शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

भात खरेदी केंद्राअभावी शेतकरी त्रस्त; कमी दरात व्यापाऱ्यांना भात विकण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 12:05 AM

आर्थिककोंडीमुळे भूमिपुत्र हैराण

पारोळ : आधीच अस्मानी संकटाने पूर्ण कोलमडून गेलेल्या शेतकऱ्यांना आता सरकारी छळवणुकीला सामोरे जावे लागत आहे. डिसेंबर महिना उजाडला तरी वसईत अद्याप भात खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नसल्याने शेतकरीवर्गाची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. या वर्षी परतीच्या पावसाने शेतकरीवर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाईची मदतही तुटपुंज्या स्वरूपात जाहीर झाली आहे, मात्र तीही अद्याप शेतकऱ्यांच्या हाती लागलेली नाही. रब्बी पिकांच्या खर्चाचा मेळ भात पीक विकून शेतकरी बसवत असतो. पण वसईत भात खरेदी केंद्र उपलब्ध न झाल्याने व्यापाऱ्यांना कमी दरात भात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

वसई तालुक्यातील शेतकरी पावसाळ्यात भाताचे एकमेव पीक घेतात. लहरी पावसामुळे कधी ओल्या तर कधी सुक्या दुष्काळाचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. प्रत्यक्ष भाताचे उत्पादन, वाढलेले मजुरीचे दर आणि शासनाने जाहीर केलेली आधारभूत हमीभाव रक्कम यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे भात कसण्यास शेतकऱ्यांना परवडत नाही.

भाताचे कोठार समजल्या जाणाºया वसई पूर्व भागात खासगी व्यापाºयांची चंगळ सुरू असून शेतकºयांच्या गरजेचा फायदा घेऊन हे व्यापारी कवडीमोलाने भात खरेदी करत आहेत. वसई तालुक्यात पहिले भात खरेदी केंद्र शिरवली येथील सेवा सोसायटीच्या गोदामात सुरू झाले. नंतर ते भिनार व मेढे येथे हलवले. या वर्षीही वसई तालुक्यात दोन भात खरेदी केंद्रे मंजूर असताना अजूनही ती सुरू झाली नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे, तर शिरवली हे ठिकाण या केंद्रासाठी योग्य असल्याने या ठिकाणी भात खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

भात खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना १२०० ते १३०० रु. क्विंटल दराने भात पीक खाजगी व्यापारी यांना विकावे लागत आहे, तर या वर्षी भात खरेदी केंद्राचा १७५० हमी भाव असून २०० रुपये महाराष्ट्र शासनाचा बोनस आहे. यामुळे वसईत भात खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे.- रमेश घरत, अध्यक्ष, शिरवली सेवा सोसायटी

टॅग्स :FarmerशेतकरीVasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार