शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

'तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका ओळखा; वसई-विरार महापालिका आयुक्तांची तात्काळ नियुक्ती करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 22:22 IST

रुग्णालयांची व्यवस्था, लसीकरण आणि बुस्टर डोसची व्यवस्था, कचऱ्याची व्यवस्था, तसेच मूलभूत नागरी सोयी-सुविधांसंदर्भातील गंभीर प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी प्रशासक तथा आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची सध्या वसई विरार शहराला गरज आहे.

वसई - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका ओळखून आणि महापालिकेच्या आरोग्य विभागासह इतरही विभागांची स्थिती लक्षात घेऊन वसई-विरार महापालिकेत तातडीने प्रशासक तथा आयुक्तांची नियुक्ती करावी, अशी मागणी वसई-विरार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनही दिले आहे.

आपल्या निवेदनात आल्मेडा म्हणाले, शहराची लोकसंख्या २५ लाखांपेक्षा अधिक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वसई-विरार शहरात पसरत आहे. मात्र अजूनही काही कोविड  रुग्णालये कार्यान्वित झालेली नाहीत. ज्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही, त्यांना कोरोनाच्या तिसरा लाटेचा मोठा फटका बसू शकतो. त्यात शहरातील मूलभूत नागरी सोयी-सुविधांकडे लक्ष देणे आणि कोवीड-१९ लसीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शहरात कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या २००० वर गेली असून ही बाब गंभीर आहे. 

दरम्यान, रुग्णालयांची व्यवस्था, लसीकरण आणि बुस्टर डोसची व्यवस्था, कचऱ्याची व्यवस्था, तसेच मूलभूत नागरी सोयी-सुविधांसंदर्भातील गंभीर प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी प्रशासक तथा आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची सध्या वसई विरार शहराला गरज आहे. त्यामुळे महापालिकेत तातडीने प्रशासक अथवा आयुक्तांची नेमणूक करावी, असे काँग्रेसने म्हटले आहे.

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे