शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोण पास, कोण फेल, ४ जूनला निकाल

By रवींद्र चांदेकर | Updated: May 4, 2024 16:10 IST

सर्वांचीच धडधड वाढली : विधानसभेचा गड सर करण्याची चिंता

वर्धा : लोकसभेसाठी २६ एप्रिलला मतदान पार पडले. त्याला आठ दिवस लोटले. निवडणुकीत खासदारांसह आमदारांचीही परीक्षा पार पडली. या परीक्षेत नेमके कोण पास झाले अन् कोण फेल झाले, याचा ४ जूनला मतमोजणीअंती निकाल लागणार आहे.

वर्धा लोकसभा मतदारसंघात तब्बल ६४.८५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तत्पूर्वी १६ दिवस प्रचार तोफा धडधडत होत्या. गावोगावी प्रचाराचा धुराळा उडला होता. जागोजागी निवडणुकीची चर्चा सुरू होती. मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी उमेदवार आणि त्यांचे समर्थक जिवाचे रान करीत होते. लोकसभा मतदारसंघातील आमदारही आपापल्या उमेदवारासाठी घाम गाळत होते. निवडणूक खासदारकीची, मात्र परीक्षा आमदारांची होती. त्यामुळे सर्व आमदार आपापल्या विधानसभा मतदारसंघात परिश्रम घेत होते. अगदी २५ एप्रिलच्या रात्रीपर्यंतपर्यंत त्यांनी जोमाने काम केले. त्यानंतर २६ एप्रिलला प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही आमदारांनी मतदार बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.

निवडणुकीची तारीख आणि उमेदवारी घोषित झाल्यापासून जवळपास २३ ते २५ दिवस निवडणुकीची धामधूम सुरू होती. अहोरात्र उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते, पक्षाचे पदाधिकारी कामात मग्न होते. आपला उमेदवार कसा विजयी होईल, याची रणनीती आखण्यात ते व्यस्त होते. यानंतर प्रत्यक्ष मतदानाचा दिवस उजाडला. २६ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. मतदारांनी आपल्या मनातील उमेदवाराच्या नाव व चिन्हासमोरील बटण दाबून आपले ‘दानाचे कर्तव्य’ निभावले. मतदार आपले कर्तव्य निभावून निश्चिंत झाले असले तरी आता उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची चुळबुळ सुरू झाली आहे.खासदारकीच्या या निवडणुकीत सहा आमदारांनी परीक्षा दिला. त्यापैकी किती आमदार परीक्षेत पास अन् फेल झाले, याचा उलगडा ४ जूनला मतमोजणीअंती होणार आहे. कोणत्या आमदाराच्या विधानसभा मतदारसंघात ‘त्यांचा’ उमेदवार सरस ठरतो, यावरून त्यांची परीक्षा होणार आहे. त्यांच्या मतदारसंघात उमेदवार आघाडीवर किंवा मागे राहिल्यास, त्याचे फळ त्यांना मिळू शकते. त्यावरूनच त्यांची पुढील विधानसभेची उमेदवारी ठरण्याची शक्यता आहे. त्यांचा उमेदवार माघारल्यास त्यांच्याऐवजी मतदारसंघातील ‘नव्या’ इच्छुकाला संधी मिळण्याची शक्यता आहे.

पाच विरुद्ध एक आमदारनिवडणुकीत महायुतीच्या बाजूने पाच, तर महाविकास आघाडीच्या बाजूने एक विधानसभा आमदार होते. यापैकी गेल्यावेळी महायुतीच्या उमेदवाराला मोर्शी विधानसभा मतदारसंघात ४८ हजार, हिंगणघाटमध्ये ३८ हजार, वर्धेत ३७ हजार, आर्वीत २६ हजार, धामणगावमध्ये १८ हजार, तर देवळी विधानसभा मतदारसंघातून १६ हजारांच्या वर आघाडी होती. महाविकास आघाडीच्या उमेदवार सर्वच विधानसभा मतदारसंघात मागे होत्या. या निवडणुकीत ही आघाडी कमी झाल्यास महायुतीसोबत असणाऱ्या आमदारांची चांगलीच गोची होणार आहे. विशेषत: दोन टर्मपासून आमदार असणाऱ्यांना पुन्हा उमेदवारी मिळविणे दुरापास्त होण्याची शक्यता आहे. अशावेळी विधानसभा निवडणुकीदरम्यान काही जण ऐनवेळी ‘दलबदल’ करण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. महाविकास आघाडीच्या बाजूने असलेल्या आमदारांच्या विधानसभेत त्यांच्या उमेदवाराला आघाडी न मिळाल्यास त्यांनाही पुढे उमेदवारी मिळविणे जड जाण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी त्यांनी अत्यंत ताकदीने काम केल्याचे सांगितले जात आहे.

मतदारांच्या मौनाने वाढवली चिंता

मतदार आपले कर्तव्य निभावून मौन झाले आहेत. त्यांनी आपले पत्ते अद्याप उघड केले नाही. मात्र, त्यांच्या भरवशावर विविध पक्षांचे कार्यकर्ते, गावपुढारीच अंदाज बांधत सुटले आहेत. मतदारांनी आपल्याच उमेदवाराला मत दिल्याचा कार्यकर्त्यांना विश्वास आहे. त्या आधारावरच त्यांचे गणित सुरू आहे. त्यातून विजयाची गुढी उभारण्यासाठी ते आतुर झाले आहेत. मात्र, मतदार मौन असल्याने त्यांची चिंता वाढली आहे. खरे चित्र ४ जूनलाच स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४VotingमतदानElectionनिवडणूक