शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

यंदा केवळ २५ टक्केच पोपट रामनगरात परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 05:00 IST

वर्धा शहराचा हरित भाग म्हणून ओळख असलेल्या एमगिरी आणि मगनवाडी भागात मागील अनेक वर्षांपासून सायंकाळच्या सुमारास लाखो पोपट मुक्कामी यायचे. सध्या मुक्कामी येणाºया पोपटांची संख्या रोडावली असून त्याला विकासाच्या नावाखाली करण्यात आलेली अवैध वृक्षतोड जबाबदार आहे. एरव्ही फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात या भागात मोठ्या संख्येने पोपट मुक्कामी यायचे. परंतु, यंदाच्या वर्षी केवळ २५ टक्केच पोपट आलेत.

ठळक मुद्देवृक्षतोडीचा परिणाम; पाच दशकांची परंपरा खंडित, जिल्हा प्रशासनाने वेळीच पाऊल उचलण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रामनगर भागातील मगनवाडी परिसरातील डेरेदार वृक्षांची विकासाच्या नावावर कत्तल करण्यात आली. याचा परिणाम तेथे मुक्कामी येणाऱ्या पोपटांवर झाला असून यंदा केवळ २५ टक्केच पोपट परतल्याची नोंद एका ज्येष्ठ वन्यजीव प्रेमीने घेतली आहे. विकासाच्या नावावर होणारी वृक्ष कत्तल वेळीच थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य पाऊल उचलावे अन्यथा सुमारे पाच दशकांची परंपरा खंडित होईल, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.वर्धा शहराचा हरित भाग म्हणून ओळख असलेल्या एमगिरी आणि मगनवाडी भागात मागील अनेक वर्षांपासून सायंकाळच्या सुमारास लाखो पोपट मुक्कामी यायचे. सध्या मुक्कामी येणाºया पोपटांची संख्या रोडावली असून त्याला विकासाच्या नावाखाली करण्यात आलेली अवैध वृक्षतोड जबाबदार आहे. एरव्ही फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात या भागात मोठ्या संख्येने पोपट मुक्कामी यायचे. परंतु, यंदाच्या वर्षी केवळ २५ टक्केच पोपट आलेत. ७५ टक्के पोपट यंदा परत का आले नाही, त्यांच्यात असुरक्षिततेची भावना तर निर्माण झाली नाही आदी सध्या संशोधनाचा विषय ठरत आहे.तीन वर्षांपासून करीत आहेत सखोल अध्ययनजेष्ठ वन्यजीव प्रेमी कौशल मिश्रा हे मागील तीन वर्षांपासून सदर विषयाचे अध्ययन करीत आहेत. शहरात होत असलेली अवैध वृक्षतोड हा प्रकार सध्या मगनवाडी भागात मुक्कामी येणाºया पोपटांचे तेथील अस्थित्त्वच संपविणारा ठरत असल्याचे त्यांच्या आतापर्यंतच्या अध्ययनात पुढे आले आहे. एमगिरी आणि मगनवाडी येथील पोपटांचे अस्थित्त्व कायम रहावे, यासाठी शासकीय स्तरावर विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे.रामनगर भागातील एमगिरी व मगनवाडी परिसरातील जैवविविधता दिवसेंदिवस नष्ट होत आहे. याचाच परिणाम तेथे मुक्कामी येणाºया पोपटांच्या संख्येवर झाला असल्याचे आतापर्यंतच्या माझ्या अध्ययनात पुढे आले आहे. जिल्ह्यातील पक्षीमित्र व जिल्हा प्रशासनाने एकत्र येत वेळीच योग्य पाऊल उचलले पाहिजे.- कौशल मिश्रा, ज्येष्ठ वन्यजीव प्रेमी, वर्धा.

टॅग्स :Natureनिसर्ग