण्यात राऊतांचा हात हे जेवढे खरे...; भाजपाचा पलटवार
5
Hardik-Natasa Divorce : हार्दिक-नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चा, कृणाल पांड्याच्या फोटोवर नताशाची कमेंट; चर्चांना उधाण
6
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
7
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
8
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
9
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
10
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
11
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
12
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
13
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
14
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
15
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
16
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
17
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
18
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
19
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
20
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील

वाडा तालुक्यातील अनेक जंगलात वणवे, वन विभागाने लक्ष देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 4:26 AM

तालुक्यात मोठ्या प्रमाणात खाजगी मालकीचे आणि वन विभागाचे जंगल आहे. पावसाने जंगलात मोठ्या प्रमाणात गवत उगवते.जानेवारी-फेब्रुवारी मध्ये हे गवत पूर्णपणे सुकलेले असते. मात्र काही ठिकाणी समाज कंटकांमुळे तर काही ठिकाणी विजेच्या तारांमधून पडणा-या आगीच्या ठिणग्यांमुळे या जंगलातील मोठा भाग खाक झाला आहे.

वाडा : तालुक्यात मोठ्या प्रमाणात खाजगी मालकीचे आणि वन विभागाचे जंगल आहे. पावसाने जंगलात मोठ्या प्रमाणात गवत उगवते.जानेवारी-फेब्रुवारी मध्ये हे गवत पूर्णपणे सुकलेले असते. मात्र काही ठिकाणी समाज कंटकांमुळे तर काही ठिकाणी विजेच्या तारांमधून पडणा-या आगीच्या ठिणग्यांमुळे या जंगलातील मोठा भाग खाक झाला आहे. ह्यांमुळे जंगलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर होतेच त्याच बरोबर अनेक वन्यजीव, प्राणी ह्या वणव्यांमधे मृत्यू पावतात. दुर्मिळ होत चाललेल्या पक्षी-प्राण्यांच्या प्रजातीही नष्ट होतात.ह्या वणव्यांमुळे पाळीव जनावरांच्या चरण्याचा प्रश्न देखील गंभीर बनतो. दर वर्षी लागणार्या ह्या आगींमुळे जंगलातील औषधी वनस्पती देखील नष्ट होत आहेत.शासनाच्या कोटींच्या कोटी वृक्ष लागवाडीच्या संकल्पाला आणि स्वप्नांना या वणव्यांमुळे तडा जात असून वनविभाग मात्र त्यावर उपाय करण्यास असमर्थ ठरलेला आहे.अनेक भागातील जंगलांमधे काही समाजकंटकांकडून ससे, रान डुकरे, मोर आणि अन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी जंगलाना आग लावली जाते.अशा समाजकंटकांचा वन विभागाने त्वरीत बंदोबस्त करण्याची गरज आहे. नाहीतर शासनाचा दर वर्षाचा कोटीच्या कोटी वृक्ष लागवडीवरील सगळा खर्च हा अशा वणव्यांमुळे वाया जाईल असे मत निसर्गप्रेमी व्यक्त करत आहेत.दर वर्षीच्या वणव्यांमुळे जंगलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दर वर्षी रानोमाळी-डोंगरांना मोठ्या प्रमाणात आगीने वेढलेले आपण बघतो. मात्र ह्यावर उपाय शोधण्यास वन विभागाला आजपर्यंत यश आलेले नाही.शासन वृक्षारोपणासाठी करोडो रु पये खर्च करते मात्र जंगलातील अशा वणव्यांमुळे जंगलांतील वन्यजीव आणि वनस्पती नष्ट होतात.ह्यावर वनविभागाने उपाय शोधण्याची गरज आहे.-विक्र ांत पाटील,निसर्ग प्रेमी

टॅग्स :fireआग