शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
3
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
4
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
5
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
6
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
7
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
8
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
9
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
10
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
11
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
12
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
13
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
14
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
15
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
16
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
17
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
18
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
19
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
20
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?

काळूू धरणविरोधातील आंदोलन अधिक तीव्र, दलालांना घडवणार अद्दल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 06:29 IST

दलालांना घडवणार अद्दल : शेतकरी संघर्ष मंच सक्रिय; ४१ गावच्या ग्रामस्थांची तयारी सुरू

सुरेश लोखंडेठाणे : मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठ्यासाठी मुरबाड तालुक्यात काळू धरण बांधण्यात येणार आहे. परंतु, बनावट डिझाइन, बनावट धरणाचे काम सुरू केल्याच्या मुद्यावरून या धरणाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तरीदेखील सरकार धरणासाठी दबाव आणत असल्याचा आरोप करून त्याविरोधात लवकरच रस्त्यावर उतरून आंदोलन तीव्र करण्याची तयारी संबंधित ४१ गावांच्या ग्रामस्थांनी सुरू केली आहे. याशिवाय, धरण क्षेत्रातील जमीनविक्री करणाऱ्या दलालांनाही कायमची अद्दल घडवण्याचे प्रयत्नही सुरू झाले आहे.

आंदोलनाची आगामी रणनीती ठरवण्यासाठी दिघेफळ येथे बुधवारी काळू धरणविरोधी शेतकरी कष्टकरी व भूमिहीन समुदाय मंचची बैठक पार पडली. शासनाने कितीही दडपशाही अवलंबली, तरी आता मागे सरणार नाही. उलट, अधिक ताकदीने संघर्ष उभा करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा. रास्ता रोको करा, असे चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपटराव देखमुख यांनी ४१ गावांतील शेतकºयांना मार्गदर्शन केले. धरण क्षेत्रातील जमीनविक्री करून दलाली कमावणाºया परिसरातील दलालांचा समाचार घेण्याचेदेखील यावेळी सुरेश देशमुख यांनी सांगितले. तर, खरेदी केलेल्या जमिनी शेतकºयांना पुन्हा मिळवून देत हक्काचे रक्षण करण्याचे धोरण या पुढील आंदोलनात स्वीकारणात येणार असल्याचे काळू धरणविरोधी शेतकरी मंचचे सक्रिय कार्यकर्ते प्रवीण देशमुख यांनी सांगितले. काळू धरणासाठी कोणत्याही प्रकारच्या मान्यता नसतानाही ते बांधायला निघालेल्या पाटबंधारे विभागाची आधीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडूनझाडाझडती घेण्यात आली. त्याआधी बनावट डिझाइन व नकाशाद्वारे बांधकाम हाती घेतलेल्या या धरणाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे.धरणावर ११२ कोटी खर्चाची बनवाबनवीया धरणावर सुमारे दीड ते दोन वर्षांत ११२ कोटी खर्च झाल्याचे बोलले जात आहे. सुमारे २० टक्के काम झाल्याचे सांगितले जात असतानाच पाटबंधारे विभागाच्या काही अभियंत्यांसह ठेकेदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चक्र व्यूहात अडकले आहेत. मुळात या धरणाचे लॅण्ड अ‍ॅक्विझिशन झालेले नसल्याचे सांगितले जात आहे. वनविभागाची मान्यता नाही. आठ ग्रामपंचायतींचे बोगस ठराव असल्याचे न्यायालयाने आधीच उघड केले आहे. नवीन कायद्यानुसार या धरणामुळे होणारे ‘सामाजिक परिणाम’ अहवाल अद्यापही तयार नाही. नष्ट होणाºया वनसंपदेबाबत वनखात्याची सहमती नाही. यामुळे या धरणाच्या कामाविरोधात जनहित याचिका दाखल करत श्रमिक मुक्ती संघटनेने स्थगितीदेखील मिळवलेली आहे. तरीदेखील प्रशासनाकडून छुप्या मार्गाने दडपशाही सुरू असल्याची चर्चा या बैठकीत झाली. यामुळे काळू धरणविरोधी आंदोलन पुन्हा पेट घेण्याची शक्यता दिसून येत आहे.काळू धरणात जाणार दोन हजार १९९ हेक्टर जमीन : धरण क्षेत्रात ठिकठिकाणी बैठका घेऊन ४१ गावांमधील सुमारे १८ हजार गावकºयांना जनआंदोलनासाठी तयार केले जात आहे. संभाव्य काळू धरण दोन हजार १९९ हेक्टर शेतजमिनीसह वनजमिनीवर बांधले जाणार आहे. पण, अद्याप महसूल विभागाकडून या जमिनीचे संपादनही केलेले नाही. धरणाचे मूळ डिझाइन, आदी नाशिकच्या सरकारी इन्स्टिट्यूटचे कोणतेही नकाशे नसतानाही या धरणाचे काम एफे कन्स्ट्रक्शन्स कंपनीने सुरू केले होते. त्याविरोधात उच्च न्यायालयाने या धरणाच्या कामास स्थगिती दिली आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारDamधरण