शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'वर पाकिस्तानचा यू-टर्न, आता युद्धविरामचे श्रेय दिले चीनला; आधी ट्रम्प यांना दिलेले
2
मुख्यमंत्र्यांचा फोन येताच उमेदवारी घेतली मागे! बंडखोरी रोखण्यात भाजपला यश; उद्धवसेना मात्र अपयशी
3
सरकारचा एक निर्णय आणि सरकारी कंपनीलाच जोरदार झटका; २ दिवसांत झालं ११,००० कोटी रुपयांचं नुकसान, प्रकरण काय?
4
नेपाळमध्ये काळजाचा ठोका चुकला! ५५ प्रवाशांना घेऊन उतरणारे विमान धावपट्टीवरून घसरले
5
तब्बल ६६ नगरसेवक बिनविरोध; भाजपचे सर्वाधिक ४३, शिंदेसेनेचे १९; ...तर आयोग करणार तपास
6
मनधरणी, तणाव अन् खून...! मुंबईत भाजप-शिंदेसेनेची ठाकरे बंधूंशी थेट लढत, ठाण्यात ७, कल्याण-डोंबिवलीत २०, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध
7
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ जानेवारी २०२६ : दिवस अत्यंत आनंददायी, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल!
8
सोलापूर हादरले : ‘बिनविरोध’साठी झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहराध्यक्षाचा भरदिवसा खून
9
बिनविरोधचे हसू अन् बंडखोरीचे आसू; महामुंबईतील मोजके बंडखोरही सत्ताधाऱ्यांचेच; अनेकांनी घेतली माघार
10
राज्यात फक्त अन् फक्त मराठीच सक्तीची! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी स्पष्टोक्ती  
11
धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले 
12
मराठी दलित साहित्य हा भारतीय साहित्यविश्वाचा आधारस्तंभ - मृदुला गर्ग  
13
मराठी शाळा टिकव्यात, इथेच ज्ञानेश्वर-तुकोबा घडतील; विश्वास पाटील यांचे प्रशासकीय उदासीनतेवर बोट
14
कृतिशील, निर्मितीशील असणे हेच जीवनाचे इतिवृत्त - तारा भवाळकर
15
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
16
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
17
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
18
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
19
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
20
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यिकांचीच वणवण; संमेलनाचे फलित काय? भारूकाकांनी उपस्थित केला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 12:03 IST

आत्मक्लेषाचीही दखल कोणी घेईना

वर्धा : बदलत्या अभ्यासपद्धती आणि इतर कारणांमुळे विद्यार्थ्यांवरील ताणतणाव वाढत गेले. यातूनच विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढीस लागले. हे सर्व भयावह चित्र पाहून ‘भारूकाका’ने शासकीय नोकरी सोडून विद्यार्थ्यांना आत्महत्येपासून रोखण्याकरिता आणि त्यांना नवी प्रेरणा देण्याकरिता ‘भारूकाकाची पत्रे’ हे पुस्तक लिहिले. हे पुस्तक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता शासनाने पुढाकार घ्यावा, म्हणून लेखक गेल्या काही वर्षांपासून वणवण भटकत आहे; परंतु त्यांना अद्यापही न्याय मिळाला नाही. त्यामुळे ‘येथे लेखक-साहित्यिकांचीच वणवण होत असेल तर कोट्यवधीचे साहित्य संमेलन घेण्याचे फलित तरी काय,’ असा संतप्त सवाल ‘भारूकाका’ म्हणजेच महेंद्र गौरीकुमार बैसाणे यांनी व्यक्त केला.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकरिता शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. कोट्यवधीचा खर्चही केला जातो. परंतु, अद्यापही साहित्यिक आणि लेखकांबद्दल जाणिवा बोथटच असल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. यादृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता यावी व त्यांनी तणावमुक्त होऊन येणाऱ्या परीक्षांना सामोरे जावे, यासाठी ‘भारूकाकाची पत्रे’ हे पुस्तक विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचविण्याकरिता ‘भारूकाका’ प्रयत्नरत आहेत. त्यांनी शालेय शिक्षणमंत्री व मराठी भाषा मंत्री, विश्व मराठी संमेलनादरम्यानही निवेदन सादर केले; मात्र अद्यापही कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा उज्ज्वलादेवी पाटील यांची प्रस्तावना आहे. तसेच हे पुस्तक म्हणजे विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण प्रशिक्षण क्रमच आहे. या पुस्तकाचा शासनाने नाही, तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी तरी विचार करावा, म्हणून आजी-माजी अध्यक्षांनाही साकडे घातले; पण त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत लेखक महेंद्र गौरीकुमार बैसाणे यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.

कोणी पुस्तक घेता का पुस्तक?

९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने लेखक महेंद्र बैसाणे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरी गाठली आहे. त्यांनी आयोजकांची भेट घेत आपले निवेदन दिले; परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. संमेलनाध्यक्षांसह महामंडळाचे अध्यक्ष, स्वागताध्यक्ष, कार्याध्यक्ष व समन्वयकांच्या नावे निवेदन तयार करून ‘कोणी पुस्तक घेता का पुस्तक?’ अशी विनंती त्यांनी केली आहे.

टॅग्स :literatureसाहित्यakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळwardha-acवर्धा