शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

नेरी मिर्झापूरमध्ये वर्षभर पाणीटंचाई

By admin | Updated: April 29, 2016 02:08 IST

जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्ररूप धारण केले आहे. टँकरमुक्त जिल्हा असला तरी नागरिकांना तहाणेने व्याकूळ व्हावे लागत असल्याचे चित्र आहे.

५०० लोकसंख्येसाठी एकच हातपंप : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही समस्या कायमआर्वी : जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्ररूप धारण केले आहे. टँकरमुक्त जिल्हा असला तरी नागरिकांना तहाणेने व्याकूळ व्हावे लागत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील नेरी मिर्झापूर या गावात वर्षभर पाणीटंचाई भासते. परिणामी, नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. ५०० लोकसंख्येच्या गावाला केवळ एकच हातपंप देण्यात आला आहे. यामुळे पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्र्यांनी भेट दिल्यानंतरही या गावातील समस्या सुटत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नेरी मिर्झापूर हे एकमेव पुनर्वसन झालेले गाव आहे. या गावाला आठ महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी समस्यांचा पाढा वाचला. मुख्यमंत्र्यांनी समस्या सोडविण्याची ग्वाही दिली; पण अद्यापही त्या जैसे थेच आहे. ५०० लोकवस्तीच्या गावात एकच बोअरवेल असून त्यातही अर्धा तास एक दिवसाआड पाणीपुरवठा होतो. सध्या नेरी मिर्झापूर गावात पाण्याची दुसरी कुठलीही पर्यायी व्यवस्था नहाी. यामुळे भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गावात पाण्याची टाकी आहे; पण बोअरवेलमधून टाकी भरण्याकरिता दररोज किमान सात ते आठ तास लागतात. परिणामी, नागरिकांना पाणी पुरवठा करता येत नाही. एक दिवसा आड अल्प पाणी मिळत असल्याने नागरिकांना अन्यत्र पाण्यासाठी भटकंती करावी लागते. गावात शाळेच्या बाजूला पाणी पुरवठ्यासाठी टाकी आहे; पण ती जीर्ण झाली आहे. यामुळे कधी कोसळेल याचा नेम राहिला नाही. गावातील सर्व पुनर्वसन कामांना मंजुरी प्राप्त असताना संबंधित विभागाचे अधिकारी वेळकाढू धोरण अवलंबित असल्याने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. या गावामध्ये एकूण सहा कुपनलिका आहेत; पण यापैकी केवळ एकच कुपनलिका सुरू आहे. गावात पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन जागोजागी फुटलेली आहे. यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाहून जाते. गावातील सांडपाणी या पाईपलाईनमध्ये जात असल्याने ग्रामस्थांना दूषित पाण्याचा पुरवठा होतो. परिणामी, आरोग्याचा प्रश्न गंभीर रूप धारण करीत आहे. जिल्ह्यात सर्वत्र पाणीटंचाईच्या निवारणार्थ उपाययोजना केल्या जात असताना नेरी मिर्झापूर गावाकडे लक्ष देण्यास कुणी तयार नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे पाणी पेटले, असे म्हणावे लागत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही गरजेची आहे.(तालुका प्रतिनिधी)