शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांची तारांबळ

By admin | Updated: March 26, 2016 02:41 IST

पालघर जिल्ह्यातील ३१५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जासोबत लागणाऱ्या जातीचे ना हरकत दाखल्यासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळपासून

पालघर : पालघर जिल्ह्यातील ३१५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जासोबत लागणाऱ्या जातीचे ना हरकत दाखल्यासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळपासून आलेल्या उमेदवारांचे अर्ज दिवसभरात बनवून दिले जात नसल्याने एकच गोंधळ उडाला होता. जि. प. सदस्य प्रकाश निकम यांच्या प्रयत्नानंतर प्रशासनाने वाढीव मनुष्य बळाची सोय केल्यानंतर अनेक प्रकरणे मार्गी लागली.पालघर जिल्ह्यातील एकूण ४७० ग्रामपंचायती पैकी ३१५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका १७ एप्रिल रोजी होणार असून नामनिर्देशनपत्र सादर करण्याची शेवटची तारीख २९ मार्च ते २ एप्रिल दरम्यान आहे. पालघर जिल्ह्यातील पालघर मधून (५६), वाड्यातुन (७०), वसईतुन (११), डहाणूतून (६२), तलासरी (१२), विक्रमगड (३६), जव्हार (४७), व मोखाडा (२१), अशा तालुकानिहाय ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. या ३१५ ग्रामपंचायतीपैकी अनेक ग्रामपंचायती पेसा अंतर्गत येत असल्याने त्यातील शंभर टक्के जागा आरक्षित राहणार आहेत. त्यामुळे निवडणुक लढवायची असेल तर उमेदवारी अर्ज दाखल करताना संबंधीत उमेदवाराला आपल्या अर्जासोबत जात प्रमाणपत्राची पडताळणी करून घेणे बंधनकारक ठरणार आहे. त्यासाठी संबंधीत तहसिलदाराकडून कागदपत्रे तपासणी करून आणल्यानंतर तसे नाहरकत प्रमाणपत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिले जाते. त्यासाठी मागील आठवडाभरापासून विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, तलासरी इ. ग्रामीण भागातून हजारो इच्छुक उमेदवार आपल्या गावातून पहाटे जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या फाईली जमा करून ठाण मांडून बसले होते. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयात असणाऱ्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे इच्छुक उमेदवारांना संध्याकाळपर्यंत पत्र मिळत नव्हते. त्यामुळे पहाटे आपल्या गावाहुन बस पकडून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर संध्याकाळी ७ वाजेपर्यंत पत्र मिळत नसल्याने माघारी घरी परत जाण्यासाठी एस.टी बस नसल्याने अनेकांची कुचंबना होणार होती. (प्रतिनिधी)