शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

घनकचरा प्रकल्प हटविण्यासाठी धारावी बेट जनआक्रोश मोर्चाची पालिकेवर धडक   

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 8:17 PM

उत्तन येथील धावगी-डोंगर परिसरात सुरु असलेला घनकचरा प्रकल्प त्वरीत हटविण्यासाठी ग्रामस्थांनी धारावी बेट जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून बुधवारी पालिकेवर धडक दिली. त्यावेळी सर्व पक्षीय नगरसेवकांना निवेदनाच्या प्रती वाटून उत्तनवासियांच्या न्यायासाठी महासभेत आवाज उठविण्याचे आवाहन करण्यात आले. 

भार्इंदर - उत्तन येथील धावगी-डोंगर परिसरात सुरु असलेला घनकचरा प्रकल्प त्वरीत हटविण्यासाठी ग्रामस्थांनी धारावी बेट जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून बुधवारी पालिकेवर धडक दिली. त्यावेळी सर्व पक्षीय नगरसेवकांना निवेदनाच्या प्रती वाटून उत्तनवासियांच्या न्यायासाठी महासभेत आवाज उठविण्याचे आवाहन करण्यात आले. 

धारावी बेट जनआक्रोश मोर्चा समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नगरसेवकांना दिलेल्या निवेदनात गेल्या १० वर्षांपासुन उत्तन घनकचरा प्रकल्पात सुमारे १० लाख टन कचय््रााचा डोंगर उभा राहिला आहे. त्याचा वाद सध्या उच्च न्यायालयासह राष्ट्रीय हरित लवादाकडे प्रलंबित आहे. लवादाच्या आदेशानुसार पालिकेने महाराष्टÑ प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) निर्देशानुसार कचय््राावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रीया करणे आवश्यक असतानाही पालिकेने त्याचे उल्लंघन केले. एमपीसीबीने हि बाब सतत न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने लवादाने पालिकेला १८ महिन्यांत प्रकल्प स्थलांतर करण्याचे निर्देश दिले. दरम्यान त्याला विलंब लागण्याची शक्यता हेरुन पालिकेला कचय््राावर तात्पुरती प्रक्रीया करण्याकरीता व्यवस्था करण्याचे आदेश दिले. परंतु, ३० महिने उलटल्यानंतरही पालिकेने कोणतीही हालचाल न करता कचय््राावरील  प्रक्रीयेसाठी ७ वर्षांसाठी परस्पर कंत्राटदाराची नियुक्ती केली. त्यासाठी एमपीसीबीची परवानगीच घेतली नसल्याचा दावा मोर्चाने निवेदनात केला आहे. सध्या प्रकल्पात टाकण्यात येणाय््राा सुक्या कचय््राातील केवळ प्लास्टिक कचय््रााचेच वर्गीकरण करण्यात येत आहे. ओल्या कचय््राावरील प्रक्रीया पालिकेने अद्याप सुरु केली नसल्याने येत्या पावसाळ्यात कचय््राातील सांडपाणी लोकवस्तीत पसरुन रोगराई पसरण्यासह डोंगराखालील शेती व पाण्याच्या स्त्रोतात मिश्रित होऊन शेतीचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पालिकेने त्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नसुन प्रकल्पात कचय््रााचे प्रमाण वाढून त्यातील दुर्गंधीमुळे नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. गेल्या १० वर्षांपासुन स्थानिकांनी हा प्रकल्प हटविण्यासाठी सतत पालिकेकडे पाठपुरावा केला. प्रसंगी न्यायालयात धाव घेतली. परंतु, पालिकेने सर्वांचीच फसगत केल्याचा आरोप कोलासो यांनी केला आहे. हे प्रश्न प्रशासनाला अनुत्तरीत करणारे असल्याचा दावा करीत  लोकप्रतिनिधींनी उत्तनवासियांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या स्थलांतरासाठी येत्या १ मे पासून प्रकल्पात येणाय््राा कचय््रााच्या गाड्या रोखून धरण्याचा इशारा मोर्चाद्वारे देण्यात आल्याने पालिकेने येत्या २७ एप्रिलला समितीच्या सर्व सदस्यांना चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. मात्र त्यात प्रशासनाकडून सदस्यांचे समाधान न झाल्यास आंदोलनाची दिशा ठरविली जाणार असल्याचे कोलासो यांनी सांगितले.

  या प्रकल्पाच्या स्थलांतराबाबत शिवसेना नगरसेविका शर्मिला बगाजी-गंडोळी व काँग्रेस नगरसेवक अनिल सावंत यांनी बुधवारच्या महासभेत लक्षवेधी मांडली होती.   त्यावर चर्चा न करताच अक्षय तृतीयेमुळे सभा तहकुब झाल्याचे महापौर डिंपल मेहता यांनी जाहिर केले. त्यामुळे शर्मिला यांनी लक्षवेधीवर चर्चा न केल्यास त्याचा आपण सुरुवातीलाच निषेध नोंदवित असल्याचे त्यांनी सांगितले. अखेर चर्चाच झाली नाही. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक