शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

बंधाऱ्यांमधून गाळ काढल्याने परिसर पाणीदार; रोजगार हमी योजनेतून काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 23:41 IST

२८० मजुरांना मिळाला रोजगार, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

- राहुल वाडेकरविक्रमगड : तालुक्यातील खांड व उघाणी परिसरात बांधण्यात आलेल्या तीन कोल्हापूर टाईप बंधाºयांत मोठ्या प्रमाणात पुरामुळे गाळ साठला होता, त्याचप्रमाणे झाडेझुडुपेही वाढली होती. रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांमार्फत या बंधाºयांमधील गाळ काढण्यात आल्याने आता बंधाºयांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे.

विक्रमगड तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात मजुरांमार्फत कामे सुरू आहे. ग्रुप ग्रामपंचायत ओंदेअंतर्गत येणाºया खांड व उघाणी या गावालगतच्या तीन कोल्हापुरी बंधाºयांतून नुकतेच रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांमार्फत गाळ काढण्यात आला. हा गाळ जवळजवळ २७० ते २८० मजुरांमार्फत उपासण्यात आला. या मजुरांना दिवसाकाठी सरासरी २०५ ते २०६ रुपये मजुरी मिळाली आहे. या बंधाºयांतील गाळ काढल्याने बंधाºयांचे पाण्याचे नैसर्गिक जलस्त्रोत खुले झाले आहेत. पाणीसाठाही मोठ्या प्रमाणात झाला आहे.

बंधारा परिसरालगत असलेल्या शेतकºयांना याचा फायदा होणार आहे. शेतीत उन्हाळी हंगामातील पिकांना शेवटचे पाणी देणे शक्य होणार आहे. येथे नैसर्गिकरीत्या लाभलेले जलस्त्रोत कार्यान्वित केल्याने आता पाण्याची टंचाई भासणार नाही. बंधाºयांलगतचा परिसर पाणीदार झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तसेच रोजगार हमीअंतर्गत नाला खोलीकरण, सार्वजनिक मैदान सपाटीकरण व गावतलावातील गाळ काढणे ही कामे हाती घेण्यात आली असल्याची माहिती ओंदे ग्रुप ग्रामपंचायतच्या रोजगार हमी योजनेचे रोजगार सेवक रूपेश जाधव यांनी दिली.

ओंदे ग्रुप ग्रामपंचायतअंतर्गत येणाºया खांड व उघाणी येथील रोहयोअंतर्गत मजुरांमार्फत तीन बंधाºयांतील गाळ काढण्यात आला आहे. नाला खोलीकरण, सार्वजनिक मैदान सपाटीकरण व गावतलावातील गाळ काढणे ही कामे हाती घेण्यात आली असून मोठ्या प्रमाणात मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. -वंदना प्रसाद, ग्रामसेवक, ग्रुप ग्रामपंचायत, ओंदे बंधाºयांतील गाळ काढण्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत आम्हला ग्रामपंचायतीने स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून दिला आहे. अशी कामे ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात यावीत, जेणेकरून आम्हाला स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध होईल.- मदन शांताराम गोविंद, रोहयो मजूर, खांड

कोल्हापुरी बंधाºयांत मोठ्या प्रमाणात गाळ साठला होता, त्याचप्रमाणे झाडे-झुडुपे वाढली होती. आता गाळ काढल्याने पाणीसाठा होऊन लगतच्या शेतकºयांना पिकांसाठी पाण्याची टंचाई भासणार नाही.- विलास भाऊ पवार, बंधाºयांलगतचे शेतकरी

ग्रा.पं.ओंदे हद्दीमधील रोहयोअंतर्गत गाळ काढायचे काम झाले. त्यासाठी रोजगार सेवक, ग्रामसेवक, स.का.अधिकारी व तांत्रिक सहाय्यक यांचे मोलाचे योगदान लाभले.-आकाश आळशी, तांत्रिक सहाय्यक

टॅग्स :WaterपाणीVasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र