शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यिकांचीच वणवण; संमेलनाचे फलित काय? भारूकाकांनी उपस्थित केला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 12:03 IST

आत्मक्लेषाचीही दखल कोणी घेईना

वर्धा : बदलत्या अभ्यासपद्धती आणि इतर कारणांमुळे विद्यार्थ्यांवरील ताणतणाव वाढत गेले. यातूनच विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढीस लागले. हे सर्व भयावह चित्र पाहून ‘भारूकाका’ने शासकीय नोकरी सोडून विद्यार्थ्यांना आत्महत्येपासून रोखण्याकरिता आणि त्यांना नवी प्रेरणा देण्याकरिता ‘भारूकाकाची पत्रे’ हे पुस्तक लिहिले. हे पुस्तक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता शासनाने पुढाकार घ्यावा, म्हणून लेखक गेल्या काही वर्षांपासून वणवण भटकत आहे; परंतु त्यांना अद्यापही न्याय मिळाला नाही. त्यामुळे ‘येथे लेखक-साहित्यिकांचीच वणवण होत असेल तर कोट्यवधीचे साहित्य संमेलन घेण्याचे फलित तरी काय,’ असा संतप्त सवाल ‘भारूकाका’ म्हणजेच महेंद्र गौरीकुमार बैसाणे यांनी व्यक्त केला.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकरिता शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. कोट्यवधीचा खर्चही केला जातो. परंतु, अद्यापही साहित्यिक आणि लेखकांबद्दल जाणिवा बोथटच असल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. यादृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता यावी व त्यांनी तणावमुक्त होऊन येणाऱ्या परीक्षांना सामोरे जावे, यासाठी ‘भारूकाकाची पत्रे’ हे पुस्तक विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचविण्याकरिता ‘भारूकाका’ प्रयत्नरत आहेत. त्यांनी शालेय शिक्षणमंत्री व मराठी भाषा मंत्री, विश्व मराठी संमेलनादरम्यानही निवेदन सादर केले; मात्र अद्यापही कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा उज्ज्वलादेवी पाटील यांची प्रस्तावना आहे. तसेच हे पुस्तक म्हणजे विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण प्रशिक्षण क्रमच आहे. या पुस्तकाचा शासनाने नाही, तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी तरी विचार करावा, म्हणून आजी-माजी अध्यक्षांनाही साकडे घातले; पण त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत लेखक महेंद्र गौरीकुमार बैसाणे यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.

कोणी पुस्तक घेता का पुस्तक?

९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने लेखक महेंद्र बैसाणे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरी गाठली आहे. त्यांनी आयोजकांची भेट घेत आपले निवेदन दिले; परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. संमेलनाध्यक्षांसह महामंडळाचे अध्यक्ष, स्वागताध्यक्ष, कार्याध्यक्ष व समन्वयकांच्या नावे निवेदन तयार करून ‘कोणी पुस्तक घेता का पुस्तक?’ अशी विनंती त्यांनी केली आहे.

टॅग्स :literatureसाहित्यakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळwardha-acवर्धा