शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

साहित्यिकांचीच वणवण; संमेलनाचे फलित काय? भारूकाकांनी उपस्थित केला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 12:03 IST

आत्मक्लेषाचीही दखल कोणी घेईना

वर्धा : बदलत्या अभ्यासपद्धती आणि इतर कारणांमुळे विद्यार्थ्यांवरील ताणतणाव वाढत गेले. यातूनच विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढीस लागले. हे सर्व भयावह चित्र पाहून ‘भारूकाका’ने शासकीय नोकरी सोडून विद्यार्थ्यांना आत्महत्येपासून रोखण्याकरिता आणि त्यांना नवी प्रेरणा देण्याकरिता ‘भारूकाकाची पत्रे’ हे पुस्तक लिहिले. हे पुस्तक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता शासनाने पुढाकार घ्यावा, म्हणून लेखक गेल्या काही वर्षांपासून वणवण भटकत आहे; परंतु त्यांना अद्यापही न्याय मिळाला नाही. त्यामुळे ‘येथे लेखक-साहित्यिकांचीच वणवण होत असेल तर कोट्यवधीचे साहित्य संमेलन घेण्याचे फलित तरी काय,’ असा संतप्त सवाल ‘भारूकाका’ म्हणजेच महेंद्र गौरीकुमार बैसाणे यांनी व्यक्त केला.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकरिता शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. कोट्यवधीचा खर्चही केला जातो. परंतु, अद्यापही साहित्यिक आणि लेखकांबद्दल जाणिवा बोथटच असल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. यादृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता यावी व त्यांनी तणावमुक्त होऊन येणाऱ्या परीक्षांना सामोरे जावे, यासाठी ‘भारूकाकाची पत्रे’ हे पुस्तक विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचविण्याकरिता ‘भारूकाका’ प्रयत्नरत आहेत. त्यांनी शालेय शिक्षणमंत्री व मराठी भाषा मंत्री, विश्व मराठी संमेलनादरम्यानही निवेदन सादर केले; मात्र अद्यापही कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा उज्ज्वलादेवी पाटील यांची प्रस्तावना आहे. तसेच हे पुस्तक म्हणजे विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण प्रशिक्षण क्रमच आहे. या पुस्तकाचा शासनाने नाही, तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी तरी विचार करावा, म्हणून आजी-माजी अध्यक्षांनाही साकडे घातले; पण त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत लेखक महेंद्र गौरीकुमार बैसाणे यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.

कोणी पुस्तक घेता का पुस्तक?

९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने लेखक महेंद्र बैसाणे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरी गाठली आहे. त्यांनी आयोजकांची भेट घेत आपले निवेदन दिले; परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. संमेलनाध्यक्षांसह महामंडळाचे अध्यक्ष, स्वागताध्यक्ष, कार्याध्यक्ष व समन्वयकांच्या नावे निवेदन तयार करून ‘कोणी पुस्तक घेता का पुस्तक?’ अशी विनंती त्यांनी केली आहे.

टॅग्स :literatureसाहित्यakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळwardha-acवर्धा