शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

हिंगणघाट येथे पाणी प्रश्न पेटला; राकाँ पदाधिकाऱ्यांनी टँकरवर बसून रेटला!

By महेश सायखेडे | Updated: April 10, 2023 18:25 IST

जनआक्रोश : प्रत्यक्षात १४० दिवस पाणी पुरवठा, कर घेतला जातोय ३६५ दिवसांचा

वर्धा :हिंगणघाट  शहरातील नागरिकांना प्रत्यक्षात १४० दिवस पाणी पुरवठा करून पालिका प्रशासन चक्क ३६५ दिवसांचा पाणीपट्टी कराची वसुली करीत आहे. हिंगणघाटवासीयांना ३६५ दिवस पाणी पुरवठा करा ही प्रमुख मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी थेट पाण्याच्या टँकरवर चढत आणि हिंगणघाट शहरातून काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चातून रेटली.

शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालय परिसरातून काढण्यात आलेल्या मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करून नगरपालिका कार्यालय गाठले. मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांनी हिंगणघाट नगरपालिका प्रशासन आणि भाजप सरकारच्या सर्वसामान्य विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. मोर्चा नगरपालिका कार्यालयावर धडकल्यावर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन पालिका प्रशासनाला सादर केले.

आंदोलनाचे नेतृत्त्व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केले. मोर्चात दिवाकर गमे, प्रशांत घवघवे, दशरथ ठाकरे, राजू मेसेकर, शेखर ठाकरे आदी सहभागी झाले होते.

या प्रमुख मागण्यांकडे वेधले लक्ष

शहरातील अकरा जलकुंभातून हिंगणघाट शहराला ३६५ दिवस नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा. अमृत योजनेंतर्गत होत असलेल्या विकास कामाची चौकशी करून गौडबंगाल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. हिंगणघाट शहरातील संत ज्ञानेश्वर वाॅर्ड, रामनगर वाॅर्ड, संत तुकडोजी वॉर्ड, शहा लंगडी रोड रिठे कॉलनी या भागातील पाणी टंचाईची समस्या तातडीने निकाली काढण्यात यावी आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईagitationआंदोलनwater shortageपाणीकपातHinganghatहिंगणघाटNCPराष्ट्रवादी काँग्रेस