शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

बंधाऱ्यांमधून गाळ काढल्याने परिसर पाणीदार; रोजगार हमी योजनेतून काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 23:41 IST

२८० मजुरांना मिळाला रोजगार, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

- राहुल वाडेकरविक्रमगड : तालुक्यातील खांड व उघाणी परिसरात बांधण्यात आलेल्या तीन कोल्हापूर टाईप बंधाºयांत मोठ्या प्रमाणात पुरामुळे गाळ साठला होता, त्याचप्रमाणे झाडेझुडुपेही वाढली होती. रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांमार्फत या बंधाºयांमधील गाळ काढण्यात आल्याने आता बंधाºयांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे.

विक्रमगड तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात मजुरांमार्फत कामे सुरू आहे. ग्रुप ग्रामपंचायत ओंदेअंतर्गत येणाºया खांड व उघाणी या गावालगतच्या तीन कोल्हापुरी बंधाºयांतून नुकतेच रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांमार्फत गाळ काढण्यात आला. हा गाळ जवळजवळ २७० ते २८० मजुरांमार्फत उपासण्यात आला. या मजुरांना दिवसाकाठी सरासरी २०५ ते २०६ रुपये मजुरी मिळाली आहे. या बंधाºयांतील गाळ काढल्याने बंधाºयांचे पाण्याचे नैसर्गिक जलस्त्रोत खुले झाले आहेत. पाणीसाठाही मोठ्या प्रमाणात झाला आहे.

बंधारा परिसरालगत असलेल्या शेतकºयांना याचा फायदा होणार आहे. शेतीत उन्हाळी हंगामातील पिकांना शेवटचे पाणी देणे शक्य होणार आहे. येथे नैसर्गिकरीत्या लाभलेले जलस्त्रोत कार्यान्वित केल्याने आता पाण्याची टंचाई भासणार नाही. बंधाºयांलगतचा परिसर पाणीदार झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तसेच रोजगार हमीअंतर्गत नाला खोलीकरण, सार्वजनिक मैदान सपाटीकरण व गावतलावातील गाळ काढणे ही कामे हाती घेण्यात आली असल्याची माहिती ओंदे ग्रुप ग्रामपंचायतच्या रोजगार हमी योजनेचे रोजगार सेवक रूपेश जाधव यांनी दिली.

ओंदे ग्रुप ग्रामपंचायतअंतर्गत येणाºया खांड व उघाणी येथील रोहयोअंतर्गत मजुरांमार्फत तीन बंधाºयांतील गाळ काढण्यात आला आहे. नाला खोलीकरण, सार्वजनिक मैदान सपाटीकरण व गावतलावातील गाळ काढणे ही कामे हाती घेण्यात आली असून मोठ्या प्रमाणात मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. -वंदना प्रसाद, ग्रामसेवक, ग्रुप ग्रामपंचायत, ओंदे बंधाºयांतील गाळ काढण्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत आम्हला ग्रामपंचायतीने स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून दिला आहे. अशी कामे ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात यावीत, जेणेकरून आम्हाला स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध होईल.- मदन शांताराम गोविंद, रोहयो मजूर, खांड

कोल्हापुरी बंधाºयांत मोठ्या प्रमाणात गाळ साठला होता, त्याचप्रमाणे झाडे-झुडुपे वाढली होती. आता गाळ काढल्याने पाणीसाठा होऊन लगतच्या शेतकºयांना पिकांसाठी पाण्याची टंचाई भासणार नाही.- विलास भाऊ पवार, बंधाºयांलगतचे शेतकरी

ग्रा.पं.ओंदे हद्दीमधील रोहयोअंतर्गत गाळ काढायचे काम झाले. त्यासाठी रोजगार सेवक, ग्रामसेवक, स.का.अधिकारी व तांत्रिक सहाय्यक यांचे मोलाचे योगदान लाभले.-आकाश आळशी, तांत्रिक सहाय्यक

टॅग्स :WaterपाणीVasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र