शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

५०० कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:00 IST

गत सहा दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने अद्यापही उसंत घेतली नाही. यामुळे जिल्ह्यात कृषी क्षेत्राची सर्वाधिक हानी झाली आहे. घरांची पडझड, जनावरे वाहून जाणे, वीज खांब कोसळणे, रस्ते खरडून जाणे, कालव्यांची नासधूस, या सर्व क्षेत्राचे नुकसान ५०० कोटींच्या घरात पोहोचले आहे.

ठळक मुद्देअतिवृष्टी : प्राथमिक अंदाज, शेतजमीन खरडून गेल्याने फटका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गत सहा दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने अद्यापही उसंत घेतली नाही. यामुळे जिल्ह्यात कृषी क्षेत्राची सर्वाधिक हानी झाली आहे. घरांची पडझड, जनावरे वाहून जाणे, वीज खांब कोसळणे, रस्ते खरडून जाणे, कालव्यांची नासधूस, या सर्व क्षेत्राचे नुकसान ५०० कोटींच्या घरात पोहोचले आहे.दारव्हा, दिग्रस, आर्णी, महागाव, उमरखेड, नेर, पुसद या सात तालुक्यात वार्षिक सरासरीच्या ७१ टक्के पाऊस नोंदविला गेला. त्यामुळे या तालुक्यात एक प्रकारची नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली आहे. आर्णी तालुक्याने तर वार्षिक सरासरी ओलांडली आहे. हा पाऊस मासिक सरासरीच्या २०० पट अधिक आहे. अतिपावसाचा पिकांना जबर फटका बसला आहे. कृषी मालाचे उत्पादन घटण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेत जमिनीतूनच पूर गेल्याने पिके खरडून गेली आहे. जीवित हानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. मालमत्तांचे नुकसान न मोजता येण्याजोगे आहे.नदी, नाल्यांना आलेला पूर, फुटलेले कालवे आणि खोलगट भागामुळे जिल्ह्यात ६१ हजार ९३० हेक्टरवरील पीक खरडून गेले आहे. हेक्टरी ५० हजारांप्रमाणे ३०९ कोटी रूपयांच्या पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शिवारातील नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू असून हेक्टरी नुकसानीची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. २०० किमी रस्ते पुरामुळे वाहून गेले आहेत. दुरूस्तीसाठी २५ कोटी रूपयांचा निधीची गरज आहे.कालवे दुरूस्तीसाठी पाच कोटींचा निधी लागणार आहे. सहा हजार ७०६ घरांची पडझड झाली. ५० हजारांप्रमाणे हे नुकसान ३३ कोटींच्या घरात आहे. २५९ जनावरे वाहून गेली आहे. तिघांचा मृत्यू झाला. ७९ लाख ७५ हजार रूपयाची मदत वितरित केली गेली. यात धान्य, कपडे, भांडे, केरोसीनचा समावेश आहे.वीज वितरण कंपनीचेही नुकसानपूर पीडित क्षेत्रात वीज वितरण कंपनीचे ट्रान्सफार्मर कोसळले आहेत. अनेक खांब कोलमडले, तारा तुटल्या. यातून वीज वितरण कंपनीला तब्बल ५० लाख रूपयांच्या नुकसानीचा सामना करावा लागला.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती