शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

उद्धव ठाकरे यांच्याकडून मच्छीमारांची मनधरणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 04:14 IST

लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार : न टाकण्याचे आवाहन

पालघर : मागील २५ वर्षांपासून मच्छीमार समाजाला भेडसावणाऱ्या अनेक ज्वलंत प्रश्नाबाबत मुख्यमंत्री आदी लोकप्रतिनिधी कडे पाठपुरावा करुनही उपाय योजना होत नसल्याने शेवटी सातपाटीसह अनेक गावातील मच्छीमारांनी बहिष्काराचे अस्त्र उगारले आहे. त्यामुळे मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी मच्छीमार संस्थांच्या प्रतिनिधींची भेट घेऊन चर्चा केली व त्यांनाजिल्ह्यातील पालघर, वसई, आणि डहाणू या तीन तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मासेमारी व्यवसाय केला जात असून लाखो मच्छीमाराच्या उदरनिर्वाहाचा हा प्रमुख स्त्रोत आहे.

या व्यवसाया व्यतिरिक्त उपजिविकेचे कुठलेही साधन मच्छीमारांकडे नसल्याने मिळेल त्या मत्स्य उत्पादनावर आज पर्यंत हा समाज आपली गुजराण करीत आला आहे. आपल्या व्यवसायाला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांवर उपाय योजना व्हावी ह्यासाठी मागील २५ वर्षांपासून सत्ताधाऱ्यांना निवेदने देत आले आहेत. मात्र जेट्टी,धूप प्रतिबंधक बंधारे आदी नाममात्र उपाय योजना करून मच्छीमारांच्या तोंडाला पाने पुसण्यात आलेली आहेत. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातपाटी गावाला भेट देऊन मच्छीमारांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात आली असून शेतकºयां प्रमाणे ४ टक्के व्याजाने कर्ज पुरवठा, एलइडी मासेमारी बंदी,पर्ससीन ट्रॉलर्स वर कारवाई साठी कोस्टगार्ड ची मदत घेणार, १० हजार शितपेट्या महिलांना देणार, सातपाटीच्या खाडीतील गाळ काढला जाणार, व्होकेशनल ट्रेनिग सेंटर उभारणार अशी डझनभर आश्वासने दिली गेली होती.त्या व्यतिरिक्त मागील २०-२५वर्षा पासून एनसीडीसी योजनेचे कर्ज माफ करावे, मासेमारी साहित्या वर लावण्यात आलेला जीएसटी रद्द करावा आदीअनेक प्रलंबित असलेले प्रश्न जैसे थे परिस्थितीत असल्याने सातपाटी सह अनेक गावांत बैठका होत असून लोकसभा निवडणुकीवर बिहष्कार टाकावा अथवा सत्ताधारी सेना-भाजप च्या उमेदवारा विरोधात मतदान करावे अशी भूमिका बैठकीत घेण्यात आली आहे.मच्छीमारांनी घेतलेल्या भूमिके मुळे सत्ताधाºयांचे धाबे दणाणले असून मंगळवारी पालघर येथील ठाणे जिल्हा मच्छीमार समाज मध्यवर्ती संघा मध्येसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जिल्ह्यातील मच्छीमार सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींची भेट घेणार आहेत.

या आहेत समस्या आणि मागण्याच्बंदी कालावधीत मच्छीमारांना आर्थिक मदत घ्यावी, घरांच्या वहिवाटीच्या जागा, जमिनींची मालकी मच्छीमारांच्या नावे सातबारा उताºयावर लावण्यात यावी, मासेमारी बंदराच्या विकासासाठी एकत्रित कार्यक्र म हाती घेण्यात यावा.व मासेमारी बंदरे बांधण्यात यावीत.च्मत्स्य दुष्काळ जाहीर करावा, प्रस्तावित जिंदाल जेट्टी व वाढवण बंदर रद्द करावे, १५ मे ते १५ आॅगस्ट असा मासेमारी बंदी कालावधी जाहीर करून त्याची कडक अंमलबजावणी करावी.च्राज्यातील मच्छीमारांची सर्व थकीत कर्जे शेतकºयांच्या कर्जांप्रमाणे माफ करण्यात यावीत, डिझेल तेलावर मिळणारा कर परतावा वेळेवर मिळावा.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेVasai Virarवसई विरार