शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

‘गाळमुक्त धरणा’ची कामे केवळ ४.८० टक्केच पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 10:18 PM

गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार ही शेतकरी हितार्थ असलेली योजना यंदा वर्धा जिल्ह्यात तिसऱ्यांदा राबविली जात आहे. यंदाच्या वर्षी तब्बल ४८ कामे हाती घेण्यात आली आहे; पण केवळ २० कामांचा श्रीगणेशा वेळीच करण्यात आल्याने हे काम ढेपाळल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. विशेष म्हणजे सध्या केवळ ४.८० टक्के काम झाले आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । ४८ पैकी केवळ २० कामे सुरू, कामांना वेळीच गती देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार ही शेतकरी हितार्थ असलेली योजना यंदा वर्धा जिल्ह्यात तिसऱ्यांदा राबविली जात आहे. यंदाच्या वर्षी तब्बल ४८ कामे हाती घेण्यात आली आहे; पण केवळ २० कामांचा श्रीगणेशा वेळीच करण्यात आल्याने हे काम ढेपाळल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. विशेष म्हणजे सध्या केवळ ४.८० टक्के काम झाले आहे.हिंगणघाट तालुक्यातील सावली (वाघ) येथील गाव तलाव गाळमुक्त करण्याचे काम सध्या ४०.५८ टक्के पूर्ण झाले आहे. तर याच तालुक्यातील लघुसिंचन तलाव धामणगावचे काम ३.३३ टक्के झाले आहे. साठवण तलाव आर्वी (छ.) ५५.५६ टक्के झाले. तर लघुसिंचन तलाव सेलू (मु.), गाव तलाव चिकमोह, पाझर तलाव उमरी (येंडे), साठवण तलाव कानगाव व साठवण तलाव भैय्यापूरचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. शिवाय समुद्रपूर तालुक्यातील गावतलाव साखरा २३.३३ टक्के, गाव तलाव पिंपळगाव ७६.६७ टक्के, साठवण तलाव गिरड-१०.० टक्के, गावतलाव समुद्रपूर ५.५० टक्के, लघुसिंचन तलाव नंदोरी ६.०० टक्के, पाझर तलाव मंगरूळ ३.३३ टक्के काम झाले आहे. तर साठवण तलाव पिंपरी, साठवण तलाव गिरड-२, गावतलाव दसोडा-२, गावतलाव कानकाटी येथून गाळ काढण्यास सुरूवात करण्यात आलेली नाही. देवळी तालुक्यातील गाव तलाव कोळोणा (चो.) ६०.०० टक्के, पाझर तलाव कोल्हापूर (राव) १४.०० टक्के काम झाले आहे. तर पाझर तलाव गौळ येथून मुठभरही गाळ काढण्यात आलेला नाही.आष्टी तालुक्यातील लघुसिंचन तलाव पांढुर्णा, पाझर तलाव तळेगाव (श्या.पंत.), साठवण तलाव इंदरमारी येथून एक मिटरही गाळ काढण्यात आलेला नाही. आर्वी तालुक्यातील पाझर तलाव आजनगाव ३५ टक्के गाळ काढण्यात आला आहे. तर पाझरतलाव सालधरा, पाझर तलाव पांझरा (बो.), लघुसिंचन तलाव काकडधरा, लघुसिंचन तलाव गौरखेडा येथून गाळ काढण्याच्या कामाला सुरूवात झालेली नाही. लघुसिंचन तलाव आजनादेवी ३० टक्के, लघुसिंचन तलाव ठाणेगाव २ टक्के गाळ काढण्यात आला आहे. तर लघुसिंचन तलाव पिपरी, पाझर तलाव आगरगाव, गावतलाव बांगडापूर, लघुसिंचन तलाव सेलगाव, लघुसिंचन तलाव सुसुंद्रा, साठवण तलाव बोंदरठाणा येथून गाळ काढण्यात आलेला नाही.केळझरच्या दोन तलावातून काढला १०० टक्के गाळसेलू तालुक्यातील गाव तलाव केळझर व गणेश तलाव केळझर येथून १०० टक्के गाळ काढण्यात आला आहे. असे असले तरी गाव तलाव सोंडी, ल.पा. तलाव पांझरा बोधली, ल.पा. तलाव कुºहा, ल.पा. तलाव दहेगाव (गोंडी), ल.पा. तलाव आष्टी, सेलू तालुक्यातील मदन प्रकल्प, समुद्रपूर तालुक्यातील पोथरा प्रकल्प, कारंजा तालुक्यातील कार नदी प्रकल्प, आर्वी तालुक्यातील सुकळी ल.पा. प्रकल्पातून मुठभरली गाळ काढण्यात आलेला नाही.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई