शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

बंधाऱ्यांमधून गाळ काढल्याने परिसर पाणीदार; रोजगार हमी योजनेतून काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 23:41 IST

२८० मजुरांना मिळाला रोजगार, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

- राहुल वाडेकरविक्रमगड : तालुक्यातील खांड व उघाणी परिसरात बांधण्यात आलेल्या तीन कोल्हापूर टाईप बंधाºयांत मोठ्या प्रमाणात पुरामुळे गाळ साठला होता, त्याचप्रमाणे झाडेझुडुपेही वाढली होती. रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांमार्फत या बंधाºयांमधील गाळ काढण्यात आल्याने आता बंधाºयांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे.

विक्रमगड तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात मजुरांमार्फत कामे सुरू आहे. ग्रुप ग्रामपंचायत ओंदेअंतर्गत येणाºया खांड व उघाणी या गावालगतच्या तीन कोल्हापुरी बंधाºयांतून नुकतेच रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांमार्फत गाळ काढण्यात आला. हा गाळ जवळजवळ २७० ते २८० मजुरांमार्फत उपासण्यात आला. या मजुरांना दिवसाकाठी सरासरी २०५ ते २०६ रुपये मजुरी मिळाली आहे. या बंधाºयांतील गाळ काढल्याने बंधाºयांचे पाण्याचे नैसर्गिक जलस्त्रोत खुले झाले आहेत. पाणीसाठाही मोठ्या प्रमाणात झाला आहे.

बंधारा परिसरालगत असलेल्या शेतकºयांना याचा फायदा होणार आहे. शेतीत उन्हाळी हंगामातील पिकांना शेवटचे पाणी देणे शक्य होणार आहे. येथे नैसर्गिकरीत्या लाभलेले जलस्त्रोत कार्यान्वित केल्याने आता पाण्याची टंचाई भासणार नाही. बंधाºयांलगतचा परिसर पाणीदार झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तसेच रोजगार हमीअंतर्गत नाला खोलीकरण, सार्वजनिक मैदान सपाटीकरण व गावतलावातील गाळ काढणे ही कामे हाती घेण्यात आली असल्याची माहिती ओंदे ग्रुप ग्रामपंचायतच्या रोजगार हमी योजनेचे रोजगार सेवक रूपेश जाधव यांनी दिली.

ओंदे ग्रुप ग्रामपंचायतअंतर्गत येणाºया खांड व उघाणी येथील रोहयोअंतर्गत मजुरांमार्फत तीन बंधाºयांतील गाळ काढण्यात आला आहे. नाला खोलीकरण, सार्वजनिक मैदान सपाटीकरण व गावतलावातील गाळ काढणे ही कामे हाती घेण्यात आली असून मोठ्या प्रमाणात मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. -वंदना प्रसाद, ग्रामसेवक, ग्रुप ग्रामपंचायत, ओंदे बंधाºयांतील गाळ काढण्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत आम्हला ग्रामपंचायतीने स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून दिला आहे. अशी कामे ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात यावीत, जेणेकरून आम्हाला स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध होईल.- मदन शांताराम गोविंद, रोहयो मजूर, खांड

कोल्हापुरी बंधाºयांत मोठ्या प्रमाणात गाळ साठला होता, त्याचप्रमाणे झाडे-झुडुपे वाढली होती. आता गाळ काढल्याने पाणीसाठा होऊन लगतच्या शेतकºयांना पिकांसाठी पाण्याची टंचाई भासणार नाही.- विलास भाऊ पवार, बंधाºयांलगतचे शेतकरी

ग्रा.पं.ओंदे हद्दीमधील रोहयोअंतर्गत गाळ काढायचे काम झाले. त्यासाठी रोजगार सेवक, ग्रामसेवक, स.का.अधिकारी व तांत्रिक सहाय्यक यांचे मोलाचे योगदान लाभले.-आकाश आळशी, तांत्रिक सहाय्यक

टॅग्स :WaterपाणीVasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र