शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
2
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
3
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
4
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
5
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
6
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
7
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
8
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
9
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
10
स्मरण दिन अन् गुरुवार, सलग २ दिवस सेवा करायची सुवर्ण संधी; स्वामी महाराज शुभ तेच होईल!
11
स्वामी समर्थ पुण्यतिथी: 'स्वामी' म्हणजे नक्की कोण? 'या' शब्दाचा गर्भितार्थ तुम्हाला माहीत होता का?
12
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
13
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
14
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
15
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
16
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
17
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
18
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
19
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
20
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
Daily Top 2Weekly Top 5

गडचिंचले तिहेरी हत्याकांडप्रकरणी १६५ आरोपींविरोधात दोषारोपपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 02:20 IST

या प्रकरणात दोन कलमान्वये दोन विविध गुन्ह्यात १६५ आरोपीवर दोषारोप ठेवले असून यात ११ अल्पवयीन आरोपींचाही समावेश आहे.

पालघर : गडचिंचले येथे घडलेल्या दोन साधू आणि त्यांच्या चालकाच्या तिहेरी हत्याकांड प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाने ( सीआयडी) पूर्ण करीत न्यायालयासमोर १० हजार ८७६ पानांचे आरोपपत्र ठेवले. या प्रकरणात दोन कलमान्वये दोन विविध गुन्ह्यात १६५ आरोपीवर दोषारोप ठेवले असून यात ११ अल्पवयीन आरोपींचाही समावेश आहे.

डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या गडचिंचले गावात १६ एप्रिल रोजी आपल्या गुरूच्या अंत्यसंस्काराला जाणाऱ्या चिकणे महाराज कल्पवृक्षगिरी (७०), सुशीलगिरी महाराज (३५) असे दोन साधू आणि त्यांच्या गाडीचा चालक नीलेश तेलगडे (३०) यांची अमानुष हत्या करण्यात आली होती. चोर किंवा आपल्या मुलांच्या किडण्या काढण्यास आल्या असल्याच्या गैरसमजातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत असले तरी या प्रकरणात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाला राजकीय अथवा धर्माचा रंग न देण्याचे आवाहन करत पालघर पोलिसांकडून तपास काढून सीआयडीकडे सोपविला होता.

या प्रकरणात तत्कालीन पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्यावर ‘स्लॅक सुपर व्हिजन’चा ठपका ठेवीत त्यांची उचलबांगडी करण्यात आली होती. तर कासा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद काळे, एक उपनिरीक्षक आणि अन्य ३ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करीत ४० कर्मचाºयांच्या तात्काळ बदल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्या होत्या. यानंतर कासा पोलीस ठाण्याचा कारभार कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी सिद्धवा जायभाये यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

नवी मुंबईच्या कोकण भवन येथील गुन्हे अन्वेषण विभागाने हे प्रकरण २१ एप्रिल रोजी हाती घेतल्यानंतर पोलीस अधीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विजय पवार आणि इरफान शेख यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली होती. त्यांनी प्रथम या प्रकरणाचे व्हिडीओ, फोटो, आरोपींबाबत माहिती देण्याचे आवाहन केले होते. या हत्येप्रकरणी भादंवि कलम ३०२, ३०७ आदी विविध कलमान्वये आपत्ती निवारण कायदा २००५ चे कलम ५१ (ब) ५२, ५४, साथरोग नियंत्रण कायदा १८९७ चे कलम २, ३, ४ व ५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम ३७ (१)(३) १३५ व महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियमअन्वये विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. २१ एप्रिल रोजी या प्रकरणाचा तपास गुन्हा अन्वेषण विभागाने हाती घेतल्यानंतर ८४ दिवसांच्या तपासानंतर बुधवारी दाखल केलेल्या आरोपपत्रात ८०८ संशयितांची चौकशी केली असून १०८ जणांच्या साक्षी नोंदविल्या आहेत.अफवेमुळेच घडले हत्याकांडदोन विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी पवार यांनी १२६ आरोपींविरोधात ४,९५५ पानांचे आरोपपत्र तर दुसºया गुन्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी शेख यांनी ही १२६ आरोपींविरोधात ५९२१ पानांचे आरोपपत्र डहाणू न्यायालयापुढे बुधवारी दाखल केले. या हत्याकांड प्रकरणी तपास करणाºया पोलिसांवर दगडफेक आणि सरकारी कामात हस्तक्षेप प्रकरणी अन्य एक गुन्हा दाखल असून त्याचा तपास सुरू आहे. हत्याकांड प्रकरणी दाखल आरोपपत्रात तिघांचे झालेले हत्याकांड हे धार्मिक हेतूने झाले नसून एका अफवेच्या प्रकरणातून झाल्याचे पोलिसांनी न्यायालयापुढे मांडल्याची माहिती पुढे येत आहे.या हत्या मुले पळविण्याच्या अफवेमुळेच झाल्या, हे आता आरोपपत्रावरून स्पष्ट झाले आहे. तपास पूर्ण होण्याआधीच काहींनी या घटनेस राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला, हे दुर्दैवी आहे. कोरोना साथीचे संकट असूनही ‘सीआयडी’ पथकाने नेटाने तपास करून वेळेत आरोपपत्र सादर केले हे नक्कीच कौतुकास्पद आहे.- अनिल देशमुख, गृहमंत्री

टॅग्स :Courtन्यायालयpalgharपालघर